शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

पेयजल व स्वच्छता विभाग अतिरिक्तमुख्य सचिवांची बोरटेंभे गावाला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 00:03 IST

नांदूरवैद्य : केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरुण बरोका यांनी इगतपुरी तालुक्यातील बोरटेंभे गावाला रविवारी (दि.२०) भेट देऊन गावातील स्वच्छता सुविधांची पाहणी केली. गावातील स्वच्छतेविषयक कामांबाबत तसेच ग्रामस्थांच्या लोकसहभागाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

ठळक मुद्देगावातील वैयक्तिक घरगुती स्वच्छता सुविधेची पाहणी केली.

नांदूरवैद्य : केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरुण बरोका यांनी इगतपुरी तालुक्यातील बोरटेंभे गावाला रविवारी (दि.२०) भेट देऊन गावातील स्वच्छता सुविधांची पाहणी केली. गावातील स्वच्छतेविषयक कामांबाबत तसेच ग्रामस्थांच्या लोकसहभागाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.स्वच्छता ही मातृसृष्टीची सेवा असून स्वच्छ भारत अभियान टप्पा दोन मध्ये गावाने सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन यावर काम करुन गावाला आदर्श गाव बनविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. स्वच्छ भारत अभियान टप्पा २ अंतर्गत नाशिक येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी नाशिक येथे आलेल्या केंद्र शासनाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरुण बरोका, महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे सहसचिव अभय महाजन यांनी बोरटेंभे ग्रामपंचायतीला भेट दिली.यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, राज्य पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प व्यवस्थापन सनियंत्रण गणेश वाडेकर, पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, गटविकास अधिकारी लता गायकवाड आदी उपस्थित होते.यावेळी अरुण बरोका यांनी गावातील ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, पोलिस पाटील आणि स्वच्छाग्रही यांच्याशी संवाद साधून गावातील स्वच्छते विषयक करण्यात येणाऱ्या कामांची माहिती घेतली. तसेच सहसचिव अभय महाजन यांच्यासमवेत त्यांनी गावातील वैयक्तिक घरगुती स्वच्छता सुविधेची पाहणी केली. कुटुंबातील तरुण व वृद्ध व्यक्तींशी त्यांनी वैयक्तिक शौचालयांचा वापर, शौचालय बांधकाम प्रकार व बांधकामाचे वर्ष याबद्दल माहिती घेतली. याबरोबरच गावातील ग्रामस्थांनी त्यांना हागणदारीमुक्त गाव करण्यासाठी राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली.कोरोनाविषयक राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती देऊन गावामध्ये एकालाही कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ दिला नसल्याचे सांगितले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बनसोड यांनी बोरटेंभे येथे तांत्रिक कारणामुळे गेल्या अनेक वर्षापासून ग्रामपंचायत संस्था स्थापन केली गेली नसली तरी सर्व ग्रामस्थांनी एकीने स्वच्छताविषयक उद्दीष्टे, घरगुती नळ कनेक्शन, भूमिगत सांडपाणी यावर काम करुन उदीष्टपूर्ती केली असल्याचेही सांगितले. 

टॅग्स :Governmentसरकारigatpuri-acइगतपुरी