शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

नाशिक विभागात बारावीच्या तेरा कॉपीबहाद्दरांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 20:00 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेस बुधवार (दि. 21) पासून प्रारंभ झाला असून, या परीक्षेत शिक्षण मंडळाने पहिल्याच दिवशी 13 कॉपीबहाद्दरांवर कारवाई केली आहे. नाशिक विभागात 226 परीक्षा केंद्रांवर एक लाख 68 हजार 220 विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले आहेत.

ठळक मुद्देबुधवारपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात पहिल्याच दिवशी तेरा कॉपी बहाद्दरांवर कारवाईनाशिक विभागात शिक्षण विभागाची करडी नजर

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेस बुधवार (दि. 21) पासून प्रारंभ झाला असून, या परीक्षेत शिक्षण मंडळाने पहिल्याच दिवशी 13 कॉपीबहाद्दरांवर कारवाई केली आहे. नाशिक विभागात 226 परीक्षा केंद्रांवर एक लाख 68 हजार 220 विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले आहेत.नाशिक विभागातून बारावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये एक लाख 60 हजार 660 नियमित विद्यार्थी असून, साडेसात हजार पुनर्परीक्षार्थी आणि 6 हजार 787 खासगी विद्याथ्र्याचा समावेश आहे. विभागातील 987 ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी या परीक्षेचे आयोजन 226 केंद्रांवर करण्यात आले आहे. बारावी अभ्यासक्र माच्या चारही विद्या शाखेत कला शाखेतून सर्वाधिक विद्यार्थी असून, त्याखालोखाल विज्ञान शाखेतून सर्वांत जास्त परीक्षार्थी आहेत. विभागीय मंडळामार्फत चारही जिल्ह्यांना प्रत्येकी एक समुपदेशकाची नियुक्ती केली आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या भरारी पथकासोबत सीसीटीव्ही कॅमेराही असणार आहे. उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत बोर्डाने यंदा कडक धोरण निश्चित केलेले असून, अशा विद्यार्थ्यांना बोर्डाच्या चौकशीला सामोरे जावे लागणार असल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळेपूर्वीच परीक्षा केंद्रावर पोहोचून आपल्या आसन क्रमांकावर बसून घेतले होते. उशिरा येण्याऱ्या विद्यार्थ्यांची उशिराच्या कारणांची शहानिशा करून प्रवेश दिला जाणार असला तरी विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी वेळवरच पोहचण्याचा प्रयत्न केला.नाशिक जिल्ह्यातून 74 हजार परीक्षार्थीबारावीच्या परीक्षेसाठी नाशिक जिल्ह्यातून 74 हजार 322 विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. यासाठी जिल्हाभरात 89 परीक्षा केंद्रांवर आसन व्यवस्था करण्यात आली असून, बुधवारी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत पहिला पेपर इंग्रजी भाषेचा घेण्यात आला. ही परीक्षा 20 मार्चपर्यंत चालणार आहे.कॉपीबहाद्दरांवर कारवाईबारावीची यंदाची परीक्षा ही कॉपीमुक्त व्हावी आणि गतवर्षीसारखे सोशल मीडियावर प्रश्नप्रत्रिका व्हायरल होण्यासारखे गैरप्रकार टळावेत यासाठी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी करडी नजर ठेवली आहे. त्यामुळे नाशिक विभागातून जळगाव जिल्ह्यातून 3, नाशिक जिल्ह्यातून तीन व धुळे जिल्ह्यातून 5 कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. तर नंदुरबार जिल्ह्यातून मात्र कोणताही विद्यार्थ्यांनी नक्कल करताना आढळला नाही. नक्कल करणाऱ्या विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका काढून घेत त्याची तपासणी करून पुन्हा नवीन उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी आल्याची माहिती शिक्षण मंडळाने दिली.

 

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थीeducationशैक्षणिक