शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

कांदा उत्पादकांची परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 01:21 IST

येवला : यंदा अतिरिक्त पावसाच्या तडाख्याने रोपे नष्ट झाल्यामुळे कांद्याची लागवड उशिरा झाली. त्यात वाढलेले तापमान यामुळे यंदा उन्हाळ ...

ठळक मुद्देउत्पादनात घट : केंद सरकारच्या निर्यात धोरणावर भवितव्य अवलंबून

येवला : यंदा अतिरिक्त पावसाच्या तडाख्याने रोपे नष्ट झाल्यामुळे कांद्याची लागवड उशिरा झाली. त्यात वाढलेले तापमान यामुळे यंदा उन्हाळ कांद्याच्या उत्पादन खर्चात वाढ होऊनही उत्पन्न घटल्याने थोडा अधिक दर मिळूनदेखील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परवड होण्याची शक्यता बोलली जात आहे. शासनाच्या पूरक निर्यात धोरणावर शेतकरी अवलंबून असल्याचे सध्याचे चित्र आहे.यंदा मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी उन्हाळ कांद्याची लावलेली सुमारे ८० टक्के रोपे सडली. त्यामुळे शेतकºयांनी पुन्हा रोपे टाकली. पहिल्या नोव्हेंबरच्या टप्प्यातील उन्हाळ कांद्याची रोपे गेल्याने शेतकºयांचा पैसा वाया गेला. सुरु वातीला अतिरिक्त पावसाचा फटका झेलून ज्या २० टक्के शेतकºयांची रोपे वाचली, त्या शेतकºयांचा कांदा आता बाजारात मोठ्या प्रमाणावर येऊ लागला आहे. त्यांना साधारण दोन हजार ते २४०० रु पये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. ज्या शेतकºयांची रोपे सडली, त्यांनी पुन्हा रोपे तयार करण्यात दीड महिन्याचा कालावधी गेला. त्यामुळे जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये उशिरा उन्हाळ कांद्याची लागवड झाली आहे. त्यातच कायम ढगाळ वातावरण आणि त्यामुळे झालेला औषधांचा झालेला वाढीव खर्च याशिवाय उशिरा लागवडीमुळे कांदा पोसला नाही. वजनातदेखील कमी भरणार आहे. उशिरा कांदा लागवडीची प्रतवारी साठवणी योग्य चांगली राहील का? हा प्रश्न आहे.तापमानात सध्या चांगलीच वाढ होत आहे. ३२ अंशांच्या पुढे तापमान चालले आहे. त्या कांद्याच्या साठवण क्षमतेवर परिणाम करणारे तापमान शेतकºयांना सतावू लागले आहे. उत्पादनदेखील ५० ते ६५ टक्के निघण्याची शक्यता आहे. तरीही दरवर्षीपेक्षा तुलनेत कांदा उत्पादन कमी होण्याच्या शक्यतेने यंदा कांदा उत्पादक शेतकºयांना दोन पैसे मिळण्याची आशा आहे. यंदा पुन्हा कांद्याने शेतकरी हसणार असल्याची चिन्हे दिसत आहे. यंदा उन्हाळ कांद्याला १८०० ते २००० प्रतिक्विंटल दर जरी मिळाला तरी साठवण करण्याकडे शेतकºयाचा कल कमी राहण्याची शक्यता आहे. उशिरा लागवड झालेला कांदा एप्रिल अखेर बाजारात येईल.दरम्यान निर्यात शेतकºयांना मारक ठरणार नाही याची शासनाला काळजी घ्यावी लागेल. देशांतर्गत कांदा मागणी साधारण असताना कांदा निर्यात धोरण प्रोत्साहन देणारे असावे, त्यामुळे शेतकºयाच्या हाती दोन पैसे येतील आणि सुखाचे दोन घास खाता येतील.उन्हाळ कांद्याला हवा दरगुरु वारी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत मुख्य बाजार आवारासह अंदरसूल उपबाजार आवारात १२ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. लाल कांदा प्रतिक्विंटल किमान ८०० ते कमाल २०५१, सरासरी १८७० रुपये असल्याचे चित्र दिसले. कांद्याचे असेच दर टिकून राहिले तर उन्हाळ कांद्याला किमान २५०० ते २८०० रु पये दर मिळाला तरी शेतकरी समाधानी असेल आणि कांदा साठवणीच्या भानगडीत फारसा पडणार नसल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.कांदा निर्यात धोरणात आता शासनाने शेतकरी हित पाहून निर्यात खुली करावी. त्यामुळे शेतकºयांच्या कांद्याला दर मिळेल. शेतकºयांना मारक धोरण केंद्र शासनाने राबवू नये.- उत्तम पुंडकांदा उत्पादक, पारेगाव

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रonionकांदा