शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
3
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
4
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
5
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
6
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
7
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
8
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
9
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
10
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
11
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
12
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
13
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
14
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
15
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
16
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
17
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
18
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
19
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
20
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...

तीन एकर कोबीवर नांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:12 IST

गारपीट, अवकाळी अशा अस्मानी, सुल्तानी संकटांनी निफाड तालुक्यातील शेतकरी हतबल झाला असून, वनसगाव येथील शेतकरी त्र्यंबक कचरू शिंदे यांनी तीन एकर क्षेत्रावरील कोबीवर नांगर फिरविला आहे.

वनसगाव : गारपीट, अवकाळी अशा अस्मानी, सुल्तानी संकटांनी निफाड तालुक्यातील शेतकरी हतबल झाला असून, वनसगाव येथील शेतकरी त्र्यंबक कचरू शिंदे यांनी तीन एकर क्षेत्रावरील कोबीवर नांगर फिरविला आहे.  शिंदे यांनी तीन एकर क्षेत्रावर कोबीची लागवड केली होती. विविध प्रकारची रासायनिक खते व जैविक घटक वापरून आपली शेती मोठ्या प्रमाणात फुलवली होती; मात्र पीक ज्यावेळी पूर्ण तयार होऊन बाजारामध्ये विकण्यासाठी नेले जाते, त्यावेळी कोबीला कुठल्याही प्रकारे बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नैराश्य येत आहे. मजुरी व औषधांचा खर्च फिटत नसल्यामुळे संतप्त शेतकरी शिंदे यांनी कोबीवर नांगर फिरविला.कोबी बाजारात विकण्यासाठी नेली असता व्यापारी केवळ एक रु पया गड्डा अशा पद्धतीने मागणी करतात. तर कधी कधी बाजारात माल घेऊन गेल्यावर व्यापारी माल घेत नसे. कोबीच्या एका रोपाची किंमत साधारण ७० पैसे इतकी आहे. लागवडीसाठी लागणारा सुमारे पाच हजार रुपये इतका खर्च तर निंदणी, खुरपणीसह मजुरी वीस हजार इतकी होते, तर औषधाचा एक स्प्रे मारायचा तरी पाच ते सहा हजार रुपये इतका खर्च येतो. कृषी दुकानदाराकडे साधारण दोन लाख ८२ हजार इतकी उधारी झाली आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या कोबीला कवडीमोल भाव मिळत असल्याने तिच्यावर नांगर फिरविण्याचा निर्णय घेतला. - त्र्यंबक शिंदे,  वनसगाव

टॅग्स :Farmerशेतकरीvegetableभाज्या