शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

पाच महिन्यांनंतर पंचवटी एक्सप्रेस मुंबईकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 00:14 IST

मनमाड: मनमाड कारांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसला शनिवारी हिरवा कंदील दाखवण्यात आल्याने तब्बल साडे पाच महिन्यांच्या विश्रांती नंतर सदरची गाडी मुंबईकडे रवाना झाली .

ठळक मुद्देचाकरमान्यांमध्ये समाधान : मनमाडकरांच्या जीवन वाहिनीला हिरवा कंदील!

मनमाड: मनमाड कारांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसला शनिवारी हिरवा कंदील दाखवण्यात आल्याने तब्बल साडे पाच महिन्यांच्या विश्रांती नंतर सदरची गाडी मुंबईकडे रवाना झाली .शनिवारपासून गाडी क्रमांक ०२११० मनमाड - मुंबई व ०२१०९ मुबई मनमाड या विशेष गाड्या सुरू करण्यात आल्याने चाकरमान्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर हळूहळू रेल्वे आपली सेवा सुरू करत आहे. प्रवासी कामगारांसाठी आधी रेल्वे सेवा सुरू करण्यात आली होती.आजपासून आणखी ८० गाड्या सुरू करण्यात आल्या आहे. त्यामध्ये देशात निर्माण झालेल्या कोरोना विषाणूच्या प्रभावा मुळे देशातील संपूर्ण रेल्वे सेवाच इतिहासात पहिल्यांदाच थांबण्यात आली होती. रेल्वे सेवा थांबल्याने संपुर्ण देशातील अनेक प्रवासी नागरिकांना या काळात खुप अडचणी सहन कराव्या लागल्या होत्या.परंतु आता भारतीय रेल्वे मंडळ हे टप्या-टप्या ने देशातील आणि राज्यातील रेल्वे सेवा सुरू करून पूर्वी प्रमाणे रेल्वे रुळावर येत आहे. मनमाड ते मुंबई रेल्वे प्रवास करणाºया हजारो नागरिकांची रोजची जीवन वाहिनी असणारी पंचवटी एक्सप्रेस ही सुरू झाली . तब्बल साडेपाच महिन्यांच्या विश्रांती नंतर आज मनमाड हुन मुंबई च्या दिशेने पंचवटी एक्सप्रेस रवाना झाली. या गाडीत फक्त आरक्षण करूनच प्रवास करता येणार आहे.सर्व साधारण तिकीट आणि मासिक पास काढून प्रवाशांना प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. (१२ मनमाड १/२/३)

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेTravel Tipsट्रॅव्हल टिप्स