शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

दारणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 18:35 IST

गेल्या चार दिवसांपासून इगतपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस होत असल्यामुळे दारणा धरणाच्या पाण्याची पातळी ८७ टक्क्यापेक्षा अधिक वाढली आहे. त्यातच नाशिक तालुक्यात दारणाकाठच्या भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने नदी, नाले तुडुंब भरून वाहत

ठळक मुद्देधोक्याची पातळी : शेणीत पूल वाहतुकीसाठी खुलास्मशानभूमींना पाण्याने वेढा दिला आहे. तर नदीकाठची मंदिरे पाण्यात बुडाली

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : पावसाची संततधार सुरू असल्याने दारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाढ झाल्याने धरणातून दुसऱ्या दिवशीही १३ हजारांहून अधिक क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भगूर-इगतपुरी दरम्यानच्या शेणीत येथील पुलावरून पाणी वाहू लागल्याने सोमवारी सायंकाळी बंद करण्यात आलेली वाहतूक मंगळवारी पूर्ववत सुरू करण्यात आली.

गेल्या चार दिवसांपासून इगतपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस होत असल्यामुळे दारणा धरणाच्या पाण्याची पातळी ८७ टक्क्यापेक्षा अधिक वाढली आहे. त्यातच नाशिक तालुक्यात दारणाकाठच्या भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. धरणाचा धोका टाळण्यासाठी सोमवारी दुपारपासून धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे दारणा नदीला पूर आला असून, सोमवारी सायंकाळनंतर भगूर-इगतपुरी मार्गावरील शेणीत जवळील पुलावरून पाणी वाहू लागल्याने पोलीस पाटील यांनी पोलीस प्रशासनाला माहिती दिल्यानंतर तातडीने पुलावर बंदोबस्त तैनात करण्यात आला. या मार्गावरील वाहतूक बंद झाल्यामुळे भगूरहुन इगतपुरीकडे जाणा-या सुमारे पंचवीस खेड्यांची वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांना पांढुर्ली मार्गे राष्ट्रीय महामार्गाचा वापर करत घोटी मार्गाने जावे लागले.गेल्या चार वर्षांनंतर या पुलावरून पाणी गेल्याने आजूबाजूच्या शेतांमध्येही पाणी घुसले व चालू पिकांचे नुकसान झाले आहे. याशिवाय दारणाकाठच्या साकूर, लोहशिंगवे, वंजारवाडी, भगूर, राहुरी, दोनवाडे, बेलतगव्हाण, नानेगाव या गावांच्या स्मशानभूमींना पाण्याने वेढा दिला आहे. तर नदीकाठची मंदिरे पाण्यात बुडाली आहेत. मंगळवारी दुपारनंतर पावसाने काहीकाळ विश्रांती घेतल्याने सकाळपासूनच शेणीत पुलावरील वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र दारणा नदीचा पूर कायम आहे.

 

टॅग्स :RainपाऊसNashikनाशिक