शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

दिल्ली-मुंबई कॉरिडोरमध्ये नाशिकचा समावेश करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 00:45 IST

दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअरच्या दुसऱ्या टप्प्यात नाशिकचा समावेश करण्यात यावा, तसेच अभ्यास न करता पहिल्या टप्प्यात डीएमआयसीला अहवाल पाठविणाºया जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार युनियनने केली आहे.

नाशिक : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअरच्या दुसऱ्या टप्प्यात नाशिकचा समावेश करण्यात यावा, तसेच अभ्यास न करता पहिल्या टप्प्यात डीएमआयसीला अहवाल पाठविणाºया जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार युनियनने केली आहे.  यासंदर्भात विभागीय उपायुक्त यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअर योजना म्हणजे देशभरातील महामार्गाभोवती इंडस्ट्रीयल कॉरिडोअर उभे करणे. नाशिक जिल्हा हा मुंबई-पुणे-नाशिक अशा सुवर्ण त्रिकोणात असतानाही दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअर योजनेतून नाशिकला वगळण्यात आले आहे. सर्वाधिक धरणाचा जिल्हा अशी ख्याती नाशिकची आहे. परंतु मुबलक पाणी नाही या कारणाने दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअरच्या पहिल्या टप्प्यातून नाशिकला वगळण्यात आले. औरंगाबादला पाणीपुरवठा करणाºया जायकवाडी धरणात नाशिकमधून पाणी जाते असे असतानासुद्धा नाशिकला मुबलक पाणी नाही, असा अहवाल अभ्यास न करताच जलसंपदा विभागाने दिल्याने दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअरमधून नाशिकला बाजू करून यात औरंगाबादचा समावेश करण्यात आला. दुसºया टप्प्यात दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअरमध्ये नाशिकला संधी उपलब्ध आहे. याकरिता जलसंपदा विभागाकडून अभ्यास न करताच दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअरला अहवाल पाठविण्यात येऊ नये व नाशिकचा दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअरमध्ये समावेश करण्यात यावा याकरिता प्रयत्न करावे तसेच अभ्यास न करता अहवाल पाठविणाºया जलसंपदा अधिकाºयांवर कारवाई करण्यात यावी. यावेळी जिल्हाध्यक्ष शिवराज ओबेरॉय, शहराध्यक्ष गणेश पवार, सोनू नागरे, प्रवीण साळुंके, स्वप्नील सोनवणे, अनिकेत कपोते, प्रशांत पाटील, बबन जाधव, मंगेश भदरगे, प्रभाकर सोनवणे आदी उपस्थित होते.पाणी नाही, मग : जायकवाडीला का सोडता?दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअरमध्ये नाशिकचा समावेश झाला तर नाशिकमध्ये मोठी औद्योगिक गुंतवणूक होऊन येथील कामगारांना मोठा रोजगार उपलब्ध होणार आहे. नाशिकच्या पाण्याचा प्रश्न ज्वलंत असताना जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात येत आहे. तेथील औद्योगिकीकरणासाठी नाशिकचे पाणी देता येत असेल तर मुबलक पाण्याचा विचार करता दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअरमध्ये नाशिकचा समावेश करण्यात यावा, असेही म्हटले आहे.

टॅग्स :MIDCएमआयडीसीNashikनाशिक