शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

 न्यायालयीन लढाईबरोबरच रस्त्यावरीलआंदोलनही गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 00:50 IST

नाशिक : मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी कायदेशीर लढाईबरोबरच रस्त्यावरही आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही, असे मत राज्यभरातील समन्वयकांनी बैठकीत बोलताना व्यक्त केले.

ठळक मुद्देमराठा समाज बैठक : राज्यभरातील समन्वयकांची भूमिका

नाशिक : मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी कायदेशीर लढाईबरोबरच रस्त्यावरही आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही, असे मत राज्यभरातील समन्वयकांनी बैठकीत बोलताना व्यक्त केले.सकल मराठा समाजाच्या राज्यातील समन्वयकांची नाशिक येथे बैठक संपन्न झाली. यावेळी राज्यभरातील प्रतिनिधींना त्यांची भूमिका मांडण्याची संधी देण्यात आली. यावेळी बोलताना अहमदनगर येथील संजय भवर म्हणाले, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबाबतही शंका निर्माण होऊ लागल्या आहेत. आरक्षणाला स्थगिती देण्यापेक्षा न्यायालयाने पन्नास टक्क्यांमध्ये आरक्षण का बसविले नाही. मराठा आरक्षणाचे राजकारण झाले आहे. आपण वेगवेगळ्या भूमिकांमध्ये अडकले गेलो आहोत. स्थगिती देण्यापेक्षा ओबीसींमधून आरक्षण का दिले नाही, असा प्रश्न आपण विचारायला हवा होता, असे मत त्यांनी मांडले.रायगडचे विनोद साबळे यांनी, मराठ्यांना दिल्ली काही नवीन नाही. वेळ आली तर आरक्षणासाठी दिल्लीपर्यंत जाऊन, असे मत व्यक्त करून राज्य शासनाने जाहीर केलेली पोलीस भरती रद्द करण्याची मागणी केली. प्रत्येक तालुक्यात धरणे आंदोलन झाले पाहिजे, असेही ते म्हणाले.कोल्हापूरचे दिलीप पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाची लढाई ही न्यायालय, सरकार आणि रस्त्यावर अशा तीन पातळ्यांवर लढली गेली पािहजे. यासाठी रस्यावरील आंदोलन अधीक तीव्र केले पहिजे; मात्र आंदोलन करताना सर्व नियमांचे पालन केले जावे. सचिन तोडकर म्हणाले, सरकारवर दबाव टाकण्यासाठी आंदोलनाशिवाय मार्ग नाही. ठाणे येथील सुधाकर पतंगराव यांनी, मराठा आरक्षणाची लढाई अधिक तीव्र करावयाची असल्याचे मत व्यक्त केले. सांगलीचे प्रवीण पाटील यांनी विद्यार्थ्यांची स्थिती सांगितली. अनेकांकडे फी भरायला पैसे नसतात. राज्य शासनाने सारथी योजनेची वाट लावली आहे. आता ही आपली शेवटची लढाई आहे असे सांगितले.औरंगाबादचे सतीश पाटील म्हणाले, मराठा क्रांती मोर्चाने इतके मोर्चे काढले त्याचा निर्णय काय झाला. आता रुमणे मोर्चा काढून या प्रश्नाचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे, असे मत व्यक्त केले. किशोर चव्हाण म्हणाले, मराठा आरक्षण घटनापीठाकडे गेले आहे. घटनापीठ केव्हा तयार होईल याचा कुणालाही अंदाज नाही. ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढविली तर मराठा आरक्षणावरील स्थगिती तात्काळ उठू शकते. आपली लढाई आता केंद्राबरोबर आहे. यापुढे आईच्या जातीचे दाखले मिळावेत, अशी आपली मागणी करायला हवी, असेही त्यांनी सांगितले. पुणे येथील धनंजय जाधव यांनी आरक्षणाची लढाई लढताना आपल्या वेगवेगळ्या भूमिका नसाव्यात, असे मत व्यक्त केले. ठाणे येथील प्रवीण निसाळ, मुंबईचे प्रकाश देशमुख यांनीही यावेळी आपापली भूमिका मांडली.

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaharashtraमहाराष्ट्र