शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

म्हाळुंगी नदीच्या पूराने पर्यायी रस्ता वाहून गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 18:39 IST

सिन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात गेल्या आठवड्यापासून पावसाची संततधार सुरू असल्याने म्हाळुंगी नदीला तिसऱ्यांदा महापूर आल्याने भोजापूर खोरे परिसरातील नळवाडी-पांढरीवस्तीकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे. नवीन पुलाचे काम सुरू असल्याने पांढरीवस्तीकडे जाण्यासाठी पर्याय रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र पूरच्या पाण्याने सदरचा रस्ता वाहून गेल्याने या वस्तीचा गावाशी संपर्क तुटला आहे.

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात गेल्या आठवड्यापासून पावसाची संततधार सुरू असल्याने म्हाळुंगी नदीला तिसऱ्यांदा महापूर आल्याने भोजापूर खोरे परिसरातील नळवाडी-पांढरीवस्तीकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे. नवीन पुलाचे काम सुरू असल्याने पांढरीवस्तीकडे जाण्यासाठी पर्याय रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र पूरच्या पाण्याने सदरचा रस्ता वाहून गेल्याने या वस्तीचा गावाशी संपर्क तुटला आहे.पश्चिम पट्ट्यात व म्हाळुंगी नदीच्या उगम क्षेत्रावर सुरू असलेल्या संततधारेमुळे नदी दुथडी भरून वाहत आहे. म्हाळुंगी नदीला तिसऱ्यांदा महापूर आल्याने शुक्रवारी सकाळी भोजापूर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे पूराचे पाणी कासारवाडी, चास, नळवाडीमार्गे संगमनेर तालुक्याच्या हद्दीत शनिवारी पाहचले आहेत. नळवाडी गावालगत पांढरीवस्ती असून पावसाळ्याच्या दिवसात नेहमीच येथील फरशी पूलाचा ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत होता. तीन वर्षापूर्वी झालेल्या पूरात येथील फरशी पूलाची दूरवास्था झाली होती.त्यामुळे आमदार राजाभाऊ वाजे व जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या पाठपुराव्यामुळे नवीन पुलाचे काम गेल्या चार महिन्यापूर्वी सुरू केले आहे. त्यामुळे पांढरीवस्ती, चिकणी, डोंगरगाव आदी भागाकडे जाण्यासाठी पुलाजवळच पाईप टाकून त्यावर मुरूम व माती टाकून पर्यायी मुरूमाचा पकका रस्ता तयार करण्यात आला होता.म्हाळुंगी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने भोजापूर धरणाच्या सांडव्याद्वारे १८०० क्यूसेसने पाणी नदीपात्रातून वाहत आहे. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास पूराच्या तडाख्यात मुरूमाचा रस्ता पूर्णपणे वाहून गेला आहे. त्यामुळे पांढरीवस्तीकडे जाण्याचा संपर्क तुटला आहे. पांढरीवस्तीकडे अंदाजे १२०० ते १३०० च्या आसपास लोकसंख्या असून नळवाडी गावात जाण्यासाठी शेतकरी व ग्रामस्थ यांना एकमेव हाच रस्ता असल्याने या मार्गावर नेहमी वर्दळ असते. नळवाडी गावात येण्यासाठी पांढरीवस्ती येथील ग्रामस्थांना कासारवाडी, चास मार्गे दहा किलोमीटर अंतर कापून यावे लागत आहे.

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊस