शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
4
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
5
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
6
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
7
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
8
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
9
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
10
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
11
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
12
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
13
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
14
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
15
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
16
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
17
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
18
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
19
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
20
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश

पाणी सोडण्यासाठी प्रशासनाची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 01:57 IST

जायकवाडी धरणासाठी समन्यायी पाणीवाटप करण्याच्या दृष्टीने नाशिक जिल्ह्णातील गंगापूर, दारणा व पालखेड या धरणांतून सुमारे साडेतीन टीएमसी पाणी सोडण्याचे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे आदेश जिल्हा प्रशासन व जलसंपदा विभागाला मंगळवारी प्राप्त झाल्यानंतर पाटबंधारे अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे.

नाशिक : जायकवाडी धरणासाठी समन्यायी पाणीवाटप करण्याच्या दृष्टीने नाशिक जिल्ह्णातील गंगापूर, दारणा व पालखेड या धरणांतून सुमारे साडेतीन टीएमसी पाणी सोडण्याचे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे आदेश जिल्हा प्रशासन व जलसंपदा विभागाला मंगळवारी प्राप्त झाल्यानंतर पाटबंधारे अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. एकीकडे राजकीय पक्षांनी दिलेले आंदोलनाचे इशारे व पाण्याच्या प्रश्नावर शेतकºयांच्या संतप्त भावना पाहता, पाणी सोडताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त करून पोलिसांना बंदोबस्तासाठी पत्र देण्यात आले आहे.नाशिक जिल्ह्णातून जायकवाडी धरणासाठी दोन वर्षांपूर्वी पाणी सोडल्यानंतर त्याचा सर्वपक्षीय तीव्र उद्रेक निर्माण झाला होता. ठिकठिकाणी शेतकºयांची आंदोलने करून जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या समक्ष गोंधळ घातल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत यंदा जिल्ह्णात ८३ टक्के पाऊस होऊन धरणात जेमतेम ७७ टक्के साठा आहे.  काही तालुक्यांमध्ये आत्तापासूनच टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, उन्हाळ्यात यापेक्षाही भयानक परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे जिल्ह्णातील धरणांतील पाणी जायकवाडीला सोडण्याचा मुद्दा चर्चेत येताच, खुद्द सत्ताधारी भाजपातूनच त्याची पहिली प्रतिक्रिया उमटली तर शिवसेना, राष्टÑवादी, कॉँग्रेस, मनसेने पाणी सोडण्याला कडाडून विरोध दर्शविला आहे.  शेतकरी संघटना, पाणीवापर संस्था, शेतकºयांनी पाणी सोडण्याच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याची  धमकी दिली आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने  गंगापूर धरण समूहातून .६० टीएमसी, दारणा धरण समूहातून २.०४ टीएमसी व पालखेड समूहातून .६० टीएमसी पाणी येत्या ३१ आॅक्टोबरच्या आत पाणी सोडण्याचे आदेश दिले असल्यामुळे जिल्हा प्रशासन व पाटबंधारे खात्याची धावपळ सुरू झाली आहे.बुधवारी जिल्हाधिकाºयांनी पाटबंधारे खात्याच्या अधिकाºयांची बैठक घेऊन त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली तसेच पाणी सोडण्यापूर्वी व सोडल्यावर करावयाच्या उपाययोजनांवर यावेळी चर्चा करण्यात आली.वीजपुरवठा खंडितसध्या दिवाळी सणाचा हंगाम असून, पोलिसांवर बंदोबस्ताचा ताण आहे. अशा परिस्थितीत पाण्यावरून नागरिकांच्या भावनांचा विचार केल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन सणासुदीच्या दिवसात सरकारला ते परवडणारे नाही. त्यामुळे पाणी सोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त घ्यावा लागणार असल्याने तसे पत्र बुधवारी ग्रामीण पोलिसांना देण्यात आले. त्याचबरोबर नदीपात्रात असलेल्या बंधाºयांच्या फळ्या काढण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, काही ठिकाणच्या फळ्या काढण्यात आल्या आहेत. नदीवाटे वहन होणाºया या पाण्याची वाटेत चोरी रोखण्यासाठी नदीच्या दुतर्फा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे, त्याबाबतचे पत्र वीज कंपनीला देण्यात आले.

टॅग्स :gangapur damगंगापूर धरणMarathwadaमराठवाडाWaterपाणी