शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
2
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
3
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
4
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
5
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
6
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
7
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
8
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
9
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
10
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
11
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
12
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
13
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
14
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
15
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
16
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
17
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!
18
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
19
Bigg Boss 19: सलमानच्या शोची उपेंद्र लिमयेंना ऑफर? अभिनेता म्हणाला- "मला अनेकांनी विचारलं..."
20
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी

पाणी सोडण्यासाठी प्रशासनाची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 01:57 IST

जायकवाडी धरणासाठी समन्यायी पाणीवाटप करण्याच्या दृष्टीने नाशिक जिल्ह्णातील गंगापूर, दारणा व पालखेड या धरणांतून सुमारे साडेतीन टीएमसी पाणी सोडण्याचे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे आदेश जिल्हा प्रशासन व जलसंपदा विभागाला मंगळवारी प्राप्त झाल्यानंतर पाटबंधारे अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे.

नाशिक : जायकवाडी धरणासाठी समन्यायी पाणीवाटप करण्याच्या दृष्टीने नाशिक जिल्ह्णातील गंगापूर, दारणा व पालखेड या धरणांतून सुमारे साडेतीन टीएमसी पाणी सोडण्याचे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे आदेश जिल्हा प्रशासन व जलसंपदा विभागाला मंगळवारी प्राप्त झाल्यानंतर पाटबंधारे अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. एकीकडे राजकीय पक्षांनी दिलेले आंदोलनाचे इशारे व पाण्याच्या प्रश्नावर शेतकºयांच्या संतप्त भावना पाहता, पाणी सोडताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त करून पोलिसांना बंदोबस्तासाठी पत्र देण्यात आले आहे.नाशिक जिल्ह्णातून जायकवाडी धरणासाठी दोन वर्षांपूर्वी पाणी सोडल्यानंतर त्याचा सर्वपक्षीय तीव्र उद्रेक निर्माण झाला होता. ठिकठिकाणी शेतकºयांची आंदोलने करून जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या समक्ष गोंधळ घातल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत यंदा जिल्ह्णात ८३ टक्के पाऊस होऊन धरणात जेमतेम ७७ टक्के साठा आहे.  काही तालुक्यांमध्ये आत्तापासूनच टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, उन्हाळ्यात यापेक्षाही भयानक परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे जिल्ह्णातील धरणांतील पाणी जायकवाडीला सोडण्याचा मुद्दा चर्चेत येताच, खुद्द सत्ताधारी भाजपातूनच त्याची पहिली प्रतिक्रिया उमटली तर शिवसेना, राष्टÑवादी, कॉँग्रेस, मनसेने पाणी सोडण्याला कडाडून विरोध दर्शविला आहे.  शेतकरी संघटना, पाणीवापर संस्था, शेतकºयांनी पाणी सोडण्याच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याची  धमकी दिली आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने  गंगापूर धरण समूहातून .६० टीएमसी, दारणा धरण समूहातून २.०४ टीएमसी व पालखेड समूहातून .६० टीएमसी पाणी येत्या ३१ आॅक्टोबरच्या आत पाणी सोडण्याचे आदेश दिले असल्यामुळे जिल्हा प्रशासन व पाटबंधारे खात्याची धावपळ सुरू झाली आहे.बुधवारी जिल्हाधिकाºयांनी पाटबंधारे खात्याच्या अधिकाºयांची बैठक घेऊन त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली तसेच पाणी सोडण्यापूर्वी व सोडल्यावर करावयाच्या उपाययोजनांवर यावेळी चर्चा करण्यात आली.वीजपुरवठा खंडितसध्या दिवाळी सणाचा हंगाम असून, पोलिसांवर बंदोबस्ताचा ताण आहे. अशा परिस्थितीत पाण्यावरून नागरिकांच्या भावनांचा विचार केल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन सणासुदीच्या दिवसात सरकारला ते परवडणारे नाही. त्यामुळे पाणी सोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त घ्यावा लागणार असल्याने तसे पत्र बुधवारी ग्रामीण पोलिसांना देण्यात आले. त्याचबरोबर नदीपात्रात असलेल्या बंधाºयांच्या फळ्या काढण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, काही ठिकाणच्या फळ्या काढण्यात आल्या आहेत. नदीवाटे वहन होणाºया या पाण्याची वाटेत चोरी रोखण्यासाठी नदीच्या दुतर्फा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे, त्याबाबतचे पत्र वीज कंपनीला देण्यात आले.

टॅग्स :gangapur damगंगापूर धरणMarathwadaमराठवाडाWaterपाणी