शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

आदिवासी झाले हायटेक; तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वाढल्या तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:21 IST

ग्रामीण पोलीस मुख्यालयात सुरू करण्यात आलेल्या सोशल मीडिया सेलच्या माध्यमातून दहा महिन्यांत २१९ पेक्षा अधिक तक्रारी सोशल मीडियावरून प्राप्त झाल्या असून, १७१ तक्रारींवर कारवाई करण्यात आली आहे.

आडगाव : ग्रामीण पोलीस मुख्यालयात सुरू करण्यात आलेल्या सोशल मीडिया सेलच्या माध्यमातून दहा महिन्यांत २१९ पेक्षा अधिक तक्रारी सोशल मीडियावरून प्राप्त झाल्या असून, १७१ तक्रारींवर कारवाई करण्यात आली आहे. पेठ, सुरगाणा, कळवण या आदिवासी भागांतून जास्तीत जास्त तक्रारी करण्यासाठी नागरिक सरसावत असल्याची माहिती प्राप्त झाली असून, ग्रामीण पोलिसांच्या सोशल मीडिया सेलकडे आदिवासी भागातून अधिकाधिक तक्रारी प्राप्त होत असून, कारवाई सुरू आहे. देशांत इंटरनेट व सोशल मीडियाचा वापर हा अत्यंत प्रभावीपणे सुरू असून, केंद्र आणि राज्य सरकारनेदेखील डिजिटल इंडियाचा नारा देत सर्व सरकारी कार्यालयांचा कारभार डिजिटल करण्यावर भर दिला आहे. ग्रामीण भागातदेखील सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याचमुळे ग्रामीण पोलीस मुख्यालयात नवनियुक्त पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी ग्रामीण पोलीस मुख्यालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर काही दिवसांत म्हणजेच ७ जुलै २०१७ रोजी सोशल मीडिया सेल सुरू केले. त्यामुळे जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात घडणाºया गुन्हेगारी घटनांच्या तक्र री नागरिक सोशल मीडियाच्या माध्यमातून करत आहे. यामध्ये अवैध धंधे, अवैध दारू विक्री, घरगुती व शेजायांचे वाद, फोनवर येणारे फेक कॉल्स आणि विशेष म्हणजे स्थानिक पोलीस स्टेशनला तक् ार देऊनही कारवाई होत नसल्याबाबतच्या तक्रारी करण्यासदेखील नागरिक या माध्यमातून पुढे सरसावत आहे.तक्र रींवरील कारवाईसाठी विशेष पथक सोशल मीडिया सेलकडे येणाºया तक्रारींच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाकडून कारवाई केली जात आहे. त्यामुळे स्थानिक पोलिसांकडून कोणतीही दखल न घेतल्या जाणाºया तक्र ारी सोशल मीडियावरून केल्या जात आहे. सोशल मीडियावर प्राप्त होणाºया तक्र ारींवर कारवाईसाठी विशेष पथकाची नेमणूक करून कारवाई होत आहे. पण यावरून स्थानिक पोलिसांच्या गलथान कारभाराचीदेखील यानिमित्ताने जाणीव होत असल्याने पोलीस कर्मचाºयांच्या तक्र ारीदेखील थेट अधीक्षकांपर्यंत करण्याचे व्यासपीठ सोशल मीडियामुळे प्राप्त झाले आहे.१७१ तक्रारींवर कारवाईजिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, कळवण या अतिदुर्गम आदिवासी भागासह मालेगाव, सिन्नर, नांदगाव या भागांतील नागरिक तक्र ारी करण्यास पुढाकार घेत आहे. आदिवासी भागातील पेठ, सुरगाणा, कळवण या भागातून अधिकाधिक तक्र ारी प्राप्त होत असल्यामुळे सोशल मीडियाचे आदिवासी भागातील महत्त्व खºया अर्थाने अधोरेखित होत आहे. सोशल मीडियावर प्राप्त होणाºया तक्र ारींवर स्वत: पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक यांचे लक्ष असते. सोशल मीडिया सेल कार्यान्वित होऊन जवळपास दहा महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला असून २१९ पेक्षा अधिक तक्र ारी सोशल मीडियावरून प्राप्त झाल्या असून, १७१ तक्रारींवर कारवाई केली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

टॅग्स :PoliceपोलिसSocial Mediaसोशल मीडिया