शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

आधीच कोरोनाची धास्ती, त्यात पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 00:46 IST

मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक परिसरात बुधवारी (दि.२८) रात्री आठ वाजेच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाच्या तुरळक ...

ठळक मुद्देशेतकरी हतबल : कांदा उत्पादकांच्या वाढल्या चिंता

मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक परिसरात बुधवारी (दि.२८) रात्री आठ वाजेच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाच्या तुरळक सरी पडल्याने कांदा उत्पादक शेतकरी चांगलाच धास्तावून गेला आहे. एकीकडे कोरोनामुळे आधीच कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आलेला असताना त्यात पुन्हा अवकाळी पावसाच्या सरी पडल्याने शेतकरी वर्गाची त्रेधा उडाली होती.मानोरी परिसरात यंदा मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांदा लागवड झालेली असताना ऐन कांदे काढणी सुरू असताना शेतात काढून ठेवलेला उन्हाळ कांद्याच्या पोळी झाकण्यासाठी शेतकरी वर्गाची एकच तारांबळ उडाली असल्याचे दिसून आले. गेल्या काही दिवसांपासून उष्णतेत प्रचंड वाढ झाली असून सातत्याने ढगाळ वातावरण निर्माण होत होते. त्यात वादळी वारेदेखील जोरात वाहत असल्याने कांदे झाकण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती. येथील परिसरात मागील काही दिवसांपासून उन्हाळ कांदा काढणीला सुरुवात झाली आहे. त्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे बाजार समित्या बंद ठेवण्यात येत असल्याने कांदे विक्रीची मोठी पंचाईत निर्माण झाली आहे.बाजारात कांद्याचे दर काही दिवसांपूर्वी कमी होत असल्याने शेतकरी वर्गाची कांदा साठवणुकीवर अधिक प्रमाणात भर देत असल्याचे दिसून आले आहे. त्यात नवीन कांदा चाळ तयार करण्याचे काम सुरू असल्याने तात्पुरता काढलेला उन्हाळ कांदा काढून शेतातच साठवून ठेवत असल्याचे दिसून आले आहे.चाकीसाठी भटकंतीलॉकडाऊनमुळे हार्डवेअर दुकानांची वेळ ही केवळ चार तासांसाठी उघडी असल्याने कांदा चाकीसाठी लागणाऱ्या साहित्यांची खरेदी करण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत आहे. तसेच लॉकडाऊनमुळे नव्या कांदा चाळीसाठी लागणाऱ्या साहित्यांच्या किमतीत देखील कमालीची वाढ झाली असल्याचे शेतकरी वर्गाकडून सांगण्यात आले आहे.ताडपत्री, कागदांची समस्यालॉकडाऊनमुळे प्रशासनाने दुकानांची वेळ ही सकाळी ७ ते ११ पर्यंत उघडी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना आपला कांदा पीक झाकण्यासाठी ताडपत्री कागदांची शोधाशोध करण्याची वेळ आली. दुकाने बंद असल्याने शेतकऱ्यांना दुसऱ्या शेतकऱ्यांकडून कागद आणून आपले कांदे झाकण्याची नामुष्की ओढावली होती.

(२९ मानोरी, १)पावसामुळे साठवून ठेवलेला कांदा काळा पडला आहे.कांदा साठवणुकीसाठी नवीन चाळ तयार करताना शेतकरी.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी