शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संपावर जाणाऱ्या रेशन दुकानदारांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 13:55 IST

राज्यातील रेशन दुकानदारांनी गेल्याच आठवड्यात विधीमंडळ अधिवेशनावर मोर्चा काढून जोरदार शक्तीप्रदर्शन केले होते. त्यात प्रामुख्याने रेशन दुकानदारांना शासकीय सेवेत समाविष्ट करून शासकीय नियमानुसार वेतन देण्यात यावे, वधवा समितीच्या अहवालानुसार धान्य दुकान परवानाधारकांना

ठळक मुद्देसरकारचा निर्णय : परवाने रद्द करण्याच्या नोटीसाअन्नसुरक्षा कायद्याचा भंग होणार असल्याने सरकार पुढे मोठा पेच

नाशिक : राज्य सरकारकडे प्रलंबीत असलेल्या मागण्यांसाठी येत्या १ एप्रिलपासून बेमुदत संपावर जाण्याची तयारी करणा-या राज्यातील रेशन दुकानदारांच्या संभाव्य संपामुळे घाबरलेल्या सरकारने रेशन दुकानदारांना विविध मार्गाने धमकाविण्यास सुरूवात केली असून, दोन दिवसांपुर्वीच काढलेल्या एका आदेशान्वये संप करू पाहणा-या दुकानदारांवर कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्यात प्रामुख्याने जीवनावश्यक वस्तु कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याबरोबरच त्यांच्या दुकानांचे परवाने रद्द करण्यात येतील याची जाणिव करून द्यावे असे म्हटले आहे.राज्यातील रेशन दुकानदारांनी गेल्याच आठवड्यात विधीमंडळ अधिवेशनावर मोर्चा काढून जोरदार शक्तीप्रदर्शन केले होते. त्यात प्रामुख्याने रेशन दुकानदारांना शासकीय सेवेत समाविष्ट करून शासकीय नियमानुसार वेतन देण्यात यावे, वधवा समितीच्या अहवालानुसार धान्य दुकान परवानाधारकांना दरमहा ५६००० मासिक वेतन द्यावे, केरोसिन परवाना धारकांचे पुनर्वसन करण्यात यावे, केरोसिन विक्रेत्यांना गॅस वितरणाचे कामकाज देण्यात यावे, दुकानदारांना गाडीतच धान्य मोजून द्यावे आदी मागण्यांसाठी राज्य फेडरेशन व महासंघाने मोर्चा काढला होता. तथापि, रेशन दुकानदारांचा मोर्चा निघण्यापुर्वीच राज्याचे अन्न व पुरवठामंत्री गिरीष बापट यांनी रेशन दुकानदारांच्या मागण्या अव्यवहार्य व अवाजवी संबोधून फेटाळल्या होत्या. त्यामुळे चिडलेल्या रेशन दुकानदार संघटनेने येत्या १ एप्रिल पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. दुकानदारांच्या संपामुळे केंद्र सरकारने केलेल्या राष्टÑीय अन्नसुरक्षा कायद्याचा भंग होणार असल्याने सरकार पुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. या कायद्यान्वये रेशनमधून अन्नधान्य मिळण्यास पात्र असलेल्या लाभार्थींना सवलतीच्या दरात धान्य न मिळाल्यास दंडाची तरतूद करण्यात आली आहे.त्या पार्श्वभुमीवर राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा खात्याचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी तातडीने सर्व जिल्हा पुरवठा अधिका-यांना पत्र पाठवून आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सुचना दिल्या आहेत.१ एप्रिलपासून दुकानदार संपावर जाणार असल्याने एप्रिल महिन्याचे धान्याचे वाटप ३१ मार्च पुर्वीच दुकानदारांना करण्यात यावे असे आदेश देण्यात आले असून, दुकानदारांनी धान्य उचलण्यास नकार दिला अथवा दुकान बंद ठेवल्यास जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ व राष्टÑीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ मधील तरतुदींचा भंग केल्याचे समजण्यात येईल असे दुकानदारांना कळविण्यात यावे तसेच त्यांचे परवाने रद्द करण्यात येतील याचीही जाणिव करून देण्यात यावी अशा सुचनाही देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक