शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
2
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
3
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
4
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
5
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी निस्तब्ध पडून राहिली नवी नवरी
6
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
7
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
8
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
9
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
10
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
11
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
12
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
13
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
14
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
15
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
16
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
17
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
18
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
19
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
20
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."

रबरी शिक्के बनवून घेण्याची परवानगी द्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 19:18 IST

यापुर्वी प्रशासनाने गेल्या वर्षभरात किमान दहा ते बारा वेळेस पत्र पाठवून पाठपुरावा केला परंतु शाासनाकडून काहीच प्रतिसाद मिळालेला नाही. नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर यापुर्वीच्या सरकारने नेमणूक केलेल्या सर्व विशेष कार्यकारी अधिकारीपदावरील नियुक्त्या रद्द ठरविण्यात आल्या होत्या. त्यानंतर लोकप्रतिनिधींनी पालकमंत्र्यांकडे

ठळक मुद्देशासनाला विनंती : विशेष कार्य अधिका-यांकडून तगादानेमणूक सरकारच्या उदासिनतेमुळे निव्वळ कागदोपत्री

नाशिक : नवीन सरकार सत्तेवर येवून तीन वर्षे लोटल्यानंतर फारसे काही पदरात न पडता मिळालेले विशेष कार्यकारी अधिकारी पदावर झालेली नेमणूकही सरकारच्या उदासिनतेमुळे निव्वळ कागदोपत्री ठरली असून, सरकारी यंत्रणाही या नियुक्त्यांकडे फारसे गांभीर्याने पहात नसल्याने दररोज नियुक्तीचे प्रमाणपत्र व रबरी शिक्के घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात होणारी गर्दी पाहता आता प्रशासनानेच शासनाला पत्र पाठवून स्थानिक पातळीवर रबरी शिक्के तयार करून घेण्याची परवानगी द्या अशी विनंती केली आहे.यापुर्वी प्रशासनाने गेल्या वर्षभरात किमान दहा ते बारा वेळेस पत्र पाठवून पाठपुरावा केला परंतु शाासनाकडून काहीच प्रतिसाद मिळालेला नाही. नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर यापुर्वीच्या सरकारने नेमणूक केलेल्या सर्व विशेष कार्यकारी अधिकारीपदावरील नियुक्त्या रद्द ठरविण्यात आल्या होत्या. त्यानंतर लोकप्रतिनिधींनी पालकमंत्र्यांकडे शिफारशी केलेल्या कार्यकर्त्यांची या पदावर नेमणूक करण्यासाठी खटाटोप चालविला. साधारणत: दोन वर्षानंतर टप्पाटप्प्याने या पदावर नेमणूका करण्यात आल्या. त्यासाठी पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी, शैक्षणिक पात्रता याबाबींची तपासणी करण्यात आली. नाशिक जिल्ह्यात सुमारे चार हजाराच्या आसपास विशेष कार्यकारी अधिकाºयांच्या नेमणूका झाल्या असून, मात्र त्यापैकी जेमतेम पाचशे जणांनाच शासनाकडून शिक्के व प्रमाणपत्र मिळाले आहेत. समाजात मानाचे पद म्हणून मिरवून घेण्यासाठी विशेष कार्यकारी अधिकारीपद महत्वाचे असले तरी, शासनाकडूनच त्यांना प्रमाणपत्र व शिक्के देण्यात चालढकल केली जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्वच तहसिलदारांकडे अशा नेमणूका झालेल्या व्यक्ती दररोज चकरा मारत आहेत. या संदर्भात प्रशासनाने अनेकवार मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाशी संपर्क साधून रबरी शिक्के व प्रमाणपत्र देण्याची विनंती केली आहे. प्रत्येक वेळी फक्त आश्वासने देण्यात आली आहेत. विशेष कार्यकारी अधिकारी पदावर नेमणूक होऊन दिड ते दोन वर्षाचा कालावधी उलटूनही त्या पदाचा लाभ घेता येत नसल्याचे पाहून यापदावरील नियुक्त व्यक्तींचा धीर सुटत चालल्याचे पाहून अखेर गेल्या आठवड्यात प्रशासनाला पुन्हा पत्र पाठवून रबरी शिक्के वेळेत मिळणार नसतील तर स्थानिक पातळीवर तयार करून घेण्यासाठी तरी किमान अनुमती द्या, जेणे करून स्थानिक पातळीवर प्रशासन तयार करून घेईल किंवा संबंधित व्यक्ती स्वखर्चाने तयार करण्यासाठी उत्सूक असल्याचे कळविले आहे. परंतु त्याला अद्याप शासनाने प्रतिसाद दिलेला नाही.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक