शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

शहरातील सर्वच बाजारपेठा खुल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 17:38 IST

नाशिक : मिशन बिगेन अगेन अंतर्गत शहरातील दुकाने सम विषम तारखांना खुली करण्याची परवानगी महापालिकेने दिल्यानंतर पहिल्याच दिवशी या नियमावलीचा फज्जा उडाला आहे. महानगरातील मेनरोड, एमजीरोड, रविवार कारंजा, सराफ बाजार, भांडीबाजार या सर्व मुख्य बाजारपेठेने शनिवारी दुपारी तब्बल अडीच महिन्यांनी वाहतूक कोंडीचा अनुभव घेतला. महानगरातील सर्व प्रमुख दुकाने, दालने पूर्ववत सुरू झाल्याने नागरिकांनी या मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी केल्याचे दिसून आले. त्यामुळे शहरातील सर्व रस्ते दुचाकी, चारचाकी वाहनांनी ओसंडून वहात होते.

ठळक मुद्देसम- विषमच्या नियमाचा फज्जा शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी 

नाशिक : मिशन बिगेन अगेन अंतर्गत शहरातील दुकाने सम विषम तारखांना खुली करण्याची परवानगी महापालिकेने दिल्यानंतर पहिल्याच दिवशी या नियमावलीचा फज्जा उडाला आहे. महानगरातील मेनरोड, एमजीरोड, रविवार कारंजा, सराफ बाजार, भांडीबाजार या सर्व मुख्य बाजारपेठेने शनिवारी दुपारी तब्बल अडीच महिन्यांनी वाहतूक कोंडीचा अनुभव घेतला. महानगरातील सर्व प्रमुख दुकाने, दालने पूर्ववत सुरू झाल्याने नागरिकांनी या मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी केल्याचे दिसून आले. त्यामुळे शहरातील सर्व रस्ते दुचाकी, चारचाकी वाहनांनी ओसंडून वहात होते.पावसाळ्याला प्रारंभ होण्यापूर्वीच्या या शनिवारी नागरिकांनी लॉकडाउन लागण्यापूर्वीच्या दिवसांसारखीच खरेदीसाठी गर्दी केली होती. नागरिकांनी प्रामुख्याने किराणा सामान, भाजी, फळे खरेदी त्याचबरोबर पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्र्या, रेनकोट खरेदीलादेखील प्राधान्य दिल्याचे दिसून येत होते. पावसाळ्यापूर्वीच्या खरेदीमध्ये नागरिकांकडून मेनरोडवरील बहुतांश दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी केली. प्रदीर्घ काळाने नागरिक खरेदीसाठी दुकानांमध्ये आल्याने दुकानदार, मालकांनीदेखील ग्राहकांची आपुलकीने चौकशी करीत त्यांच्याशी सुसंवाद साधत मालाची विक्री करीत होते. नाशिककरांनी लॉकडाउन काळात अत्यंत प्रभावीपणे पाळला. तसेच दुकानदारांनीदेखील प्रशासनाच्या निर्देशानुसार आणि मार्गदर्शनानुसार पूर्णपणे बंद पाळत प्रशासनाला सहकार्य केले. अखेरीस परवापासून दुकाने उघडण्यास प्रशासनाने मान्यता दिल्यानंतर कमी-अधिक प्रमाणात नागरिकांची गर्दी होऊ लागली होती. शनिवारी उद्योग क्षेत्राला सुटी असल्याने औद्योगिक क्षेत्रातील कामगार आणि कुटुंबीयांनी खरेदीसाठी झुंबड केली होती. उद्योग पुन्हा सुरळीतपणे सुरू झाल्याने कामगारांनादेखील आता हळूहळू सारे काही सुरळीत होईल, असे वाटू लागल्याने ग्राहकांची क्रयशक्तीतही सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच जीवनावश्यक वस्तूंबरोबरच अन्य गरजेच्या वस्तुंचीदेखील खरेदी केली जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या