शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
4
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
7
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
8
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
9
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
10
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
11
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
12
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
13
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
14
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
15
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
16
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
17
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
18
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
19
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
20
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!

तरुण शेतकऱ्याची आंबेगावी आत्महत्त्या

By admin | Updated: February 24, 2016 22:51 IST

तरुण शेतकऱ्याची आंबेगावी आत्महत्त्या

लासलगाव/येवला : कांद्याचे बाजारभाव घसरल्याने आर्थिक कोंडीत सापडलेल्या एका तरुण शेतकऱ्याने नापिकीला व दुष्काळी परिस्थितीला कंटाळून आत्महत्त्या केल्याची दुर्दैवी घटना बुधवारी येवला तालुक्यातील आंबेगावात घडली.बाळू मोतीराम आव्हाड असे या शेतकऱ्याचे नाव असून, त्यांच्यावर शेतीसाठी घेतलेले सुमारे दोन लाख रुपये कर्ज असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. दुष्काळ हे येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना लागलेले ग्रहणच. तीन वर्षांपासून सतत दुष्काळ पडत असल्याने सर्वच जलस्रोत कोरडेठाक झाले आहेत. लागवड केलेल्या कांदा पिकास पाणी देण्यासाठी नातेवाइकांकडून हातउसणे करत बोरवेल केली. मात्र तिही कोरडी निघाल्याने त्यानंतर पुन्हा सासऱ्यांकडून उसनवारी करत दुसरी बोअरवेल केली. तिही कोरडीच निघाल्याने निराश झालेल्या आव्हाड यांनी कांदा विक्र ी केला असता, त्याला ५२१ रु पये प्रतिक्विंटल भाव मिळाला. कांद्याच्या घसरत्या भावामुळे विक्र ी केलेल्या कांद्यातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने व घेतलेल्या कर्जाची कशी परतफेड करायची या नैराश्यातून बाळू आव्हाड यांनी आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या पश्चात पत्नी, तीन मुली व मुलगा, आई-वडील असा परिवार आहे. (वार्ताहर)