शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

अडीच वर्षांनी मिळाले निवडणूक कामाचे मानधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 18:00 IST

राज्यात विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक आॅक्टोंबर २०१४ मध्ये घेण्यात आली. या निवडणुकीची संपुर्ण प्रक्रिया पार पाडण्याची मुख्यत्वे जबाबदारी जिल्हाधिकाºयांची असली तरी, प्रत्येक विधानसभा मतदार संघ निहाय निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक अधिका-यांची निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार नियुक्ती करण्यात आली होती

ठळक मुद्देएक कोटीचा निधी : अधिका-यांच्या खात्यावर जमा मासिक वेतनाच्या बेसिक इतके निवडणूक मानधन

नाशिक : राज्यात सत्तांतर घडवून आणणाºया सन २०१४ मध्ये पार पडलेल्या राज्य विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात दिवस-रात्र काम करणा-या निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक अधिका-यांना तब्बल अडीच वर्षानंतर त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला सरकारने अदा केला आहे. राज्य निवडणूक आयोगाकडे शासनाने पैसे वर्ग केल्यानंतर निवडणूक अधिका-यांना त्यांचे मानधन मिळाले आहे.राज्यात विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक आॅक्टोंबर २०१४ मध्ये घेण्यात आली. या निवडणुकीची संपुर्ण प्रक्रिया पार पाडण्याची मुख्यत्वे जबाबदारी जिल्हाधिकाºयांची असली तरी, प्रत्येक विधानसभा मतदार संघ निहाय निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक अधिका-यांची निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार नियुक्ती करण्यात आली होती. साधारणत: उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिका-याची निवडणूक निर्णय अधिकारी तर तहसिलदारांना सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून नेमण्यात आल्याने निवडणुकीचे नामांकन स्विकारणे, छाननी करणे, उमेदवारांची अंतीम यादी प्रसिद्ध करणे, माघारी, निवडणूक चिन्हाचे वाटप या सारखे सर्व कामे आटोपून मतदान केंद्राची निश्चिती, मतदान साहित्य, कर्मचा-यांनी नेमणूक, प्रशिक्षण, प्रत्यक्ष मतदान व त्यानंतर मतमोजणी अशी शेकडो कामे करणा-या निवडणूक अधिका-यांना त्यांच्या मासिक वेतनाच्या बेसिक इतके निवडणूक मानधन देण्याचेही जाहीर करण्यात आले होते. प्रत्यक्षात निवडणूक पार पडून अडीच वर्षाचा कालावधी उलटला तरी, आयोगाकडून मानधनापोटी द्यावयाच्या रकमेची तरतुद केली जात नसल्याने राज्यातील निवडणूक अधिका-यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात होती. सध्या सन २०१९ मध्ये होऊ घातलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीची प्रशासकीय व राजकीय पातळीवर तयारी सुरू झालेली असल्याचे पाहून अलिकडेच शासनाने आयोगाला निधी उपलब्ध करून दिल्यानंतर सर्व निवडणुक अधिका-यांना त्यांच्या मानधनाची रक्कम बॅँक खात्यात जमा करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यासाठी शासनाने एक कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :ElectionनिवडणूकNashikनाशिक