शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

युतीच्या जागावाटपात आकडेच घालणार खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 19:38 IST

लोकसभा निवडणुकीच्या दरम्यानच युतीचे जागावाटप निश्चित झाल्याचा दावा शिवसेना करीत असून, त्यावेळी ठरल्यानुसार विधानसभेच्या फिफ्टी फिफ्टी जागा दोन्ही पक्ष लढवतील तर सत्तेतही समान वाटा सेनेला दिला जाईल, असे ठरले असल्याचे शिवसेनेच्या वतीने सांगितले जात आहे.

ठळक मुद्देसेना कमी जागा घेणार की भाजप स्वीकारणार १०-५ चा फार्म्यला?सेनेला १२० ते १२५ जागा देण्यास भाजप तयार

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-सेनेत फिफ्टी फिफ्टीचा फार्म्युला लागू होणार की, सेनेला १२० जागा देत भाजपा १६० जागा लढविणार असे जागावाटपाचे वेगवेगळे आकडे जाहीर होत असताना निवडणुकीत युती झाल्यास नाशिक जिल्ह्यातही भाजप-सेनेचे जागावाटप कसे असेल, या विषयीची उत्सुकता ताणली गेली आहे. २००९ मध्ये झालेल्या युतीच्या १०-५ जागावाटप यंदा भाजप स्वीकारणार की, शिवसेना कमी जागा घेऊन भाजपला चाल देणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या मोठ्या भावाच्या भूमिकेत वावरत असलेल्या भाजपकडून जिल्ह्यात आणखी दोन ते तीन अतिरिक्त जागांचा आग्रह धरला जात असून, त्यामुळे युतीच्या जागावाटपात आकडेच खोडा घालतील, असे दिसू लागले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या दरम्यानच युतीचे जागावाटप निश्चित झाल्याचा दावा शिवसेना करीत असून, त्यावेळी ठरल्यानुसार विधानसभेच्या फिफ्टी फिफ्टी जागा दोन्ही पक्ष लढवतील तर सत्तेतही समान वाटा सेनेला दिला जाईल, असे ठरले असल्याचे शिवसेनेच्या वतीने सांगितले जात आहे. शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी याची माहिती सर्वप्रथम प्रसिद्धी माध्यमांना दिली त्यानंतर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनीही त्याचा पुनरुच्चार केला आहे. प्रत्यक्षात विधानसभेसाठी भाजप सेनेला निम्म्या जागा देण्यास तयार नसल्याचे बोलले जात असून, सेनेला १२० ते १२५ जागा देण्यास भाजप तयार असल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे जागावाटपावरूनच युतीची अधिकृत घोषणा होत नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. राज्यपातळीवर जागावाटपात वेगवेगळे आकडे दररोज जाहीर होत असताना नाशिक जिल्ह्यातही भाजप व सेनेच्या इच्छुकांमध्ये जागा वाटपाच्या आकड्यांवरच चर्चा होत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी युती तुटल्याने दोन्ही पक्षांनी पंधराही मतदारसंघांत उमेदवार उभे केले. परंतु यंदा अजून तरी युतीची चर्चा सुरू असल्याने कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील त्याविषयी उत्सुकता आहे. सन २००९ मध्ये सेना-भाजप एकत्र लढल्यावर सेनेने दहा तर भाजपने पाच जागांवर निवडणूक लढविली होती. सेनेकडून जिल्ह्याच्या जागावाटपात त्याच फार्म्युल्याचा आग्रह धरला जाण्याची शक्यता असली तरी, प्राप्त परिस्थितीत भाजपची जिल्ह्यात ताकद वाढल्याचे निमित्त करून भाजप पाच जागा घेण्यास तयार होणार काय असा प्रश्न आहे. भाजपने जिल्ह्यातील पंधराही मतदारसंघांत इच्छुक उमेदवारांची चाचपणी केली असून, कळवण, नांदगाव, इगतपुरी मतदारसंघ पक्षाला मिळावे यासाठी इच्छुकांकडून पक्षावर दबाव आणला जात आहे. त्यामुळे भाजप १०-५ चे सूत्र स्वीकारणार की, सेना आपल्या ताब्यातील जागा भाजपला सोडणार यावरून आकडेवारीचा खेळ मांडला जात आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNashikनाशिक