शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

आंबेगाव गोरखनगर : गावास पाण्यासाठी घोषणाबाजी व संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 1:40 AM

येवला : ३८ गाव पाणीपुरवठा योजनेतून गोरखनगर गावासाठी पिण्याचे पाणी मिळत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी येवल्यातील ३८ गाव पाणीपुरवठा योजनेच्या कार्यालयावर हंडा मोर्चा नेऊन कार्यालयासमोर उपोषण करून आपल्या मागण्यांसाठी घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. या मागणीचे निवेदन ३८ गाव पाणीपुरवठा योजनेचे उपाध्यक्ष मोहन शेलार यांना ग्रामस्थाच्या वतीने देण्यात आले.

ठळक मुद्दे महिलांचा हंडा मोर्चा, उपोषण ग्रामस्थ व ३८ गाव योजना प्रशासनाला नाहक मनस्ताप

हंडा मोर्चात सहभागी गोरखनगर परिसरातील नागरिक.

येवला : ३८ गाव पाणीपुरवठा योजनेतून गोरखनगर गावासाठी पिण्याचे पाणी मिळत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी येवल्यातील ३८ गाव पाणीपुरवठा योजनेच्या कार्यालयावर हंडा मोर्चा नेऊन कार्यालयासमोर उपोषण करून आपल्या मागण्यांसाठी घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. या मागणीचे निवेदन ३८ गाव पाणीपुरवठा योजनेचे उपाध्यक्ष मोहन शेलार यांना ग्रामस्थाच्या वतीने देण्यात आले.३८ गाव पाणीपुरवठा योजना प्रशासनाने गोरखनगर येथे पाणीपुरवठा करण्यासाठी २०१५ला नाहरकत प्रमाणपत्र दिले असल्याने अनकाई ग्रामपंचायत प्रशासनाचा भोंगळपणा समोर आला असून, यातून गोरखनगर ग्रामस्थ व ३८ गाव योजना प्रशासनाला नाहक मनस्ताप सहन करावा लागला.अनकाई ग्रुप ग्रामपंचायत असून, यात गोरखनगरचा समावेश आहे. ७०० ते ८०० लोकसंख्या असलेले हे गाव पूर्वीपासूनच दुष्काळी गाव म्हणून ओळखले जाते. गावात महिलांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागते. येथून जवळच ३८ गाव पाणीपुरवठा योजनेची टाकी आहे. या टाकीतून गावाला पाणीपुरवठा होणे शक्य असल्याने पिण्यासाठी पाणी मिळावे, अशी मागणी अनेकदा ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली. ग्रामपंचायत प्रशासनाने तसा प्रस्ताव ३८ गाव पाणीपुरवठा योजनेकडे दिला. २०१५ मध्ये इतर गावांसह गोरखनगरला पाणीपुरवठा करता येईल, असे पत्र प्रशासनाने ग्रामपंचायतीला दिले. २०१५ पासून ग्रामपंचायतीने या प्रश्नाकडे कानाडोळा केल्याने आज ग्रामस्थांना उपोषणाची वेळ आल्याचे निवेदनात म्हटले आहे.गोरखनगर येथे दरवर्षी उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो; मात्र आता ३८ गाव पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा करण्यात यावा, अन्यथा आम्हाला उपोषणाशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर निवृत्ती घुमरे, बाजीराव कोल्हे, पुष्पा मेमाणे, कमल घुमरे, कविता खैरनार, भीमाबाई खैरनार आदींसह अनेक नागरिकांच्या सह्या आहेत.१३ किंवा १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ३८ गाव पाणीपुरवठा योजनेचे पाणी जोडून घेतले असते तर आज आमच्या गावातील लोकांवर भटकण्याची वेळ आली नसती.- जगन बोराडे,माजी सरपंच, ग्रामपंचायत अनकाईग्रामपंचायत प्रशासनाने मागणी केल्यानुसार ४ नोव्हेंबर २०१५ रोजी गोरखनगर येथे पाणीपुरवठा करण्यास परवानगी देण्यात आली असून, पाणीपुरवठा जोडून घेण्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाची आहे.- मोहन शेलार,उपाध्यक्ष, ३८ गाव पाणीपुरवठा योजना