शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
2
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
3
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
4
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
5
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
6
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?
7
"4 दिवसांचं युद्ध..."; पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनीही PM शहबाज शरीफ यांच्या मोठ-मोठ्या बढाया, भारताविरोधात काय काय बोलले?
8
Janmashtami 2025: ढाक्कु माकुम ढाक्कु माकुम; 'या' राशींना फळणार गोपाळकाला, काय होणार लाभ?
9
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
10
शाहरुख खानचा 'किंग' पुढे ढकलला, काय आहे कारण? लेकीचा वडिलांसोबत पहिलाच सिनेमा
11
बायडेन यांच्या मुलानं असं काय म्हटलं की ट्रम्पच्या पत्नीला आला भयंकर राग; पाठवली १ अरब डॉलर्सची नोटिस
12
Sawaliya Foods Products shares: लिस्ट होताच IPO नं दिला १००% चा रिटर्न; पहिल्याच दिवशी दुप्पट झाले गुंतवणुकदारांचे पैसे
13
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
14
अर्जुन तेंडुलकर-सानिया जोडी जमली! या क्रिकेटर्सप्रमाणे त्याची कारकिर्दही बहरणार का?
15
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा
16
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
17
Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
18
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
19
त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट
20
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!

शरद पवारांच्या दौऱ्यानंतर शासकीय यंत्रणा जागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 22:53 IST

कळवण : तालुक्यात परतीच्या पावसाने शेतकºयांचं मोठं नुकसान झाल आहे. अनेक हाता-तोंडाशी आलेली पिकं वाया गेली. या नुकसानग्रस्त शेतकºयांना दिलासा देण्यासाठी आणि पिकांची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आमदार नितीन पवार हे थेट शेतकºयांच्या बांधावर दाखल झाल्यानंतर शासकीय यंत्रणा जागी झाली असून रविवारी यंत्रणेने दह्याणे पाळे, विठेवाडी परिसरात पाहणी केली.

ठळक मुद्देकळवण : तालुक्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच मोठं नुकसान

कळवण : तालुक्यात परतीच्या पावसाने शेतकºयांचं मोठं नुकसान झाल आहे. अनेक हाता-तोंडाशी आलेली पिकं वाया गेली. या नुकसानग्रस्त शेतकºयांना दिलासा देण्यासाठी आणि पिकांची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आमदार नितीन पवार हे थेट शेतकºयांच्या बांधावर दाखल झाल्यानंतर शासकीय यंत्रणा जागी झाली असून रविवारी यंत्रणेने दह्याणे पाळे, विठेवाडी परिसरात पाहणी केली.आमदार नितीन पवारांनी चार दिवसापूर्वी नुकसानीचा अहवाल शरद पवार यांना सादर करु न कळवण तालुक्यातील शेतकर्यांच्या समस्याकडे लक्ष वेधून घेतले होते. या पाशर््वभूमीवर शरद पवार यांच्या कळवण दौर्याला विशेष महत्व प्राप्त झाले होते. पवारांच्या दौर्यानंतर शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आमदार पवारांनी पाच दिवसापूर्वी तालुक्यात दौरा करु न नुकसानीची पहाणी करु न महसूल व कृषी यंत्रणेला वस्तुनिष्ठ पंचनामे करु न बांधावर जाऊन परिस्थिती जाणून घेण्याची सूचना केली होती.कळवण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासुन सुरु असलेल्या अवकाळी पावसाने शेतकरÞ्यांचा तोंडचा घास हिरावला असुन शेतीपिकांचे मोठे नुकसान झालेले असल्याने सरकारने योग्य ती मदत शेतकरÞ्यांना तातडीने करावी अशी मागणी आमदार नितीन पवार, यांनी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्याकडे केली आहे. आज जिल्हा परिषद सदस्य यशवंत गवळी, तहसीलदार बी ए कापसे, गटविकास अधिकारी डी एम बिहरम तालुका कृषी अधिकारी विजय पाटील यांनी दह्याणे पाळे येथील पांडुरंग रामभाऊ पाटील यांच्या मका व विठेवाडी येथील जयवंताबाई नामदेव गवळी यांच्या सोयाबीन, व पंढरीनाथ लक्षमण गवळी यांच्या कांदे रोपाची पहाणी केली.अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतिपकामध्ये गुडघाभर पाणी साचले असून अनेक शेतकर्यांच्या शेतात पाणी घुसल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान असून मका, सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी खळ्यांवर काढून ठेवलेल्या मक्याची कणसे, सोयाबीन पाण्यात सडणार आहे.पावसाळी वातावरण सलग आठ दिवस कायम राहील्याने कळवण तालुक्यातील शेतीपिके धोक्यात आले आहेत. या वातावरणामुळे शेती आण िशेतकरी दोन्ही संकटात सापडले आहेत.शेतीपिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतकरी हवालिदल झाला आहे सोयाबीन, बाजरी,ज्वारी, मका पिकांना कोंब फुटले असून हाताशी आलेला घास गेला आहे. परतीच्या या पावसाचा रब्बी पिकांना फायदा होणार असला तरी या पावसाचा सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरी अशा बहरलेल्या खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. खिरपातील पिके हाता-तोंडाशी आल्यानंतर सतत पडणार्या या पावसामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस