शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

तब्बल पन्नास वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पारधी वस्तीवर पोहचली वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 18:11 IST

सर्वतीर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागातील खेड ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या वार्ड क्र मांक ५ मधील पारधी वस्ती येथे शुक्र वारी (दि.९) तब्बल पन्नास वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पहिल्यांदाच वीजेचे दिवे लागल्याने येथील आदिवासी नागरिकांची जणू प्रथमच दिवाळी साजरी होत असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देआदिवासी नागरिकांची साजरी होतेय पहिलीच दिवाळी

सर्वतीर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागातील खेड ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या वार्ड क्र मांक ५ मधील पारधी वस्ती येथे शुक्र वारी (दि.९) तब्बल पन्नास वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पहिल्यांदाच वीजेचे दिवे लागल्याने येथील आदिवासी नागरिकांची जणू प्रथमच दिवाळी साजरी होत असल्याचे चित्र आहे.गावापासून अगदी अर्धा किलोमीटर अंतरावर ५० ते ६० लोकसंख्येची वस्ती असलेल्या या परिसरात वीज पन्नास वर्षांपूर्वी वितरित झाली होती. मात्र महावितरणच्या हलगर्जीपणामुळे आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे गेल्या पन्नास वर्षांपासून येथील नागरिक अंधारातच राहत होते.येथील नागरिकांनी वीजे संदर्भात वेळोवेळी शासन दरबारी हेलपाटे मारून, निवेदने देऊन व लोकप्रतिनिधींकडे समस्या मांडूनही या समस्येकडे दुर्लक्षच होत गेले. निवडणुकीच्या वेळी फक्त आश्वासने मिळत गेली, मात्र तरी येथे महावितरणची वीज पोहोचू शकली नव्हती.पारधी वस्तीवरील नागरिकांनी व येथील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदींनी विधानसभा निवडणुकीपासून या समस्येच्या संदर्भात वेळोवेळी आमदार माणिक कोकाटे यांच्याकडे मागणी केली होती. या समस्येची दखल घेत त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरून या ठिकाणी वीज पोहचवलीगेल्याने येथील आदिवासी नागरिक समाधान व्यक्त करीत आहे....अन आदिवासींची जणू दिवाळीचगेल्या पन्नास वर्षांपासून पारधी वस्तीवर वीज पोहोचली नसल्याने येथील आदिवासी नागरिकांना रात्र अंधारातच काढावी लागत होती. तसेच विजेवर चालणारी उपकरणे वापरता येत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत होती त्यामुळे या ठिकाणी वीज पोहचल्याने येथे पहिलीच दिवाळी साजरी होत असल्याचे चित्र आहे.आमच्या परिसरात गेल्या पन्नास वर्षांपूर्वी च वीज पोहचली होती मात्र आमच्या वस्तीवर महावितरण च्या दुर्लक्षामुळे वीज पोहचत नव्हती आम्ही वेळोवेळी शासन दरबारी व लोकप्रतिनिधींकडे मागणी करूनही आज पर्यंत वीज पोहचत नव्हती. या संदर्भात आमदार कोकाटे यांच्याकडे मागणी केली होती याची दखल घेत आमच्या वस्तीवर पन्नास वर्षांनंतर वीज पोहोचल्याने आनंद व्यक्त होत आहे.- हिरामण पारधी,

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकासelectricityवीज