शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

आधीच कोरोनाची धास्ती, त्यात पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 00:46 IST

मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक परिसरात बुधवारी (दि.२८) रात्री आठ वाजेच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाच्या तुरळक ...

ठळक मुद्देशेतकरी हतबल : कांदा उत्पादकांच्या वाढल्या चिंता

मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक परिसरात बुधवारी (दि.२८) रात्री आठ वाजेच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाच्या तुरळक सरी पडल्याने कांदा उत्पादक शेतकरी चांगलाच धास्तावून गेला आहे. एकीकडे कोरोनामुळे आधीच कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आलेला असताना त्यात पुन्हा अवकाळी पावसाच्या सरी पडल्याने शेतकरी वर्गाची त्रेधा उडाली होती.मानोरी परिसरात यंदा मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांदा लागवड झालेली असताना ऐन कांदे काढणी सुरू असताना शेतात काढून ठेवलेला उन्हाळ कांद्याच्या पोळी झाकण्यासाठी शेतकरी वर्गाची एकच तारांबळ उडाली असल्याचे दिसून आले. गेल्या काही दिवसांपासून उष्णतेत प्रचंड वाढ झाली असून सातत्याने ढगाळ वातावरण निर्माण होत होते. त्यात वादळी वारेदेखील जोरात वाहत असल्याने कांदे झाकण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती. येथील परिसरात मागील काही दिवसांपासून उन्हाळ कांदा काढणीला सुरुवात झाली आहे. त्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे बाजार समित्या बंद ठेवण्यात येत असल्याने कांदे विक्रीची मोठी पंचाईत निर्माण झाली आहे.बाजारात कांद्याचे दर काही दिवसांपूर्वी कमी होत असल्याने शेतकरी वर्गाची कांदा साठवणुकीवर अधिक प्रमाणात भर देत असल्याचे दिसून आले आहे. त्यात नवीन कांदा चाळ तयार करण्याचे काम सुरू असल्याने तात्पुरता काढलेला उन्हाळ कांदा काढून शेतातच साठवून ठेवत असल्याचे दिसून आले आहे.चाकीसाठी भटकंतीलॉकडाऊनमुळे हार्डवेअर दुकानांची वेळ ही केवळ चार तासांसाठी उघडी असल्याने कांदा चाकीसाठी लागणाऱ्या साहित्यांची खरेदी करण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत आहे. तसेच लॉकडाऊनमुळे नव्या कांदा चाळीसाठी लागणाऱ्या साहित्यांच्या किमतीत देखील कमालीची वाढ झाली असल्याचे शेतकरी वर्गाकडून सांगण्यात आले आहे.ताडपत्री, कागदांची समस्यालॉकडाऊनमुळे प्रशासनाने दुकानांची वेळ ही सकाळी ७ ते ११ पर्यंत उघडी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना आपला कांदा पीक झाकण्यासाठी ताडपत्री कागदांची शोधाशोध करण्याची वेळ आली. दुकाने बंद असल्याने शेतकऱ्यांना दुसऱ्या शेतकऱ्यांकडून कागद आणून आपले कांदे झाकण्याची नामुष्की ओढावली होती.

(२९ मानोरी, १)पावसामुळे साठवून ठेवलेला कांदा काळा पडला आहे.कांदा साठवणुकीसाठी नवीन चाळ तयार करताना शेतकरी.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी