शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

देशाच्या सीमा रक्षणासाठी वायुसेना सक्षम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 01:43 IST

बदलत्या आंतराराष्ट्रीय घडामोडींचे परिणाम देशाच्या सीमा भागातही उमटतात. त्यामुळे देशाच्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी सैन्याला सदैव तत्पर राहवे लागते.

नाशिक : बदलत्या आंतराराष्ट्रीय घडामोडींचे परिणाम देशाच्या सीमा भागातही उमटतात. त्यामुळे देशाच्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी सैन्याला सदैव तत्पर राहवे लागते. अशाप्रकारची कोणतीही स्थिती भारत-पाक अथवा भारत चीन सीमेवर उद्भवली, तर भारतीय वायुसेना दोन्ही आघाड्या सांभाळण्यास सक्षम आहे. वायुसेनेची ही ताकद कायम अद्यावत ठेवण्यासाठी २९ एप्रिल १९७४ पासून अविरत कार्यरत असलेल्या ११ बेस रिपेअर डेपोत ५० टक्के मीग २९ विमानांचे अद्यावतीकरण पूर्ण झाले आहे, तर सुखोई ३० एमकेआय विमानाचे संपूर्ण ओव्हर्लिंग करून २४ एप्रिल २०१८ रोजी यशस्वी उड्डाणही करण्यात आल्याने वायुसेनेला आणखी बळ मिळाले असून, कोणत्याही संकटाचा सामना करण्यास वायुसेना सक्षम असल्याचे ११ बीआरडीचे आॅफिसर एअर कमोडोर समीर बोराडे यांनी सांगितले.भारतीय वायुसेनेच्या ८६व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी (दि.२८ ) वायुसेनच्या ओझर येथील ११ बेस रिपेअर डेपोमध्ये प्रसारमाध्यमांना भारतीय वायुसेना व त्यांच्या कार्यपद्धतीची प्रसारमाध्यमांना माहिती देण्यात आली. यावेळी ११ बेस रिपेअर डेपोमध्ये सध्या सुरू असलेल्या मीग २९ व सुखोई ३० एमकेआय या लढाऊ विमानांची दुरुस्ती व देखभाल प्रक्रियेविषयी माहिती देतानाच लढाऊ विमानांच्या कार्यक्षमतेत व आयुर्मान वाढविण्यासाठी सुरू असलेल्या अपग्रेडेशन (अद्यावतीकरण) प्रक्रियेची माहितीही त्यांनी यावेळी दिली. ओझर येथे २९ एप्रिल १९७३ बीआरडीची सुरुवात मीग २९ व सुखोई एमकेआय डेपो या नावाने झाल्यानंतर १ जानेवारी १९७५ला ११बेस रिपेअर डेपो असे नामकरण झालेल्या या देखभाल दुरुस्ती केंद्रात १०८८ पर्यंत एसयू सात विमानांची देखभाल दुरुस्ती करण्यात आली. १९८३ ते ८८ पर्यंत मीग २१ व २८ विमानांची देखभाल दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतर मीग २३ विमानांची देखभाल दुरुस्तीचीही व्यवस्था करण्यात आली. मे १९८८ मध्ये मीग २३ दुरुस्तीचे काम सुरू झालेय २४८ मीग २३ विमानांची संपूर्ण देखभाल दुरुस्ती केल्यानंतर मे २०१५ मध्ये सक्वॉर्डनमध्ये पाठविण्यात आले. मीग २९ विमानचे काम १९९६ मध्ये ११बीआरडीला मिळाल्यानंतर आतापर्यंत ५०टक्के विमानांचे अद्यावतीकरणही करण्यात आल्याने विमानांची क्षमता पूर्वीपासून दुपटीने वाढली असून, आयुर्मानही ४० वर्षांनी वाढले आहे. दरम्यान, लवकरच येथे मोठा कार्यक्रम होणार असल्याचे सांगताना ११ बीआरडीला आणखी वेगळे आणि आव्हानात्मक काम मिळण्याचे संकेतही समीर बोराडे यांनी दिले.स्वावलंबनाकडे वाटचाल११ बीआरडी येथे लढाऊ विमानांचे अंडर कॅरेज, गियर व्हील, सुखोई ३०च्या इजेक्शन सीट निर्मिती यशस्वीरीत्या केली असून, हे पाट केवळ ओझर येथेच तयार केले जातात. अशाप्रकारे विमानाचे पार्ट तयार करून वायुसेना स्वावलंबी होण्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे एअर कमोडोर समीर बोराडे यांनी सांगितले.कौशल्य विकासाला चालनाओझर येथील ११ बीआरडीमध्ये लढाऊ विमानांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी कौशल्य निपून मनुष्यबळाची आवश्यकता अहे. त्यासाठी बीआरडीमार्फत अभियांत्रिकीच्या विद्यार्थिंना विशेष कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षणही देण्यात येत असून, विविध शालेय भेटींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकासासाठी प्रयत्न केले जातात.११ बीआरडीमध्ये सध्या मीग २९ आणि सुखोई ३० एमकेआय विमानांच्या देखभाल दुरुस्तीसाठी लागणाऱ्या ९० टक्के सुट्या भागांची निर्मिती देशातच होते. त्यामुळे विमानांच्या देखभाल दुरुस्तीसाठी भारत स्वयंपूर्ण होत असून, स्थानिक उद्योगांनाही काम मिळत आहे. ११ बीआरडीमुळे नाशिकमधील जवळपास ५० लहान-मोठ्या उद्योगांना विमानाचे लहान-मोठे वेगवेगळे सुट्टे भाग बनविण्याचे काम मिळत असल्याने स्थानिक उद्योग विकासालाही यामुळे चालना मिळण्यात मदत होते.-समीर बोराडे, कमांडिंग आॅफिसर, ११ बीआरडी, ओझर

टॅग्स :airforceहवाईदलindian air forceभारतीय हवाई दल