शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण समितीची निवडप्रक्रिया सुरू करण्यात आल्याचा आरोप

By admin | Updated: April 26, 2015 01:35 IST

शिक्षण समितीची निवडप्रक्रिया सुरू करण्यात आल्याचा आरोप

नाशिक : महापालिका शिक्षण मंडळाचा कार्यकाल पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने आदेश जारी केला असतानादेखील या आदेशाला धाब्यावर बसवत शिक्षण समितीची निवडप्रक्रिया सुरू करण्यात आल्याचा आरोप या मंडळाच्या सदस्यांनी केला आहे. त्यामुळे सोमवारी आयोजित ही निवडप्रक्रियाच बेकायदा असल्याचा आरोप करण्यात आला असून, आता ही निवडप्रक्रिया पूर्ण होणार किंवा नाही याकडे पालिका वर्तुळाचे लक्ष लागून आहे.प्राथमिक शिक्षणाच्या अधिनियमानुसार शाळा मंडळे किंवा समित्यांचा कालावधी संपुष्टात आल्यानंतरच विसर्जित होतील, अशी तरतूद आहे. त्यामुळे विधी आणि न्याय विभागाने शिक्षण मंडळ अधिकाराबाबत दिलेल्या कायदेशीर सल्ल्यानुसार शिक्षण मंडळाचे कामकाज सुरू ठेवावे, असे पत्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी १ एप्रिल रोजी राज्यातील सर्व महापालिका आयुक्तांना पाठविले आहे. त्यामुळेच महापालिकेची निवडप्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा दावा संदीप भंवर, बाळासाहेब कोकणे यांनी केला आहे.महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१५ रोजी झाल्यानंतर नियमानुसार अगोदरच शिक्षण मंडळ बरखास्त करण्यात आले आणि नूतन सदस्यांची निवडणूक घेण्यात आली. ही प्रक्रिया बिनविरोध पार पडली; परंतु शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शिक्षण मंडळाचा उल्लेख नसल्याने राज्यातील सर्व शिक्षण मंडळे बरखास्त करण्यात आली. त्यासंदर्भात न्यायालयीन लढा सुरू असला, तरी राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे शिक्षण समिती नियुक्त करता येणे शक्य असल्याने त्या अनुषंगाने कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भात सोमवारी विशेष महासभा बोलविण्यात आली असून, त्यावर केवळ नगरसेवकांची वर्णी लागणार आहे. मुळातच आपली निवड वैधरीत्या झालेली असल्याने शिक्षण मंडळ बरखास्त करण्याचा अधिकार नाही, अशी अगोदरच निवडून आलेल्या शिक्षण मंडळ सदस्यांची भावना आहे. राज्य शासनाने मंडळ बरखास्तीचा वटहुकूम काढल्यानंतर तो विधिमंडळात संमत केला नाही, असे त्यांचे मुद्दे आहेत. त्यातच आता १ एप्रिल रोजी राज्य शासनाने सर्व महापालिकांना कळविलेल्या पत्राची प्रत या सदस्यांना मिळाली असून, त्या आधारे त्यांनी शासनाचे आदेश धाब्यावर बसवून राबविलेली ही प्रक्रियाच बेकायदेशीर असल्याचा आरोप केला आहे. (प्रतिनिधी)