शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

‘..तोपर्यंत प्रशासक हटणार नाही’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 23:19 IST

सातपूर : सर्वसाधारण सभेतील ठरावांचा इतिवृत्तांत आणि पत्र व्यवहार रिझर्व्ह बँकेकडे करण्यात आला आहे. त्यामुळे जोपर्यंत रिझर्व्ह बँकेकडून काही निर्देश येत नाहीत तोपर्यंत प्रशासक हटणार नाही, अशी स्पष्टोक्ती नामको बँकेचे प्रशासक जे. बी. भोरिया यांनी दिली आहे.

ठळक मुद्देनामको प्रशासक भोरिया : आर्थिक वर्षाच्या अहवालाची दिली माहिती

सातपूर : सर्वसाधारण सभेतील ठरावांचा इतिवृत्तांत आणि पत्र व्यवहार रिझर्व्ह बँकेकडे करण्यात आला आहे. त्यामुळे जोपर्यंत रिझर्व्ह बँकेकडून काही निर्देश येत नाहीत तोपर्यंत प्रशासक हटणार नाही, अशी स्पष्टोक्ती नामको बँकेचे प्रशासक जे. बी. भोरिया यांनी दिली आहे.नामको बँकेच्या प्रशासकीय कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आर्थिक वर्षाच्या अहवालाची माहिती देताना भोरिया यांनी प्रशासकीय काळातील बँकेचा चढता आलेख सादर करताना सांगितले की, संचालक मंडळाच्या कार्यकाळापेक्षा प्रशासकीय काळात म्हणजेच २०१३ नंतर आतापर्यंत सर्वाधिक नफा (३५ कोटी रु पयांपेक्षा अधिक नफा) बँकेला झालेला आहे. त्यामुळे सभासदांना १५ टक्के लाभांश आणि सेवकांना २० टक्के बोनस देण्याची तरतूद केली आहे. २०१३ साली अवघे ३६ कोटी रु पयांचे भागभांडवल आता ५० कोटी रु पयांवर पोहोचले आहे.२०० कर्मचाऱ्यांना खास प्रशिक्षणासाठी दिल्लीला पाठविण्यात आलेले आहे. त्यामुळे बँकेच्या कामकाजात सुसूत्रता येत आहे. मात्र प्रशासकीय काळात अनेक कारणांमुळे १०.५९ टक्के एनपीए वाढला असला तरी त्यास प्रशासक जबाबदार नाही. एनपीए कमी करण्यासाठी त्या त्या शाखेला उद्दिष्टे देण्यात आलेले आहेत. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी सांगितले की, प्रशासक हटविणे माझ्या मतावर नाही. मात्र सर्वसाधारण सभेतील ठरावांचा इतिवृत्तांत आणि पत्रव्यवहार रिझर्व्ह बँकेकडे करण्यात आला आहे. त्यामुळे जोपर्यंत रिझर्व्ह बँकेकडून काही निर्देश येत नाहीत तोपर्यंत प्रशासक हटणार नसल्याचे स्पष्ट केले.प्रशासक हटविण्याबाबत शहरात बैठका होत असल्याची माहिती आपल्याकडे नसल्याचेही त्यांनी सांगितले.कायदेशीर कारवाई होणारचबँकेचे कर्ज थकविणाºया भुजबळांच्या आर्मस्ट्राँग कंपनीला जप्तीची नोटीस बजावण्यात आली आहे. या मालमत्तेवर अजून कोणाचा बोजा आहे काय? याची खातरजमा करण्याचे काम सुरू आहे. लवकरच या मालमत्तेवर जप्तीची कारवाई केली जाणार आहे. थकबाकीदार कोणीही असो कायदेशीर कारवाई होणारच असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.नामको बँकेच्या सुरत आणि हैदराबाद शाखा सुस्थितीत नाहीत. त्या शाखा तोट्यात सुरू आहेत. परराज्यातील विशेषत: हैदराबाद शाखेत भाषेची मोठी अडचण निर्माण होत आहे. त्या शाखा बंद केल्यास मल्टिनॅशनल बँकेचा दर्जा रद्द होऊ शकतो.त्यामुळे परराज्यातील बँकेच्या शाखा बंद करता येत नसल्याचा खुलासा भोरिया यांनी केला आहे.