शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

तब्बल पन्नास वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पारधी वस्तीवर पोहचली वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 18:11 IST

सर्वतीर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागातील खेड ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या वार्ड क्र मांक ५ मधील पारधी वस्ती येथे शुक्र वारी (दि.९) तब्बल पन्नास वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पहिल्यांदाच वीजेचे दिवे लागल्याने येथील आदिवासी नागरिकांची जणू प्रथमच दिवाळी साजरी होत असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देआदिवासी नागरिकांची साजरी होतेय पहिलीच दिवाळी

सर्वतीर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागातील खेड ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या वार्ड क्र मांक ५ मधील पारधी वस्ती येथे शुक्र वारी (दि.९) तब्बल पन्नास वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पहिल्यांदाच वीजेचे दिवे लागल्याने येथील आदिवासी नागरिकांची जणू प्रथमच दिवाळी साजरी होत असल्याचे चित्र आहे.गावापासून अगदी अर्धा किलोमीटर अंतरावर ५० ते ६० लोकसंख्येची वस्ती असलेल्या या परिसरात वीज पन्नास वर्षांपूर्वी वितरित झाली होती. मात्र महावितरणच्या हलगर्जीपणामुळे आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे गेल्या पन्नास वर्षांपासून येथील नागरिक अंधारातच राहत होते.येथील नागरिकांनी वीजे संदर्भात वेळोवेळी शासन दरबारी हेलपाटे मारून, निवेदने देऊन व लोकप्रतिनिधींकडे समस्या मांडूनही या समस्येकडे दुर्लक्षच होत गेले. निवडणुकीच्या वेळी फक्त आश्वासने मिळत गेली, मात्र तरी येथे महावितरणची वीज पोहोचू शकली नव्हती.पारधी वस्तीवरील नागरिकांनी व येथील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदींनी विधानसभा निवडणुकीपासून या समस्येच्या संदर्भात वेळोवेळी आमदार माणिक कोकाटे यांच्याकडे मागणी केली होती. या समस्येची दखल घेत त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरून या ठिकाणी वीज पोहचवलीगेल्याने येथील आदिवासी नागरिक समाधान व्यक्त करीत आहे....अन आदिवासींची जणू दिवाळीचगेल्या पन्नास वर्षांपासून पारधी वस्तीवर वीज पोहोचली नसल्याने येथील आदिवासी नागरिकांना रात्र अंधारातच काढावी लागत होती. तसेच विजेवर चालणारी उपकरणे वापरता येत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत होती त्यामुळे या ठिकाणी वीज पोहचल्याने येथे पहिलीच दिवाळी साजरी होत असल्याचे चित्र आहे.आमच्या परिसरात गेल्या पन्नास वर्षांपूर्वी च वीज पोहचली होती मात्र आमच्या वस्तीवर महावितरण च्या दुर्लक्षामुळे वीज पोहचत नव्हती आम्ही वेळोवेळी शासन दरबारी व लोकप्रतिनिधींकडे मागणी करूनही आज पर्यंत वीज पोहचत नव्हती. या संदर्भात आमदार कोकाटे यांच्याकडे मागणी केली होती याची दखल घेत आमच्या वस्तीवर पन्नास वर्षांनंतर वीज पोहोचल्याने आनंद व्यक्त होत आहे.- हिरामण पारधी,

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकासelectricityवीज