शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

ओळखपत्र पाहूनच जिल्हा परिषदेत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 01:27 IST

शहर व जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा परिषद प्रशासनानेही आता कडक पावले उचलली असून, सकाळी साडेदहा वाजता मुख्य प्रवेशद्वारासह अन्य लहान दरवाजेही बंद करण्यात आली असून, प्रत्येकाला कामाशिवाय आत सोडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. 

ठळक मुद्देमुख्य प्रवेशद्वार अभ्यागतांसाठी बंद

नाशिक : शहर व जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा परिषद प्रशासनानेही आता कडक पावले उचलली असून, सकाळी साडेदहा वाजता मुख्य प्रवेशद्वारासह अन्य लहान दरवाजेही बंद करण्यात आली असून, प्रत्येकाला कामाशिवाय आत सोडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. या संदर्भात कालच जिल्हा परिषद अध्यक्षांनी प्रशासनाला कडक उपाययोजना करण्याच्या सुचना केल्या होत्या. त्यानुसार मंगळवार सकाळपासूनच मास्क असल्याशिवाय कोणालाही आत प्रवेश देण्यास मज्जाव करण्यात आला. जिल्हा परिषदेचे कर्मचारी व अधिकारी वगळता अन्य व्यक्तींना प्रवेशद्वारावरच कामाचे स्वरूप व कोणाकडे काम आहे याची विचारणा करून संबंधितांशी संपर्क साधून आत मध्ये सोडण्यात आले. कोणतेही काम नसलेल्यांना मात्र प्रवेश नाकारण्यात आला. याच बरोबर प्रत्येक विभागप्रमुखांना अनावश्यक गर्दी टाळण्याच्या त्याच बरोबर कोरोना उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील काही विभागांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे लक्षात आल्यामुळे सर्वच विभागांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. कर्मचाऱ्यांनाही अभ्यागतांशी थेट संपर्क साधण्यास मज्जाव करण्यात आला असून, कार्यालयात बसतांनाही एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखण्याच्या सुचना देण्यात आल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे यांनी दिली. ५० टक्के उपस्थितीकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने शासकीय कार्यालयातील उपस्थिती ५० टक्के करण्याचा निर्णय घेतला असून, बुधवारपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. जिल्हा परिषदेला सायंकाळी उशीरापर्यंत याबाबतचे आदेश प्राप्त झालेेले नव्हते. आदेश प्राप्त झाल्यानंतर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदcorona virusकोरोना वायरस बातम्या