शहरं
Join us  
Trending Stories
1
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
2
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
3
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
4
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
5
रशियन लोकांना तुर्की आवडत नाही? दोन वर्षांत तुर्कस्तानातील रशियन लोकसंख्या अर्ध्यावर!
6
हिमालयातलं पाणी बॉटलमधून विकतेय अभिनेत्री, एका बाटलीची किंमत वाचून झोप उडेल
7
नवऱ्याशी भांडल्यावर बायकोने दीड वर्षांच्या मुलाला दुसऱ्या मजल्यावरुन फेकलं, झाला मृत्यू
8
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
9
अनेक वर्षांनी कार्यकर्ता भेटला तरी नावाने हाक मारणारे शरद पवार ‘ती’ नावे कसे विसरले?
10
यासिन मलिकच्या घरासह श्रीनगरमध्ये ८ ठिकाणी छापे; ३५ वर्षे जुन्या सरला भट्ट हत्या प्रकरणात कारवाई
11
"मला दोन मिनिटांतच समजेल..., भारतावर लादलेल्या टॅरिफने..."; अलास्कातील बैठकीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा! 
12
सोने खरेदीची सुवर्णसंधी! एकाच दिवसात सोने १४०० रुपयांनी स्वस्त, ट्रम्प यांच्या घोषणेचा परिणाम!
13
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
14
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
15
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
16
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
17
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
18
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
19
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
20
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'

कृषी ग्राहकांकडे २२०० कोटींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 01:37 IST

नाशिक : वीजपुरवठा आणि पायाभूत सुविधांबाबत लोकप्रतिनिधींनी केलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी महावितरण अधिकाºयांची स्वतंत्रपणे बैठक घेतली असता महावितरणने कृषी क्षेत्राकडून वीजबिलांची वसुली होत नसल्याने सुमारे २२०० कोटींची थकबाकी असल्याचे कारण पुढे केलेच शिवाय पायाभूत सुविधांसाठी लागणाºया निधीचीही कारणे सांगितल्याने महावितरणच्या अडचणींच्या आधारे कृती आराखडा तयार केला जाणार आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा : महावितरणने केली हतबलता व्यक्त

नाशिक : वीजपुरवठा आणि पायाभूत सुविधांबाबत लोकप्रतिनिधींनी केलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी महावितरण अधिकाºयांची स्वतंत्रपणे बैठक घेतली असता महावितरणने कृषी क्षेत्राकडून वीजबिलांची वसुली होत नसल्याने सुमारे २२०० कोटींची थकबाकी असल्याचे कारण पुढे केलेच शिवाय पायाभूत सुविधांसाठी लागणाºया निधीचीही कारणे सांगितल्याने महावितरणच्या अडचणींच्या आधारे कृती आराखडा तयार केला जाणार आहे.मागील महिन्यात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी महावितरणच्या कारभारावर प्रचंड नाराजी व्यक्त करीत अनेक अडचणी मांडल्या होत्या. सुमारे नऊ प्रकारच्या अडचणी लोकप्रतिनिधींनी कथन केल्या होत्या. वीजपुरवठा, अपूर्ण पायाभूत सुविधा, जीर्ण झालेले खांबल उपकेंद्र आणि विद्युत रोहित्राचा तुटवडा अशा तक्रारींचा पाऊसच नियोजन समितीच्या बैठकीत पडला होता. महावितरणकडून होणारी अडवणूक आणि अपुºया वीजपुरवठ्यामुळे शेतकºयांच्या अडचणींबाबत जिल्ह्यातील आमदारांनी आपापल्या मतदारसंघातील महावितरणचा निष्काळजीपणा उघड केला होता. सातत्याने मागणी करूनही अधिकाºयांकडून ठोस माहिती दिली जात नव्हतीच शिवाय विजेसंदर्भातील कामांबाबत होणाºया दिरंगाईवरही आमदारांचे समाधान होत नसल्याचे चित्र दिसून आले. (पान ५ वर)कृषी क्षेत्राची अपेक्षित वसुली नाहीनियोजन समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी नवीन उपकेंद्रे, ट्रान्सफॉर्मर, आॅइल, शेतकºयांसाठी सिंगल फेज, जीर्ण पोल, वीज फीडर यासंदर्भात केलेल्या तक्रारींची माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी महावितरण अधिकाºयांशी चर्चा केली असता. महावितरणने आपल्या अडचणी सांगताना औद्योगिक आणि घरगुती ग्राहकांपेक्षा कृषी क्षेत्राकडून अपेक्षित वीजबिल वसुली होत नसल्याचे सांगितले. प्रत्यक्षात केवळ ६ टक्केच वसुलीसुमारे ३०० कोटींच्या वीजबिल वसुलीचे उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात केवळ ५ ते ६ टक्के इतकीच वीजबिलांची वसुली होते, असे सांगण्यात आले. जिल्हाधिकाºयांनी अन्य प्रश्नांवरील अधिकाºयांचे म्हणणे ऐकून घेतले .

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी