शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

संरक्षणराज्यमंत्र्याचे दत्तक गाव आऊट आॅफ रेंज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 17:31 IST

साल्हेरची व्यथा : रेशनच्या धान्यासाठी डोंगरावर चढून घेतला जातो थंब

ठळक मुद्देगेल्या दहा वर्षांपासून मोबाईल टॉवरचा नुसता सांगाडाच उभा असून गाव आऊट आॅफ रेंज राहत असल्याने ग्रामस्थांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो आहे.

जोरण - बागलाण तालुक्यातील साल्हेर हे इतिहासकालीन व पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. समृद्धी ग्राम योजनेंतर्गत विद्यमान खासदारांनी सदर गाव दत्तक घेतले आहे परंतु, संपर्कसाधनापासून हे गाव वंचित राहिले आहे. गेल्या दहा वर्षांपासून मोबाईल टॉवरचा नुसता सांगाडाच उभा असून गाव आऊट आॅफ रेंज राहत असल्याने ग्रामस्थांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो आहे.बागलाण तालुक्यातील ग्रामीण भागातील साल्हेर, पायरपाडा, भिकारसोंडा,साळवण, महादर, छोटा महारदर, केळझर, तताणी, सावरपाडा, बारीपाडा, वग्रीपाडा, घुलमाल,भाटंबा आदि गावामध्ये बी.एस.एन.एलसह अन्य कंपनीची रेंज उपलब्ध होत नाही. बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्टयातील साल्हेर हे इतिहास कालीन व पर्यटन स्थळ असुन आदिवासी बहूल भाग आहे. या भागामध्ये पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी महाराष्ट्रासह गुजरात राज्यातून अनेक पर्यटक या भागामध्ये येत असतात. विद्यमान खासदार तथा संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी समृध्द ग्राम योजनेअंतर्गत साल्हेर हे गाव दत्तक घेतले आहे. आठ महिन्यांपूर्वी भामरे यांच्या हस्ते मोबाईल टॉवरचे उद्घाटन करण्यात आले परंतु, त्यानंतरही रेंज उपलब्ध होऊ शकलेली नाही. याशिवाय, गेल्या १० वर्षापासुन परिसरात बीएसएनएलच्या टॉवरचा सांगाडा उभा आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्षच झालेले आहे. मोबाईल नेटवर्कची रेंजच उपलब्ध होत नसल्याने परिसरातील ग्रामस्थांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे.ग्रामस्थांची अडचणइतिहास कालीन व पर्याटनस्थळ असलेल्या साल्हेर भागामध्ये १० वर्षापासुन मोबाईल नेटवर्कनाही. जिओ कंपनीमार्फत एक वर्षापूर्वी ओ.एफ सी केबल चे काम पुर्ण करण्यात आले परंतु अद्याप जिओ कंपनीचा टॉवर उभा राहिलेला नाही. बी.एस.एन.एलच्या ओएफसी केबल टाकण्यासाठी केबल उपलब्ध होत नाहीत. ग्रामस्थांना रेशन दुकानातील धान्य मिळवण्यासाठी रेशन दुकानदाराकडून अक्षरश: दोन तीन किलोमीटर डोंगरावर चढून जाऊन आधार थंब घेतला जात आहे. मोबाईलची रेंज शोधत,शोधत डोंगरावर जावे लागत आहे. शासनाच्या नियमानुसार थंब घेतल्याशिवाय धान्य देता येत नाही. त्यामुळे ग्रामस्थांच्याही अडचणीत भर पडत आहे.जोडणी शक्य  नाहीसाल्हेर येथे बीएसएनएलच्या मालकीचा टॉवरचा सांगाडा युएसओ फंडातुन गेल्या १० वर्षापासुन उभारलेला आहे. साल्हेर येथे मोबाईल सेवा देण्यासाठी आम्ही प्रस्ताव महाप्रबंधक नाशिक यांच्याकडे पाठवला आहे. साल्हेर येथे मोबाईल यंत्रणा जोडण्यासाठी आवश्यक असलेले माध्यम जोडणी उपलब्ध होत नाही तसेच बिनातारी यंत्रणेसाठी भौगोलिक परिसर अनुकुल नसल्याने जोडणी शक्य होत नाही.- एस.आर. पवार, मंडळ अभियंता, सटाणा बीएसएनएल

टॅग्स :NashikनाशिकBSNLबीएसएनएल