शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचन प्रश्नही सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 00:24 IST

वटार परिसरातील गावांसाठी जलदूत असलेली हत्ती नदी दुथडी भरून वाहत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, बळीराजा सुखावला आहे. हत्ती नदीचे जलपूजन मच्ंिछद्र्र खैरनार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेखर खैरनार, हरिष खैरनार, चेतन गांगुर्डे, जगदीश खैरनार, प्रदीप खैरनार उपस्थितीत होते.

ठळक मुद्देशेतकऱ्यांमध्ये समाधान : वटार येथे हत्ती नदीचे जलपूजन; खरिपाच्या आशा पल्लवित

वटार : परिसरातील गावांसाठी जलदूत असलेली हत्ती नदी दुथडी भरून वाहत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, बळीराजा सुखावला आहे. हत्ती नदीचे जलपूजन मच्ंिछद्र्र खैरनार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेखर खैरनार, हरिष खैरनार, चेतन गांगुर्डे, जगदीश खैरनार, प्रदीप खैरनार उपस्थितीत होते.प्रारंभी पावसाने ओढ दिल्याने बळीराजा धास्तावला होता. पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात मोठे हाल होत होते. जनावरांच्या चाºयाचे व पिण्याच्या पाण्याचे अतोनात हाल होत होते. शेतीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला होता. पण गेल्या काही दिवसांपासून परिसरात पाऊस पडत असल्याने पठावा धरणाजवळील नदीनाले तुडुंब भरून वाहू लागले व धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने हत्ती नदी दुथडी भरून वाहत आहे. पाण्याचा प्रश्न सुटणार असन, खरिपाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दुष्काळाची झळ सोसत असलेला बळीराजा यावर्षी शेतांत चांगले पीक येईन या आशेने आनंदाने भारावून गेला आहे.

गेल्या चार ते पाच वर्षांपासून परिसरात ऐन पावसाळ्यात पाऊस दडी मारत होता, शेतीबरोबर पिण्याच्या पाण्याचेही मोठे हाल होत होते. यावर्षी सुरुवातीला पावसाने ओढ दिली होती; पण गेल्या काही दिवसांपासून पावसाने परिसरात कधी जोरात तर कधी रिमझिम पाऊस पडत असल्याने परिसरातील शेतपिकाना जीवदान मिळाले आहे. खरिपाची शाश्वती नव्हती; पण आता रब्बीच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत.- मच्ंिछद्र खैरनार, शेतकरी, वटार

टॅग्स :WaterपाणीRainपाऊस