शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

‘..तोपर्यंत प्रशासक हटणार नाही’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 23:19 IST

सातपूर : सर्वसाधारण सभेतील ठरावांचा इतिवृत्तांत आणि पत्र व्यवहार रिझर्व्ह बँकेकडे करण्यात आला आहे. त्यामुळे जोपर्यंत रिझर्व्ह बँकेकडून काही निर्देश येत नाहीत तोपर्यंत प्रशासक हटणार नाही, अशी स्पष्टोक्ती नामको बँकेचे प्रशासक जे. बी. भोरिया यांनी दिली आहे.

ठळक मुद्देनामको प्रशासक भोरिया : आर्थिक वर्षाच्या अहवालाची दिली माहिती

सातपूर : सर्वसाधारण सभेतील ठरावांचा इतिवृत्तांत आणि पत्र व्यवहार रिझर्व्ह बँकेकडे करण्यात आला आहे. त्यामुळे जोपर्यंत रिझर्व्ह बँकेकडून काही निर्देश येत नाहीत तोपर्यंत प्रशासक हटणार नाही, अशी स्पष्टोक्ती नामको बँकेचे प्रशासक जे. बी. भोरिया यांनी दिली आहे.नामको बँकेच्या प्रशासकीय कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आर्थिक वर्षाच्या अहवालाची माहिती देताना भोरिया यांनी प्रशासकीय काळातील बँकेचा चढता आलेख सादर करताना सांगितले की, संचालक मंडळाच्या कार्यकाळापेक्षा प्रशासकीय काळात म्हणजेच २०१३ नंतर आतापर्यंत सर्वाधिक नफा (३५ कोटी रु पयांपेक्षा अधिक नफा) बँकेला झालेला आहे. त्यामुळे सभासदांना १५ टक्के लाभांश आणि सेवकांना २० टक्के बोनस देण्याची तरतूद केली आहे. २०१३ साली अवघे ३६ कोटी रु पयांचे भागभांडवल आता ५० कोटी रु पयांवर पोहोचले आहे.२०० कर्मचाऱ्यांना खास प्रशिक्षणासाठी दिल्लीला पाठविण्यात आलेले आहे. त्यामुळे बँकेच्या कामकाजात सुसूत्रता येत आहे. मात्र प्रशासकीय काळात अनेक कारणांमुळे १०.५९ टक्के एनपीए वाढला असला तरी त्यास प्रशासक जबाबदार नाही. एनपीए कमी करण्यासाठी त्या त्या शाखेला उद्दिष्टे देण्यात आलेले आहेत. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी सांगितले की, प्रशासक हटविणे माझ्या मतावर नाही. मात्र सर्वसाधारण सभेतील ठरावांचा इतिवृत्तांत आणि पत्रव्यवहार रिझर्व्ह बँकेकडे करण्यात आला आहे. त्यामुळे जोपर्यंत रिझर्व्ह बँकेकडून काही निर्देश येत नाहीत तोपर्यंत प्रशासक हटणार नसल्याचे स्पष्ट केले.प्रशासक हटविण्याबाबत शहरात बैठका होत असल्याची माहिती आपल्याकडे नसल्याचेही त्यांनी सांगितले.कायदेशीर कारवाई होणारचबँकेचे कर्ज थकविणाºया भुजबळांच्या आर्मस्ट्राँग कंपनीला जप्तीची नोटीस बजावण्यात आली आहे. या मालमत्तेवर अजून कोणाचा बोजा आहे काय? याची खातरजमा करण्याचे काम सुरू आहे. लवकरच या मालमत्तेवर जप्तीची कारवाई केली जाणार आहे. थकबाकीदार कोणीही असो कायदेशीर कारवाई होणारच असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.नामको बँकेच्या सुरत आणि हैदराबाद शाखा सुस्थितीत नाहीत. त्या शाखा तोट्यात सुरू आहेत. परराज्यातील विशेषत: हैदराबाद शाखेत भाषेची मोठी अडचण निर्माण होत आहे. त्या शाखा बंद केल्यास मल्टिनॅशनल बँकेचा दर्जा रद्द होऊ शकतो.त्यामुळे परराज्यातील बँकेच्या शाखा बंद करता येत नसल्याचा खुलासा भोरिया यांनी केला आहे.