शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

मनपात समावेश, तरी गावांच्या समस्या कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:13 IST

नाशिक : कॅनॉलरोडवरील आम्रपाली झोपडपट्टी परिसरात विविध समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या परिसरात डासांचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात वाढला ...

नाशिक : कॅनॉलरोडवरील आम्रपाली झोपडपट्टी परिसरात विविध समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या परिसरात डासांचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याशिवाय परिसरात स्वच्छता होत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेने या परिसरातील समस्या सोडवाव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

क्लासेसला परवानगी मिळाल्याने दिलासा

नाशिक : खासगी क्लास सुरू करण्यास शासनाने परवानगी दिल्याने अनेक विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळाला आहे. मागील ९ महिन्यांपासून क्लासेस बंद असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाइनच्या माध्यमातून क्लास करावा लागत आहे. क्लास सुरू झाल्यानंतर अभ्यासक्रम पूर्ण होणार का, असा प्रश्न पालकांकडून विचारला जात आहे.

वाढत्या गुन्हेगारीकडे पोलिसांचे दुर्लक्ष

नाशिक : शहरातील वाढत्या गुन्हेगारीकडे शहर पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. शहरात दिवसागणिक सोनसाखळी ओढण्याबरोबरच मोबाइल चोरीच्या घटनांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याशिवाय गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असल्याने पोलिसांच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.

शहरातील रस्त्यांवर पुन्हा अतिक्रमणे

नाशिक : शहरातील विविध मार्गांवर पुन्हा अतिक्रमणे वाढू लागली असून, महापालिकेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. रस्त्यावरील अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होताेच, शिवाय पादचाऱ्यांना चालणेही कठीण होते. मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने ही अतिक्रमणे हटवावीत, अशी मागणी करण्यात येत आहे.

भद्रकाली, दूधबाजारात वाहतूक कोंडी

नाशिक : भद्रकाली, दूधबाजार परिसरात वाहतूक कोंडी नित्याचीच बाब झाली आहे. या भागात सतत वाहनांची वर्दळ असते. अरुंद रस्त्यांवरच उभे राहणारे, विविध वस्तू विकणारे विक्रेते आणि दुकानांसमोर उभी करण्यात येणाऱ्या वाहनांमुळे रस्ता अधिकच अरुंद होतो. यामुळे या भागात नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.

कार्यकर्ते आकडेमोडीत व्यस्त

नाशिक : शहरालगतच्या गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानानंतर उमेदवार आणि कार्यकर्ते आकडेमोडीत व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे. यावेळी ग्रामपंचायतीसाठी मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याने मतदानाचा टक्का वाढला आहे. वाढीव मतदानाचा फायदा कुणाला होणार, याबाबतची गणिते कार्यकर्त्यांकडून मांडली जात आहेत.