शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

कोटमगावी सोयाबीनवर फिरवला नांगर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 17:39 IST

येवला : महिनाभरापासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. यंदा हवामान खात्याने वर्तवलेल्या समाधानकारक पावसाच्या अंदाजाने सर्वच शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु सदर अंदाज येवला तालुक्यात फोल ठरल्याने खरीप पिकांची वाढ खुंटली, परिणामी तालुक्यातील कोटमगाव येथील प्रगतशील शेतकरी राजेंद्र कोटमे यांनी आपल्या शेतात उभ्या असलेल्या साडेतीन एकर सोयाबीनच्या पिकावर नांगर फिरवला आहे.

पाऊस पडत नसल्याने विहिरांचा पाणी साठा जेमतेमच आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांना कशा प्रकारे पाणी द्यावे अशी परिस्थिती येवला तालुक्यातील शेतकºयांवर ओढवली आहे. अशा परिस्थितीत लोकांची उसनवारी, उधारी करून सर्वच शेतकºयांनी यंदा बाजरी, मूग, सोयाबीन, मका, भुईमूग, कपाशी आदी पिकांची अल्प पावसावर पेरणी केली होतीे. राजेंद्र कोटमे यांनी साडेतीन एकर क्षेत्रावर सोयाबीन पेरणीसाठी जवळपास बारा हजार रुपये खर्च करून पीक घेतले होते. पावसाळ्याचा तिसरा महिना सुरू झाला असून पावसाने ओढ दिली आहे. उन्हामुळे सोयाबीन, मकाची पिके करपण्यास सुरु वात झाली असून जनावरांचा चाºयाचा प्रश्नदेखील ऐरणीवर येत आहे.महिनाभरापासून पाऊस आज येईल, उद्या येईल अशी आशा शेतकºयांना लागली होती. परंतु दोन महिन्याचा कालावधी उलटूनही पावसाने पाठ फिरवल्याने अजून सहा ते सात दिवसात येवला तालुक्यातील शेतकºयांच्या चिंतेत मोठी भर पडणार आहे. बेभरवशाच्या पावसामुळे शेती व्यवसायाची एक प्रकारे जुगारासारखी अवस्था झाल्याने शेतकरी वैफल्यग्रस्त झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक