शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

अशोकस्तंभावर दुचाकीस्वारांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 00:54 IST

स्मार्ट रोडमुळे नागरिकांना होणारा त्रास तर टळत नाहीच, परंतु वाहतूक पोलिसांकडून या भागात दुुचाकी उभी केली की टोइंग करणारे वाहन उचलून घेते. मात्र याच ठिकाणी अस्ताव्यस्त स्वरूपात असलेल्या रिक्षाचालकांवर आणि अन्य मोठ्या वाहनांवर कारवाई का केली जात नाही, हे मात्र आश्चर्यकारकच आहे.

नाशिक : स्मार्ट रोडमुळे नागरिकांना होणारा त्रास तर टळत नाहीच, परंतु वाहतूक पोलिसांकडून या भागात दुुचाकी उभी केली की टोइंग करणारे वाहन उचलून घेते. मात्र याच ठिकाणी अस्ताव्यस्त स्वरूपात असलेल्या रिक्षाचालकांवर आणि अन्य मोठ्या वाहनांवर कारवाई का केली जात नाही, हे मात्र आश्चर्यकारकच आहे.शहर स्मार्ट करण्याच्या नावाखाली महापालिकेच्या नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमी कंपनीने अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका दरम्यानचे हाती घेतलेले काम वर्र्ष-दीड वर्षापासून सुरूच आहे. हे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. या भागात दुकाने आणि शाळा आहेच, परंतु त्याचबरोबर हे रहिवासी क्षेत्रदेखील आहे, परंतु या नागरिकांना काय अडचणी येऊ शकतात हेदेखील समजून नियोजन केलेले नाही. गेल्या दीड ते दोन वर्षांपासून हा रस्ता घोळात आहे. परंतु त्यावर शहरातील नेते आणि राजकीय पक्ष आवाज उठवत नाहीत. या भागातील रस्त्यावरील दुकानात जायचे असेल तर लोकांना दुचाकी कोठे उभ्या करायच्या असा प्रश्न निर्माण होतो. येथील एखाद्या दुकानात जाण्यासाठी दोन मिनिटे गाडी उभी केली की टोइंग करणारी गाडी येते आणि गाडी घेऊन जाते. संबंधितांना विनंती करून दंड भरण्याची तयारी दर्शविली तरी गाडी सोडली जात नाही. इतकी वाहतूक शिस्त दाखवली जाते आणि दुसरीकडे मात्र याच ठिकाणी रिक्षा आणि अन्य मोठी प्रवासी वाहने अस्ताव्यस्त उभी असतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळाही होत असतो. परंतु त्यांच्यावर मात्र कोणीही कारवाई करीत नाही. मुळात हा त्रास दूर करण्यासाठी एक तर रस्ता कसा पूर्ण होईल यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे. परंतु अनेक महापालिका आयुक्त येऊन गेले तरी रस्ता कधी पूर्ण होईल हे कोणीच सांगू शकत नाही, हा विचित्र प्रकार आहे.किमान परिस्थितीचा तरी विचार करावावर्ष-दीड वर्षापासून स्मार्ट रोडचा विषय गाजत आहे, परंतु हे काम रखडले आहे. त्यामुळे नागरिकांना कुठेही वाहने उभी करावी लागतात. किमान त्याचा विचार करून तरी वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी किंवा नाही याचा विचार करावा.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस