शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

कांदा उत्पादकांची परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 01:21 IST

येवला : यंदा अतिरिक्त पावसाच्या तडाख्याने रोपे नष्ट झाल्यामुळे कांद्याची लागवड उशिरा झाली. त्यात वाढलेले तापमान यामुळे यंदा उन्हाळ ...

ठळक मुद्देउत्पादनात घट : केंद सरकारच्या निर्यात धोरणावर भवितव्य अवलंबून

येवला : यंदा अतिरिक्त पावसाच्या तडाख्याने रोपे नष्ट झाल्यामुळे कांद्याची लागवड उशिरा झाली. त्यात वाढलेले तापमान यामुळे यंदा उन्हाळ कांद्याच्या उत्पादन खर्चात वाढ होऊनही उत्पन्न घटल्याने थोडा अधिक दर मिळूनदेखील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परवड होण्याची शक्यता बोलली जात आहे. शासनाच्या पूरक निर्यात धोरणावर शेतकरी अवलंबून असल्याचे सध्याचे चित्र आहे.यंदा मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी उन्हाळ कांद्याची लावलेली सुमारे ८० टक्के रोपे सडली. त्यामुळे शेतकºयांनी पुन्हा रोपे टाकली. पहिल्या नोव्हेंबरच्या टप्प्यातील उन्हाळ कांद्याची रोपे गेल्याने शेतकºयांचा पैसा वाया गेला. सुरु वातीला अतिरिक्त पावसाचा फटका झेलून ज्या २० टक्के शेतकºयांची रोपे वाचली, त्या शेतकºयांचा कांदा आता बाजारात मोठ्या प्रमाणावर येऊ लागला आहे. त्यांना साधारण दोन हजार ते २४०० रु पये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. ज्या शेतकºयांची रोपे सडली, त्यांनी पुन्हा रोपे तयार करण्यात दीड महिन्याचा कालावधी गेला. त्यामुळे जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये उशिरा उन्हाळ कांद्याची लागवड झाली आहे. त्यातच कायम ढगाळ वातावरण आणि त्यामुळे झालेला औषधांचा झालेला वाढीव खर्च याशिवाय उशिरा लागवडीमुळे कांदा पोसला नाही. वजनातदेखील कमी भरणार आहे. उशिरा कांदा लागवडीची प्रतवारी साठवणी योग्य चांगली राहील का? हा प्रश्न आहे.तापमानात सध्या चांगलीच वाढ होत आहे. ३२ अंशांच्या पुढे तापमान चालले आहे. त्या कांद्याच्या साठवण क्षमतेवर परिणाम करणारे तापमान शेतकºयांना सतावू लागले आहे. उत्पादनदेखील ५० ते ६५ टक्के निघण्याची शक्यता आहे. तरीही दरवर्षीपेक्षा तुलनेत कांदा उत्पादन कमी होण्याच्या शक्यतेने यंदा कांदा उत्पादक शेतकºयांना दोन पैसे मिळण्याची आशा आहे. यंदा पुन्हा कांद्याने शेतकरी हसणार असल्याची चिन्हे दिसत आहे. यंदा उन्हाळ कांद्याला १८०० ते २००० प्रतिक्विंटल दर जरी मिळाला तरी साठवण करण्याकडे शेतकºयाचा कल कमी राहण्याची शक्यता आहे. उशिरा लागवड झालेला कांदा एप्रिल अखेर बाजारात येईल.दरम्यान निर्यात शेतकºयांना मारक ठरणार नाही याची शासनाला काळजी घ्यावी लागेल. देशांतर्गत कांदा मागणी साधारण असताना कांदा निर्यात धोरण प्रोत्साहन देणारे असावे, त्यामुळे शेतकºयाच्या हाती दोन पैसे येतील आणि सुखाचे दोन घास खाता येतील.उन्हाळ कांद्याला हवा दरगुरु वारी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत मुख्य बाजार आवारासह अंदरसूल उपबाजार आवारात १२ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. लाल कांदा प्रतिक्विंटल किमान ८०० ते कमाल २०५१, सरासरी १८७० रुपये असल्याचे चित्र दिसले. कांद्याचे असेच दर टिकून राहिले तर उन्हाळ कांद्याला किमान २५०० ते २८०० रु पये दर मिळाला तरी शेतकरी समाधानी असेल आणि कांदा साठवणीच्या भानगडीत फारसा पडणार नसल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.कांदा निर्यात धोरणात आता शासनाने शेतकरी हित पाहून निर्यात खुली करावी. त्यामुळे शेतकºयांच्या कांद्याला दर मिळेल. शेतकºयांना मारक धोरण केंद्र शासनाने राबवू नये.- उत्तम पुंडकांदा उत्पादक, पारेगाव

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रonionकांदा