शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

आंबेडकरी जलशांच्या खंडित परंपरेला पुन्हा नवऊर्जा प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 01:00 IST

‘उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे’ हे ज्येष्ठ शाहीर वामनदादा कर्डक यांच्या पहाडी आवाजातील गीत असो की अन्य कुणी शाहिरांनी सादर केलेले भीमगीत असो, विशाल प्रबोधन सभेमधील संपूर्ण जनसमुदायाच्या अंगावरील रोमरोम उभे राहत असत अशी जादू या शाहिरी गीतांमध्ये होती. असे आंबेडकरी शाहिरी जलसे म्हणजे समाजप्रबोधनाचे मोठे साधन किंवा माध्यम आहे.

नाशिक : ‘उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे’ हे ज्येष्ठ शाहीर वामनदादा कर्डक यांच्या पहाडी आवाजातील गीत असो की अन्य कुणी शाहिरांनी सादर केलेले भीमगीत असो, विशाल प्रबोधन सभेमधील संपूर्ण जनसमुदायाच्या अंगावरील रोमरोम उभे राहत असत अशी जादू या शाहिरी गीतांमध्ये होती. असे आंबेडकरी शाहिरी जलसे म्हणजे समाजप्रबोधनाचे मोठे साधन किंवा माध्यम आहे.मध्यंत- राच्या काळात या आंबेडकरी शाहिरी जलशांची परंपरा खंडित होत असताना पुन्हा एकदा या कार्याला कार्यशाळा आणि शिबिराच्या माध्यमातून नवऊर्जा प्राप्त होत आहे. तत्कालीन तमाशा सादरीकरणातील अश्लाघ्य भाग कमी करून त्याऐवजी समाजप्रबोधन आणि बुद्धविचार यांना चालना देणारे लोककला प्रकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनानुसार त्यावेळच्या कलाकारांनी रूढ केले, त्यालाच ‘आंबेडकरी जलसा’ असे म्हटले जाते. यासंदर्भात माहिती देताना लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष शरद शेजवळ यांनी सांगितले की, नाशिकमध्ये आंबेडकरी जलशाला फार मोठी परंपरा लाभलेली आहे. भीमराव कर्डक, श्रावण यशवंते, वामनदादा कर्डक, लक्ष्मण केदार असे अनेक थोर शाहीर डॉ. बाबासाहेबांचे विचार आंबेडकरी जलशांमधून मांडत होते. त्यावेळी खुद्द डॉ. बाबासाहेब म्हणाले की, माझी दहा भाषणे आणि माझ्या शाहिराचे एक गाणे बरोबरीचे आहे. साहजिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळात आणि त्यानंतरही आंबेडकरी जलशांना मोठी लोकप्रियता लाभली होती. आंबेडकरी जलशांना सामाजिक प्रबोधनाची परंपरा लाभलेली असल्याने त्यात भगवान गौतम बुद्ध, संत कबीर, महात्मा फुले, संत तुकाराम आदींचे विचार परखडपणे मांडले जात होते.अत्याधुनिक संवाद माध्यमामुळे अलीकडच्या काळात मात्र बाबासाहेबांवरील अनेक गाणी लोकप्रिय झाली आणि आंबेडकरी जलशाची चळवळ काही प्रमाणात मागे पडली होती. परंतु आता पुन्हा एकदा नवयुवकांना आंबेडकरी जलशाचे आकर्षण वाटू लागले आहे, असेही शेजवळ यांनी सांगितले. इतकेच नव्हे तर शाहीर वामनदादा कर्डक प्रतिष्ठानतर्फे ठिकठिकाणी आंबेडकरी जलशासंबंधी कार्यशाळा व शिबिर घेण्यात येत असून, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.नवीन कलावंतांना आकर्षणआंबेडकरी विचारांचा वणवा लोककलांद्वारे समजून घेण्यासाठी आंबेडकरी जलसा हे लोकप्रबोधनाचे अत्यंत लोकप्रिय साधन होते. या जलशांमध्ये पूर्वी ज्येष्ठ कलावंत नागसेन सावदेकर, ज्येष्ठ शाहीर विठ्ठल उमप आदी कलावंत आपली कला सादर करीत असत. हीच परंपरा काही प्रमाणात शाहीर नंदेश उमप, डॉ. गणेश चंदनशिवे, अनिरुद्ध वणकर आदी कलावंतांनी जपली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त दोन वर्षांपूर्वी मुंबई येथे गेटवे आॅफ इंडिया येथे भव्य स्वरूपात आंबेडकरी जलशाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा आंबेडकरी जलशाकडे नवीन कलावंत वळू लागले आहेत.

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती