शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
3
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
4
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
5
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
6
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
7
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
8
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
10
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
11
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
12
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
13
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
14
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
15
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
16
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
17
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
18
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
19
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
20
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)

शहरातील सर्वच बाजारपेठा खुल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 17:38 IST

नाशिक : मिशन बिगेन अगेन अंतर्गत शहरातील दुकाने सम विषम तारखांना खुली करण्याची परवानगी महापालिकेने दिल्यानंतर पहिल्याच दिवशी या नियमावलीचा फज्जा उडाला आहे. महानगरातील मेनरोड, एमजीरोड, रविवार कारंजा, सराफ बाजार, भांडीबाजार या सर्व मुख्य बाजारपेठेने शनिवारी दुपारी तब्बल अडीच महिन्यांनी वाहतूक कोंडीचा अनुभव घेतला. महानगरातील सर्व प्रमुख दुकाने, दालने पूर्ववत सुरू झाल्याने नागरिकांनी या मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी केल्याचे दिसून आले. त्यामुळे शहरातील सर्व रस्ते दुचाकी, चारचाकी वाहनांनी ओसंडून वहात होते.

ठळक मुद्देसम- विषमच्या नियमाचा फज्जा शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी 

नाशिक : मिशन बिगेन अगेन अंतर्गत शहरातील दुकाने सम विषम तारखांना खुली करण्याची परवानगी महापालिकेने दिल्यानंतर पहिल्याच दिवशी या नियमावलीचा फज्जा उडाला आहे. महानगरातील मेनरोड, एमजीरोड, रविवार कारंजा, सराफ बाजार, भांडीबाजार या सर्व मुख्य बाजारपेठेने शनिवारी दुपारी तब्बल अडीच महिन्यांनी वाहतूक कोंडीचा अनुभव घेतला. महानगरातील सर्व प्रमुख दुकाने, दालने पूर्ववत सुरू झाल्याने नागरिकांनी या मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी केल्याचे दिसून आले. त्यामुळे शहरातील सर्व रस्ते दुचाकी, चारचाकी वाहनांनी ओसंडून वहात होते.पावसाळ्याला प्रारंभ होण्यापूर्वीच्या या शनिवारी नागरिकांनी लॉकडाउन लागण्यापूर्वीच्या दिवसांसारखीच खरेदीसाठी गर्दी केली होती. नागरिकांनी प्रामुख्याने किराणा सामान, भाजी, फळे खरेदी त्याचबरोबर पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्र्या, रेनकोट खरेदीलादेखील प्राधान्य दिल्याचे दिसून येत होते. पावसाळ्यापूर्वीच्या खरेदीमध्ये नागरिकांकडून मेनरोडवरील बहुतांश दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी केली. प्रदीर्घ काळाने नागरिक खरेदीसाठी दुकानांमध्ये आल्याने दुकानदार, मालकांनीदेखील ग्राहकांची आपुलकीने चौकशी करीत त्यांच्याशी सुसंवाद साधत मालाची विक्री करीत होते. नाशिककरांनी लॉकडाउन काळात अत्यंत प्रभावीपणे पाळला. तसेच दुकानदारांनीदेखील प्रशासनाच्या निर्देशानुसार आणि मार्गदर्शनानुसार पूर्णपणे बंद पाळत प्रशासनाला सहकार्य केले. अखेरीस परवापासून दुकाने उघडण्यास प्रशासनाने मान्यता दिल्यानंतर कमी-अधिक प्रमाणात नागरिकांची गर्दी होऊ लागली होती. शनिवारी उद्योग क्षेत्राला सुटी असल्याने औद्योगिक क्षेत्रातील कामगार आणि कुटुंबीयांनी खरेदीसाठी झुंबड केली होती. उद्योग पुन्हा सुरळीतपणे सुरू झाल्याने कामगारांनादेखील आता हळूहळू सारे काही सुरळीत होईल, असे वाटू लागल्याने ग्राहकांची क्रयशक्तीतही सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच जीवनावश्यक वस्तूंबरोबरच अन्य गरजेच्या वस्तुंचीदेखील खरेदी केली जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या