शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

पेयजल व स्वच्छता विभाग अतिरिक्तमुख्य सचिवांची बोरटेंभे गावाला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 00:03 IST

नांदूरवैद्य : केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरुण बरोका यांनी इगतपुरी तालुक्यातील बोरटेंभे गावाला रविवारी (दि.२०) भेट देऊन गावातील स्वच्छता सुविधांची पाहणी केली. गावातील स्वच्छतेविषयक कामांबाबत तसेच ग्रामस्थांच्या लोकसहभागाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

ठळक मुद्देगावातील वैयक्तिक घरगुती स्वच्छता सुविधेची पाहणी केली.

नांदूरवैद्य : केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरुण बरोका यांनी इगतपुरी तालुक्यातील बोरटेंभे गावाला रविवारी (दि.२०) भेट देऊन गावातील स्वच्छता सुविधांची पाहणी केली. गावातील स्वच्छतेविषयक कामांबाबत तसेच ग्रामस्थांच्या लोकसहभागाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.स्वच्छता ही मातृसृष्टीची सेवा असून स्वच्छ भारत अभियान टप्पा दोन मध्ये गावाने सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन यावर काम करुन गावाला आदर्श गाव बनविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. स्वच्छ भारत अभियान टप्पा २ अंतर्गत नाशिक येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी नाशिक येथे आलेल्या केंद्र शासनाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरुण बरोका, महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे सहसचिव अभय महाजन यांनी बोरटेंभे ग्रामपंचायतीला भेट दिली.यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, राज्य पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प व्यवस्थापन सनियंत्रण गणेश वाडेकर, पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, गटविकास अधिकारी लता गायकवाड आदी उपस्थित होते.यावेळी अरुण बरोका यांनी गावातील ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, पोलिस पाटील आणि स्वच्छाग्रही यांच्याशी संवाद साधून गावातील स्वच्छते विषयक करण्यात येणाऱ्या कामांची माहिती घेतली. तसेच सहसचिव अभय महाजन यांच्यासमवेत त्यांनी गावातील वैयक्तिक घरगुती स्वच्छता सुविधेची पाहणी केली. कुटुंबातील तरुण व वृद्ध व्यक्तींशी त्यांनी वैयक्तिक शौचालयांचा वापर, शौचालय बांधकाम प्रकार व बांधकामाचे वर्ष याबद्दल माहिती घेतली. याबरोबरच गावातील ग्रामस्थांनी त्यांना हागणदारीमुक्त गाव करण्यासाठी राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली.कोरोनाविषयक राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती देऊन गावामध्ये एकालाही कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ दिला नसल्याचे सांगितले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बनसोड यांनी बोरटेंभे येथे तांत्रिक कारणामुळे गेल्या अनेक वर्षापासून ग्रामपंचायत संस्था स्थापन केली गेली नसली तरी सर्व ग्रामस्थांनी एकीने स्वच्छताविषयक उद्दीष्टे, घरगुती नळ कनेक्शन, भूमिगत सांडपाणी यावर काम करुन उदीष्टपूर्ती केली असल्याचेही सांगितले. 

टॅग्स :Governmentसरकारigatpuri-acइगतपुरी