शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

आंबेगाव गोरखनगर : गावास पाण्यासाठी घोषणाबाजी व संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 01:40 IST

येवला : ३८ गाव पाणीपुरवठा योजनेतून गोरखनगर गावासाठी पिण्याचे पाणी मिळत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी येवल्यातील ३८ गाव पाणीपुरवठा योजनेच्या कार्यालयावर हंडा मोर्चा नेऊन कार्यालयासमोर उपोषण करून आपल्या मागण्यांसाठी घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. या मागणीचे निवेदन ३८ गाव पाणीपुरवठा योजनेचे उपाध्यक्ष मोहन शेलार यांना ग्रामस्थाच्या वतीने देण्यात आले.

ठळक मुद्दे महिलांचा हंडा मोर्चा, उपोषण ग्रामस्थ व ३८ गाव योजना प्रशासनाला नाहक मनस्ताप

हंडा मोर्चात सहभागी गोरखनगर परिसरातील नागरिक.

येवला : ३८ गाव पाणीपुरवठा योजनेतून गोरखनगर गावासाठी पिण्याचे पाणी मिळत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी येवल्यातील ३८ गाव पाणीपुरवठा योजनेच्या कार्यालयावर हंडा मोर्चा नेऊन कार्यालयासमोर उपोषण करून आपल्या मागण्यांसाठी घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. या मागणीचे निवेदन ३८ गाव पाणीपुरवठा योजनेचे उपाध्यक्ष मोहन शेलार यांना ग्रामस्थाच्या वतीने देण्यात आले.३८ गाव पाणीपुरवठा योजना प्रशासनाने गोरखनगर येथे पाणीपुरवठा करण्यासाठी २०१५ला नाहरकत प्रमाणपत्र दिले असल्याने अनकाई ग्रामपंचायत प्रशासनाचा भोंगळपणा समोर आला असून, यातून गोरखनगर ग्रामस्थ व ३८ गाव योजना प्रशासनाला नाहक मनस्ताप सहन करावा लागला.अनकाई ग्रुप ग्रामपंचायत असून, यात गोरखनगरचा समावेश आहे. ७०० ते ८०० लोकसंख्या असलेले हे गाव पूर्वीपासूनच दुष्काळी गाव म्हणून ओळखले जाते. गावात महिलांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागते. येथून जवळच ३८ गाव पाणीपुरवठा योजनेची टाकी आहे. या टाकीतून गावाला पाणीपुरवठा होणे शक्य असल्याने पिण्यासाठी पाणी मिळावे, अशी मागणी अनेकदा ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली. ग्रामपंचायत प्रशासनाने तसा प्रस्ताव ३८ गाव पाणीपुरवठा योजनेकडे दिला. २०१५ मध्ये इतर गावांसह गोरखनगरला पाणीपुरवठा करता येईल, असे पत्र प्रशासनाने ग्रामपंचायतीला दिले. २०१५ पासून ग्रामपंचायतीने या प्रश्नाकडे कानाडोळा केल्याने आज ग्रामस्थांना उपोषणाची वेळ आल्याचे निवेदनात म्हटले आहे.गोरखनगर येथे दरवर्षी उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो; मात्र आता ३८ गाव पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा करण्यात यावा, अन्यथा आम्हाला उपोषणाशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर निवृत्ती घुमरे, बाजीराव कोल्हे, पुष्पा मेमाणे, कमल घुमरे, कविता खैरनार, भीमाबाई खैरनार आदींसह अनेक नागरिकांच्या सह्या आहेत.१३ किंवा १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ३८ गाव पाणीपुरवठा योजनेचे पाणी जोडून घेतले असते तर आज आमच्या गावातील लोकांवर भटकण्याची वेळ आली नसती.- जगन बोराडे,माजी सरपंच, ग्रामपंचायत अनकाईग्रामपंचायत प्रशासनाने मागणी केल्यानुसार ४ नोव्हेंबर २०१५ रोजी गोरखनगर येथे पाणीपुरवठा करण्यास परवानगी देण्यात आली असून, पाणीपुरवठा जोडून घेण्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाची आहे.- मोहन शेलार,उपाध्यक्ष, ३८ गाव पाणीपुरवठा योजना