शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

संपावर जाणाऱ्या रेशन दुकानदारांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 13:55 IST

राज्यातील रेशन दुकानदारांनी गेल्याच आठवड्यात विधीमंडळ अधिवेशनावर मोर्चा काढून जोरदार शक्तीप्रदर्शन केले होते. त्यात प्रामुख्याने रेशन दुकानदारांना शासकीय सेवेत समाविष्ट करून शासकीय नियमानुसार वेतन देण्यात यावे, वधवा समितीच्या अहवालानुसार धान्य दुकान परवानाधारकांना

ठळक मुद्देसरकारचा निर्णय : परवाने रद्द करण्याच्या नोटीसाअन्नसुरक्षा कायद्याचा भंग होणार असल्याने सरकार पुढे मोठा पेच

नाशिक : राज्य सरकारकडे प्रलंबीत असलेल्या मागण्यांसाठी येत्या १ एप्रिलपासून बेमुदत संपावर जाण्याची तयारी करणा-या राज्यातील रेशन दुकानदारांच्या संभाव्य संपामुळे घाबरलेल्या सरकारने रेशन दुकानदारांना विविध मार्गाने धमकाविण्यास सुरूवात केली असून, दोन दिवसांपुर्वीच काढलेल्या एका आदेशान्वये संप करू पाहणा-या दुकानदारांवर कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्यात प्रामुख्याने जीवनावश्यक वस्तु कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याबरोबरच त्यांच्या दुकानांचे परवाने रद्द करण्यात येतील याची जाणिव करून द्यावे असे म्हटले आहे.राज्यातील रेशन दुकानदारांनी गेल्याच आठवड्यात विधीमंडळ अधिवेशनावर मोर्चा काढून जोरदार शक्तीप्रदर्शन केले होते. त्यात प्रामुख्याने रेशन दुकानदारांना शासकीय सेवेत समाविष्ट करून शासकीय नियमानुसार वेतन देण्यात यावे, वधवा समितीच्या अहवालानुसार धान्य दुकान परवानाधारकांना दरमहा ५६००० मासिक वेतन द्यावे, केरोसिन परवाना धारकांचे पुनर्वसन करण्यात यावे, केरोसिन विक्रेत्यांना गॅस वितरणाचे कामकाज देण्यात यावे, दुकानदारांना गाडीतच धान्य मोजून द्यावे आदी मागण्यांसाठी राज्य फेडरेशन व महासंघाने मोर्चा काढला होता. तथापि, रेशन दुकानदारांचा मोर्चा निघण्यापुर्वीच राज्याचे अन्न व पुरवठामंत्री गिरीष बापट यांनी रेशन दुकानदारांच्या मागण्या अव्यवहार्य व अवाजवी संबोधून फेटाळल्या होत्या. त्यामुळे चिडलेल्या रेशन दुकानदार संघटनेने येत्या १ एप्रिल पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. दुकानदारांच्या संपामुळे केंद्र सरकारने केलेल्या राष्टÑीय अन्नसुरक्षा कायद्याचा भंग होणार असल्याने सरकार पुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. या कायद्यान्वये रेशनमधून अन्नधान्य मिळण्यास पात्र असलेल्या लाभार्थींना सवलतीच्या दरात धान्य न मिळाल्यास दंडाची तरतूद करण्यात आली आहे.त्या पार्श्वभुमीवर राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा खात्याचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी तातडीने सर्व जिल्हा पुरवठा अधिका-यांना पत्र पाठवून आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सुचना दिल्या आहेत.१ एप्रिलपासून दुकानदार संपावर जाणार असल्याने एप्रिल महिन्याचे धान्याचे वाटप ३१ मार्च पुर्वीच दुकानदारांना करण्यात यावे असे आदेश देण्यात आले असून, दुकानदारांनी धान्य उचलण्यास नकार दिला अथवा दुकान बंद ठेवल्यास जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ व राष्टÑीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ मधील तरतुदींचा भंग केल्याचे समजण्यात येईल असे दुकानदारांना कळविण्यात यावे तसेच त्यांचे परवाने रद्द करण्यात येतील याचीही जाणिव करून देण्यात यावी अशा सुचनाही देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक