शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाचे ‘फसवे’ नियोजन

By admin | Updated: September 25, 2015 22:24 IST

२४ किलोमीटरची भाविकांना पायपीट : आबालवृद्धांचा संताप अनावर

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या प्रत्येक पर्वणीला कोटी भाविक येण्याची शक्यता गृहीत धरून नियोजन करणाऱ्या पोलीस व जिल्हा प्रशासनाचे त्र्यंबकेश्वरच्या तिसऱ्या व अंंतिम पर्वणीचे नियोजन पूर्णत: फसले. बारा तासाहून अधिक काळ भाविकांना गैरसोयीच्या गर्तेत अडकवून ठेवण्याबरोबरच आबालवृद्धांना उन्हातान्हात तब्बल २४ किलोमीटरहून अधिक पायपीट करण्यास भाग पाडणाऱ्या प्रशासनाने गेल्या दोन पर्वण्यांकडे पाठ फिरविणाऱ्या व शेवटच्या पर्वणीला गर्दी करणाऱ्या भाविकांवर एक प्रकारे सूडच उगविला. बकरी ईदची सार्वजनिक सुट्टी व पाठोपाठ चौथा शनिवार, रविवार अशा सलग तीन दिवस सुट्ट्यांमध्येच त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्याची तिसरी व अंतिम पर्वणी असल्यामुळे भाविकांनी गुरुवारी सायंकाळपासूनच गर्दी करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे रात्री बारा वाजेपर्यंत कुशावर्तात स्नानासाठी अनुमती देऊन भाविकांची गर्दी कमी करण्याचा प्रयत्न फोल ठरला, त्याचदरम्यान नाशिककडून त्र्यंबकेश्वरला येणाऱ्या भाविकांच्या गर्दीत वाढ होत असल्याचे पाहून प्रशासनाने रात्री दोन वाजेनंतर नाशिक-त्र्यंबक मार्गावरील खंबाळे येथील बाह्य वाहनतळावरून एसटी बस सोडण्यावरही निर्बंध लादले. रात्री खंबाळे बाह्य वाहनतळ गाठलेल्या भाविकांना रात्रभर गैरसोयीचा सामना करत मुक्काम करावा लागला तर त्यानंतरही सकाळ उजाडल्यावर एसटी बस कधी सुरू होतील याविषयी कोणतीही पूर्वसूचना एसटी वा जिल्हा प्रशासनाकडून दिली नसल्याने सकाळपासून भाविकांनी थेट रस्त्याचा ताबा घेत त्र्यंबकेश्वरकडे कूच केली. मुळातच त्र्यंबकेश्वरमध्ये आखाड्यांचे शाहीस्नान सुरू असताना त्यात बाहेरगावाहून निघालेल्या भाविकांची भर पडल्याने पुरता गोंधळ उडाला व खुद्द त्र्यंबकेश्वरमध्येच गल्लीबोळात बॅरिकेडिंग टाकून पोलिसांनी रस्त्यांची नाकाबंदी केली, त्यामुळे त्र्यंबकवासीयांनाही घराबाहेर पडणे मुश्कील झाले. दरम्यान, दुसरीकडे खंबाळे वाहनतळापासून पायपीट करत लाखोंच्या संख्येने निघालेल्या भाविकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागला. साधारणत: बारा किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या भाविकांसाठी कोणतीही सुविधा रस्त्यावर करण्यात आलेली नव्हती. आबालवृद्ध, कडेवर तान्हुले घेऊन निघालेल्या भाविकांना पिण्याचे पाणीदेखील मिळाले नाही. उन्हाचा तडाखा सहन करीत निघालेल्या भाविकांनी वाटेत मिळेल तेथे आश्रय शोधण्याचाही प्रयत्न केला. (प्रतिनिधी)