शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

ओळखपत्र पाहूनच जिल्हा परिषदेत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 01:27 IST

शहर व जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा परिषद प्रशासनानेही आता कडक पावले उचलली असून, सकाळी साडेदहा वाजता मुख्य प्रवेशद्वारासह अन्य लहान दरवाजेही बंद करण्यात आली असून, प्रत्येकाला कामाशिवाय आत सोडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. 

ठळक मुद्देमुख्य प्रवेशद्वार अभ्यागतांसाठी बंद

नाशिक : शहर व जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा परिषद प्रशासनानेही आता कडक पावले उचलली असून, सकाळी साडेदहा वाजता मुख्य प्रवेशद्वारासह अन्य लहान दरवाजेही बंद करण्यात आली असून, प्रत्येकाला कामाशिवाय आत सोडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. या संदर्भात कालच जिल्हा परिषद अध्यक्षांनी प्रशासनाला कडक उपाययोजना करण्याच्या सुचना केल्या होत्या. त्यानुसार मंगळवार सकाळपासूनच मास्क असल्याशिवाय कोणालाही आत प्रवेश देण्यास मज्जाव करण्यात आला. जिल्हा परिषदेचे कर्मचारी व अधिकारी वगळता अन्य व्यक्तींना प्रवेशद्वारावरच कामाचे स्वरूप व कोणाकडे काम आहे याची विचारणा करून संबंधितांशी संपर्क साधून आत मध्ये सोडण्यात आले. कोणतेही काम नसलेल्यांना मात्र प्रवेश नाकारण्यात आला. याच बरोबर प्रत्येक विभागप्रमुखांना अनावश्यक गर्दी टाळण्याच्या त्याच बरोबर कोरोना उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील काही विभागांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे लक्षात आल्यामुळे सर्वच विभागांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. कर्मचाऱ्यांनाही अभ्यागतांशी थेट संपर्क साधण्यास मज्जाव करण्यात आला असून, कार्यालयात बसतांनाही एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखण्याच्या सुचना देण्यात आल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे यांनी दिली. ५० टक्के उपस्थितीकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने शासकीय कार्यालयातील उपस्थिती ५० टक्के करण्याचा निर्णय घेतला असून, बुधवारपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. जिल्हा परिषदेला सायंकाळी उशीरापर्यंत याबाबतचे आदेश प्राप्त झालेेले नव्हते. आदेश प्राप्त झाल्यानंतर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदcorona virusकोरोना वायरस बातम्या