शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

दिल्ली-मुंबई कॉरिडोरमध्ये नाशिकचा समावेश करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 00:45 IST

दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअरच्या दुसऱ्या टप्प्यात नाशिकचा समावेश करण्यात यावा, तसेच अभ्यास न करता पहिल्या टप्प्यात डीएमआयसीला अहवाल पाठविणाºया जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार युनियनने केली आहे.

नाशिक : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअरच्या दुसऱ्या टप्प्यात नाशिकचा समावेश करण्यात यावा, तसेच अभ्यास न करता पहिल्या टप्प्यात डीएमआयसीला अहवाल पाठविणाºया जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार युनियनने केली आहे.  यासंदर्भात विभागीय उपायुक्त यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअर योजना म्हणजे देशभरातील महामार्गाभोवती इंडस्ट्रीयल कॉरिडोअर उभे करणे. नाशिक जिल्हा हा मुंबई-पुणे-नाशिक अशा सुवर्ण त्रिकोणात असतानाही दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअर योजनेतून नाशिकला वगळण्यात आले आहे. सर्वाधिक धरणाचा जिल्हा अशी ख्याती नाशिकची आहे. परंतु मुबलक पाणी नाही या कारणाने दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअरच्या पहिल्या टप्प्यातून नाशिकला वगळण्यात आले. औरंगाबादला पाणीपुरवठा करणाºया जायकवाडी धरणात नाशिकमधून पाणी जाते असे असतानासुद्धा नाशिकला मुबलक पाणी नाही, असा अहवाल अभ्यास न करताच जलसंपदा विभागाने दिल्याने दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअरमधून नाशिकला बाजू करून यात औरंगाबादचा समावेश करण्यात आला. दुसºया टप्प्यात दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअरमध्ये नाशिकला संधी उपलब्ध आहे. याकरिता जलसंपदा विभागाकडून अभ्यास न करताच दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअरला अहवाल पाठविण्यात येऊ नये व नाशिकचा दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअरमध्ये समावेश करण्यात यावा याकरिता प्रयत्न करावे तसेच अभ्यास न करता अहवाल पाठविणाºया जलसंपदा अधिकाºयांवर कारवाई करण्यात यावी. यावेळी जिल्हाध्यक्ष शिवराज ओबेरॉय, शहराध्यक्ष गणेश पवार, सोनू नागरे, प्रवीण साळुंके, स्वप्नील सोनवणे, अनिकेत कपोते, प्रशांत पाटील, बबन जाधव, मंगेश भदरगे, प्रभाकर सोनवणे आदी उपस्थित होते.पाणी नाही, मग : जायकवाडीला का सोडता?दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअरमध्ये नाशिकचा समावेश झाला तर नाशिकमध्ये मोठी औद्योगिक गुंतवणूक होऊन येथील कामगारांना मोठा रोजगार उपलब्ध होणार आहे. नाशिकच्या पाण्याचा प्रश्न ज्वलंत असताना जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात येत आहे. तेथील औद्योगिकीकरणासाठी नाशिकचे पाणी देता येत असेल तर मुबलक पाण्याचा विचार करता दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअरमध्ये नाशिकचा समावेश करण्यात यावा, असेही म्हटले आहे.

टॅग्स :MIDCएमआयडीसीNashikनाशिक