शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

मर्यादेत घेतल्यास मधुमेहींना सर्व आहार योग्यच : आदिती देशमाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 00:52 IST

मधुमेह झालेल्या रुग्णांच्या मनात आहाराविषयी खूपच भीती असते. मात्र मधुमेह झालेले रुग्ण इतर सर्वसामान्यांप्रमाणे सर्वकाही खाऊ शकतात, फक्त ते खाताना त्याचे प्रमाण ठरवायला हवे, असे मत कोल्हापूर येथील आहारतज्ज्ञ डॉ. आदिती देशमाने यांनी राज्यस्तरीय मधुमेह संमेलनात रविवारी (दि.१६) आयोजित चर्चासत्रात व्यक्त केले.

ठळक मुद्देराष्टÑीय मधुमेह संमेलनाचा समारोप

नाशिक : मधुमेह झालेल्या रुग्णांच्या मनात आहाराविषयी खूपच भीती असते. मात्र मधुमेह झालेले रुग्ण इतर सर्वसामान्यांप्रमाणे सर्वकाही खाऊ शकतात, फक्त ते खाताना त्याचे प्रमाण ठरवायला हवे, असे मत कोल्हापूर येथील आहारतज्ज्ञ डॉ. आदिती देशमाने यांनी राज्यस्तरीय मधुमेह संमेलनात रविवारी (दि.१६) आयोजित चर्चासत्रात व्यक्त केले.या चर्चासत्रात मधुमेह रुग्णांच्या आहाराविषयी चर्चा झाली. यावेळी डॉ. आदिती देशमाने म्हणाल्या, आहाराविषयी मधुमेहाचे रुग्ण वेगवेगळ्या शंका व्यक्त करतात. भात, भाकरी, दूध याविषयी त्यांच्या मनात वेगवेगळ्या शंका असतात. परंतु मधुमेहाचे रुग्णही सर्वकाही खाऊ शकतात. यासाठी आपली जीवनशैली, वजन, उंची यांचा विचार करून खायचे प्रमाण ठरवायला हवे.तूप हा सिंग्ध पदार्थ आहे त्यामुळे त्यात प्रोटीन्स असतात. यामुळे अमुक एक प्रकारचेच तूप घ्यावे असे नाही तर कुठलेही तूप योग्य प्रमाणात घेतले तर ते चालते, असे त्या म्हणाल्या. यावेळी नागरिकांनी उपस्थित केलेल्या शंकांचे त्यांनी समाधान केले. यानंतर संमेलनाचा समारोप झाला. समारोपप्रसंगी डॉ. नारायण देवगावकर, डॉ. वसंत कुमार, डॉ. समीर चंद्रात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांची भाषणे झाली. त्यानंतर संमेलनासाठी परिश्रम घेणाऱ्या डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. तीन दिवस चाललेल्या या संमेलनात राज्यभरातील डॉक्टरांनी हजेरी लावली. समारोप सत्रानंतर नागरिकांसाठी शरद उपाध्ये यांच्या राशीचक्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कोरोना विषाणूबाबत दिली माहितीमुंबई येथील डॉ. संदीप राय यांनी एका चर्चासत्रात कोरोना विषाणूबाबत माहिती दिली. कोरोना व्हायरस अद्याप भारतात पसरलेला नाही, मात्र तो पसरू नये यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी. ज्याला कोरोना झाला आहे त्याच्या शिंकेवाटे, खोकल्यामुळे विषाणू बाहेर पडतात व ते आपल्या आजूबाजूला साचतात. अशा वस्तूंशी आपला संपर्क आला व तेच हात आपल्या नाका-तोंडाला लागल्यास आपल्याला या विषाणूची लागण होऊ शकते. यासाठी दिवसातून पाच-सहा वेळा हात स्वच्छ धुवा, आपल्या परिसरात स्वच्छता पाळा असा सल्ला त्यांनी दिला.

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य