शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
3
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
4
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
5
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
6
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
7
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
8
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
9
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
10
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
11
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
12
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
13
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
14
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
15
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
16
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
17
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
18
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
19
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
20
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा

तरुण शेतकऱ्याची आंबेगावी आत्महत्त्या

By admin | Updated: February 24, 2016 22:51 IST

तरुण शेतकऱ्याची आंबेगावी आत्महत्त्या

लासलगाव/येवला : कांद्याचे बाजारभाव घसरल्याने आर्थिक कोंडीत सापडलेल्या एका तरुण शेतकऱ्याने नापिकीला व दुष्काळी परिस्थितीला कंटाळून आत्महत्त्या केल्याची दुर्दैवी घटना बुधवारी येवला तालुक्यातील आंबेगावात घडली.बाळू मोतीराम आव्हाड असे या शेतकऱ्याचे नाव असून, त्यांच्यावर शेतीसाठी घेतलेले सुमारे दोन लाख रुपये कर्ज असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. दुष्काळ हे येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना लागलेले ग्रहणच. तीन वर्षांपासून सतत दुष्काळ पडत असल्याने सर्वच जलस्रोत कोरडेठाक झाले आहेत. लागवड केलेल्या कांदा पिकास पाणी देण्यासाठी नातेवाइकांकडून हातउसणे करत बोरवेल केली. मात्र तिही कोरडी निघाल्याने त्यानंतर पुन्हा सासऱ्यांकडून उसनवारी करत दुसरी बोअरवेल केली. तिही कोरडीच निघाल्याने निराश झालेल्या आव्हाड यांनी कांदा विक्र ी केला असता, त्याला ५२१ रु पये प्रतिक्विंटल भाव मिळाला. कांद्याच्या घसरत्या भावामुळे विक्र ी केलेल्या कांद्यातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने व घेतलेल्या कर्जाची कशी परतफेड करायची या नैराश्यातून बाळू आव्हाड यांनी आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या पश्चात पत्नी, तीन मुली व मुलगा, आई-वडील असा परिवार आहे. (वार्ताहर)