शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

आंबेगाव गोरखनगर : गावास पाण्यासाठी घोषणाबाजी व संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 01:40 IST

येवला : ३८ गाव पाणीपुरवठा योजनेतून गोरखनगर गावासाठी पिण्याचे पाणी मिळत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी येवल्यातील ३८ गाव पाणीपुरवठा योजनेच्या कार्यालयावर हंडा मोर्चा नेऊन कार्यालयासमोर उपोषण करून आपल्या मागण्यांसाठी घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. या मागणीचे निवेदन ३८ गाव पाणीपुरवठा योजनेचे उपाध्यक्ष मोहन शेलार यांना ग्रामस्थाच्या वतीने देण्यात आले.

ठळक मुद्दे महिलांचा हंडा मोर्चा, उपोषण ग्रामस्थ व ३८ गाव योजना प्रशासनाला नाहक मनस्ताप

हंडा मोर्चात सहभागी गोरखनगर परिसरातील नागरिक.

येवला : ३८ गाव पाणीपुरवठा योजनेतून गोरखनगर गावासाठी पिण्याचे पाणी मिळत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी येवल्यातील ३८ गाव पाणीपुरवठा योजनेच्या कार्यालयावर हंडा मोर्चा नेऊन कार्यालयासमोर उपोषण करून आपल्या मागण्यांसाठी घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. या मागणीचे निवेदन ३८ गाव पाणीपुरवठा योजनेचे उपाध्यक्ष मोहन शेलार यांना ग्रामस्थाच्या वतीने देण्यात आले.३८ गाव पाणीपुरवठा योजना प्रशासनाने गोरखनगर येथे पाणीपुरवठा करण्यासाठी २०१५ला नाहरकत प्रमाणपत्र दिले असल्याने अनकाई ग्रामपंचायत प्रशासनाचा भोंगळपणा समोर आला असून, यातून गोरखनगर ग्रामस्थ व ३८ गाव योजना प्रशासनाला नाहक मनस्ताप सहन करावा लागला.अनकाई ग्रुप ग्रामपंचायत असून, यात गोरखनगरचा समावेश आहे. ७०० ते ८०० लोकसंख्या असलेले हे गाव पूर्वीपासूनच दुष्काळी गाव म्हणून ओळखले जाते. गावात महिलांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागते. येथून जवळच ३८ गाव पाणीपुरवठा योजनेची टाकी आहे. या टाकीतून गावाला पाणीपुरवठा होणे शक्य असल्याने पिण्यासाठी पाणी मिळावे, अशी मागणी अनेकदा ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली. ग्रामपंचायत प्रशासनाने तसा प्रस्ताव ३८ गाव पाणीपुरवठा योजनेकडे दिला. २०१५ मध्ये इतर गावांसह गोरखनगरला पाणीपुरवठा करता येईल, असे पत्र प्रशासनाने ग्रामपंचायतीला दिले. २०१५ पासून ग्रामपंचायतीने या प्रश्नाकडे कानाडोळा केल्याने आज ग्रामस्थांना उपोषणाची वेळ आल्याचे निवेदनात म्हटले आहे.गोरखनगर येथे दरवर्षी उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो; मात्र आता ३८ गाव पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा करण्यात यावा, अन्यथा आम्हाला उपोषणाशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर निवृत्ती घुमरे, बाजीराव कोल्हे, पुष्पा मेमाणे, कमल घुमरे, कविता खैरनार, भीमाबाई खैरनार आदींसह अनेक नागरिकांच्या सह्या आहेत.१३ किंवा १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ३८ गाव पाणीपुरवठा योजनेचे पाणी जोडून घेतले असते तर आज आमच्या गावातील लोकांवर भटकण्याची वेळ आली नसती.- जगन बोराडे,माजी सरपंच, ग्रामपंचायत अनकाईग्रामपंचायत प्रशासनाने मागणी केल्यानुसार ४ नोव्हेंबर २०१५ रोजी गोरखनगर येथे पाणीपुरवठा करण्यास परवानगी देण्यात आली असून, पाणीपुरवठा जोडून घेण्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाची आहे.- मोहन शेलार,उपाध्यक्ष, ३८ गाव पाणीपुरवठा योजना