शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
4
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
5
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
6
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
7
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
8
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
9
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
10
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
11
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
12
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
13
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
14
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
15
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
16
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
17
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
18
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
19
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
20
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?

रामकुंडात अष्टोप्रहर शुद्ध पाण्यासाठीही सल्लागार ; कोट्यवधी रुपये मोजण्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 00:11 IST

महापालिकेत कुठलेही काम आता सल्लागारांच्या सल्ल्याशिवाय न करण्याचा विडा प्रशासनाने उचललेला आहे. आता तर प्रशासनाने चक्क गोदावरीतील रामकुंडात अष्टोप्रहर पाणी कसे शुद्ध राहील व यासाठी काय केले पाहिजे, हा सल्ला मिळविण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याचा घाट घातला आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी नेमण्यात आलेल्या सल्लागारांवर महापालिकेने कोट्यवधी रुपये मोजण्याची तयारी ठेवलेली आहे.

ठळक मुद्देकोट्यवधी रुपये मोजण्याची तयारी रामकुंडात पाणीपुरवठ्यासाठी थेट पाइपलाइन निविदाही मागविण्यात आल्या

नाशिक : महापालिकेत कुठलेही काम आता सल्लागारांच्या सल्ल्याशिवाय न करण्याचा विडा प्रशासनाने उचललेला आहे. आता तर प्रशासनाने चक्क गोदावरीतील रामकुंडात अष्टोप्रहर पाणी कसे शुद्ध राहील व यासाठी काय केले पाहिजे, हा सल्ला मिळविण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याचा घाट घातला आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी नेमण्यात आलेल्या सल्लागारांवर महापालिकेने कोट्यवधी रुपये मोजण्याची तयारी ठेवलेली आहे.  गोदावरी नदीवरील पवित्र मानल्या जाणाºया रामकुंडात शुद्ध व स्वच्छ पाणी राहावे याकरिता महापालिकेने यापूर्वी फिल्ट्रेशन प्लॅँटही बसविला होता. सदर प्रयोग फेल गेल्यानंतर महापालिकेने रामकुंडात पाणीपुरवठ्यासाठी थेट पाइपलाइन टाकली. सद्यस्थितीत रामकुंडातील अमृतकुंभातून शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. रामकुंडात स्नानासाठी देश-विदेशातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात. रामकुंडात कायमस्वरूपी शुद्ध आणि स्वच्छ पाणी राहावे यासाठी महापालिकेने आजवर प्रयत्न केले आहेत; परंतु भाविकांची वाढती संख्या आणि दैनंदिन होणारे विधी लक्षात घेता रामकुंडात निर्माल्यासह पाण्याच्या शुद्धतेला बाधा पोहोचत असते. रामकुंडात कायमस्वरूपी शुद्ध आणि स्वच्छ पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी महापालिका प्रशासनाने आता सल्लागार नियुक्तीचा प्रस्ताव ठेवला असून, त्यासंदर्भात निविदाही मागविण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात गोदावरीला दरवर्षी सरासरी किमान तीन ते चार पूर येतात. अशावेळी रामकुंडातील पाणीही दूषित होते. ज्यावेळी गंगापूर धरणातून सिंचनासाठी पाण्याची आवर्तने असतात त्यावेळी गोदावरी प्रवाहित असते. त्यामुळे उन्हाळा आणि हिवाळ्यात रामकुंडातील पाणी कसे शुद्ध राखता येईल यावर काम करण्यासाठी महापालिकेने थेट सल्लागारांकडूनच सल्ला मागविण्याचे ठरविले आहे. सदर सल्लागाराकडून त्यानुसार सविस्तर प्राकलन तयार करून घेतले जाणार असून, त्यासाठी लाखो रुपयांची फी मोजली जाणार आहे.विचारपूर्वक कृतीची गरजसल्लागारांकडून मिळणाºया सल्ल्यांचे आजवर महापालिकेने नेमके काय केले आहे, याबाबत नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. स्मार्ट सिटीचा प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार संस्थेला कोट्यवधी रुपये मोजण्यात आले; परंतु सदर आराखडा किती फसवा आणि अव्यवहार्य आहे, याची प्रचिती खुद्द स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाºयांना आलेली आहे. शहर वाहतूक आराखडाही तयार करण्यात आला; परंतु त्यातील सूचनाही व्यवहार्य नसल्याची चर्चा होत असते. त्यामुळे सल्लागार नेमताना विचारपूर्वक कृतीची गरज असल्याचा सूर सदस्यांमधून व्यक्त होताना दिसून येत आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाgodavariगोदावरी