शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

अंतराच्या मुद्द्यावरून बाद अर्ज दोन दिवसांनी वैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 01:31 IST

आरटीई अंतर्गत प्रवेश मिळविण्यासाठी काही पालकांनी अर्ज करताना खोटा पत्ता व चुकीचे अंतर नमूद केली होती. या चुकीच्या माहितीच्या आधारावर पहिल्या यादीत निवड झालेल्या अर्जांवर निवड न झालेल्या पालकांनी आक्षेप घेतला होता.

नाशिक : आरटीई अंतर्गत प्रवेश मिळविण्यासाठी काही पालकांनी अर्ज करताना खोटा पत्ता व चुकीचे अंतर नमूद केली होती. या चुकीच्या माहितीच्या आधारावर पहिल्या यादीत निवड झालेल्या अर्जांवर निवड न झालेल्या पालकांनी आक्षेप घेतला होता. याप्रकरणी गुरुगोविंदसिंग शाळेतील पडताळणी केंद्रावर पडताळणी समितीने दोन दिवसांपूर्वी नाकारलेला अर्ज पुन्हा वैध ठरविल्याचा आरोप महापालिक ा शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकाऱ्यांकडे करण्यात आली.आरटीई अंतर्गत आपल्या पाल्यास प्रवेश मिळावा, यासाठी काही पालकांनी प्रवेश अर्जात खोटे पत्ते तसेच खोटे अंतर नमूद केल्याचे निदर्शनास आले आहे. विशिष्ट शाळेतच प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या घराचे प्रत्यक्षातील अंतर आणि अर्जावरील अंतर यात फरक दिसून आला आहे. पहिल्या सोडतीतून वंचित राहिलेल्या पालकांनी हा मुद्दा उपस्थित करत मनपा शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी उदय देवरे यांच्याकडे दाद मागितली होती. त्यावर देवरे यांनी लक्ष घालण्याच्या सूचना संबंधितांना केल्या होत्या. त्यानंतर बाद करण्यात आलेला अर्ज मंगळवारी (दि. १६) रोजी पडताळणी समितीने पुन्हा वैध ठरविल्याने काही पालकांनी याप्रक्रियेविषयी शंका उपस्थित केली आहे. याप्रकरणी तक्रार निवारण समितीने कार्यवाही करावी, यासाठी प्रशानाधिकारी उदय देवरे यांना निवेदन देण्यात आले आहे. दरम्यान, आरटीई अंतर्गत नाशिक शहरातील ९२ शाळांमध्ये पहिलीसाठी एक हजार ८२१, तर नर्सरीसाठी दोन शाळांमध्ये ३९ जागा आहेत. त्यापैकी पहिल्या लॉटरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना अर्ज पडताळणीसाठी शहरात के. एन. केला शाळा, गुरुगोविंद सिंग शाळा, होरायझन अकॅडमी, सरस्वतीनगर येथील के. के. वाघ शाळा असे चार केंद्र सुरू करण्यात आले आहेत.मंगळवारी १५८ प्रवेशआरटीई प्रवेशप्रक्रियेत पालकांकडून आक्षेप घेतले जात असताना दुसरीकडे प्रवेशप्रक्रिया सुरू असून, मंगळवारी शहरातील विविध शाळांमध्ये सुमारे १५८ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहे, तर शहरातील ९२ शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या एक हजार ८६० जागांपैकी आतापर्यंत ५२२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळा