शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

कृषिपंप चोरणारी टोळी सक्रीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 16:44 IST

गोदाकाठी भीतीचे वातावरण : पोलिसांकडून दुर्लक्ष

ठळक मुद्देमहागडे कृषिपंप चोरीला जाण्याचे सत्र सरार्स सरू असून पोलीस प्रशासनाचे मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोस येथील गिरणा काठ परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरींवरील कृषिपंप चोरणारी टोळी पुन्हा सक्र ीय झाली असून, महागडे कृषिपंप चोरीस जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या दहा वर्षापासून शेतकर्यांचे महागडे कृषिपंप चोरीला जाण्याचे सत्र सरार्स सरू असून पोलीस प्रशासनाचे मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे.पिळकोस येथील मधुकर पंडित वाघ या शेतक-याचा दोन महिन्यापूर्वी तीस हजार रु पये खर्च करून घेतलेला पाच एच.पी .चा कृषिपंप चोरटयांनी चोरुन नेला. तर मागील वर्षी याच दिवसात सुरेश जाधव यांचाही कृषिपंप व इतर साहित्य चोरीला गेले होते. याशिवाय, २० ते ३० शेतक-यांचे साहित्यही चोरीस गेले आहे. मधुकर वाघ या शेतक-याची दोन ठिकाणी शेतजमीन आहे व विहीर असून ते मळ्यात राहतात. शुक्रवारी (दि.३) सकाळी शेतकरी वाघ यांचा मुलगा दत्तूहा गिरणा नदीत काठाकडे असलेल्या विहिरीवरील मोटार चालू करण्यासाठी गेला असता , त्यांना विहरीवरील कृषिपंप, केबल आणि इतर साहित्य चोरीला गेले असल्याचे लक्षात आल. या परिसरातून शेतातील विहारीमधून कृषिपंप चोरीला जाणे हे नित्याचे झाले असल्यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. पोलीस प्रशासनाकडून मात्र दुर्लक्ष केले जात असल्याने शेतकरी बांधवांकडून संताप व्यक्त केला जात आहे . परिसरात सराईत गुन्हेगारांची टोळी पुन्हा सक्र ीय झाली असल्यामुळे मळ्यात राहणारे शेतकरी ,शेतमजूर ,पशुपालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे . पोलिस यंत्रणेने रात्री खेडोपाडी गस्त वाढवावी अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांकडून होत आहे .शेळ्यांचीही चोरीपिळकोस परिसरात आजवर मोठ्या प्रमाणावर कृषी पंप चोरीला गेले आहेत. एका कृषिपंपची किंमत तीस हजाराच्या पुढे आहे . पाच वर्षाच्या कालावधीत पिळकोस परिसरात शेकडो शेळ्या चोरीला गेल्या असून एका शेळीची किंमत दहा हजाराच्या आसपास आहे.त्यामुळे शेतकरी व पशुपालकांचे मोठे नुकसान होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकtheftचोरी