शहरं
Join us  
Trending Stories
1
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
2
सोने व्यापारी, पत्नी आणि तो...! एकाकडे पिस्तूल, दुसऱ्याकडे चाकू, तिघांचाही मृत्यू; कोणी कोणाला मारले? शेजारी, पोलिसही चक्रावले...
3
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
4
Hyundai Cars Price Hike: ह्युंदाई क्रेटा, व्हेन्यू, एक्स्टर... आजपासून ह्युंदाईच्या कार्स महागल्या, किती खिसा रिकामा करावा लागणार?
5
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
6
मुंबईत रिपब्लिकन पक्षाला १७ ऐवजी १२ जागा : आठवले
7
९८ लाख कोटींच्या साम्राज्याचा सम्राट निवृत्त! वॉरेन बफे यांचा कंपनीतून ९५ व्या वर्षी राजीनामा
8
आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
9
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
10
आजपासून काय-काय बदलणार? एलपीजी, सीएनजी स्वस्त? कार महागणार, पीएफच्या नियमांतही मोठे बदल होणार अन् बरंच काही...!
11
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
12
टीव्ही-फ्रिजसह अनेक उपकरणांवर आजपासून ‘रेटिंग’ बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वीज, इंधनाची होणार बचत
13
अल्प बचत योजनांचे व्याजदर सलग सातव्यांदा ‘जैसे थे’च
14
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
15
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
16
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
17
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
18
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
19
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
20
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
Daily Top 2Weekly Top 5

एनबीटीच्या प्राचार्यांवर कारवाई पुणे विद्यापीठ : परीक्षेचे कोणतेही काम करण्यास मनाई

By admin | Updated: May 9, 2014 23:58 IST

नाशिक : न. ब. ठाकूर (एनबीटी) विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अस्मिता वैद्य यांच्यावर दंडात्मक कारवाई करून त्यांना वर्षभरासाठी कामकाज करण्यास मनाई करण्यात आली आहे. पुणे विद्यापीठाच्या छाननी तालनीकरण विभागाकडून सदर कारवाई करण्यात आली. विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारींची दखल घेत ही कारवाई केल्याचे समजते.

नाशिक : न. ब. ठाकूर (एनबीटी) विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अस्मिता वैद्य यांच्यावर दंडात्मक कारवाई करून त्यांना वर्षभरासाठी कामकाज करण्यास मनाई करण्यात आली आहे. पुणे विद्यापीठाच्या छाननी तालनीकरण विभागाकडून सदर कारवाई करण्यात आली. विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारींची दखल घेत ही कारवाई केल्याचे समजते. एलएलबी व बीएसएल शाखेच्या प्रात्यक्षिक गुणांवरून विद्यार्थ्यांना धमकावणे, त्यांचा मानसिक छळ करून त्यांना वेठीस धरणे अशा आशयाच्या तक्रारी काही विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या छाननी व तालनीकरण विभागाकडे केल्या होत्या. त्यावर निर्णय देताना विद्यापीठाने प्राचार्य डॉ. वैद्य यांच्यावर एक हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करीत एप्रिल २०१४ पासून एक वर्षासाठी विद्यापीठाच्या कोणत्याही परीक्षेचे काम करण्यास मनाई केली आहे. त्याचबरोबर याबाबतची नोंद सेवापुस्तकात करून तसे परीक्षा नियंत्रकांना कळवावे, असेही स्पष्ट केले आहे. याबाबतचे पत्र प्राप्त झाल्यानंतर डॉ. वैद्य यांनी परीक्षेचा संपूर्ण कार्यभार प्रा. कादरी यांना सोपविला आहे. दरम्यान, याच महाविद्यालयातील प्रा. सुनंदा काळे यांच्या विरोधात मानसिक छळ केल्याप्रकरणी एका विद्यार्थिनीने विद्यापीठाकडे तक्रार केल्याने महाविद्यालयातील कारभाराबाबत शंका उपस्थित केली जात आहे. विद्यापीठाकडे दाद मागणारज्या विद्यार्थ्यांनी माझ्याविरोधात तक्रारी केल्या त्या विद्यार्थ्यांची वागणूक विद्यापीठाने पडताळून बघणे अपेक्षित होते. कारण त्यांनी केलेले आरोप हे पूर्णत: चुकीचे असून, त्याबाबत विद्यापीठाकडे दाद मागणार आहे. विद्यापीठाच्या कारवाईमुळे धक्काच बसला असून, मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. - डॉ. अस्मिता वैद्य, प्राचार्य, न. ब. विधी महाविद्यालयइतरांनी धडा घ्यावाविद्यापीठाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक गुणांवरून वेठीस धरणे हे पूर्णत: चुकीचे असून, या प्रकरणावरून अशी मानसिकता असलेल्या प्राध्यापकांनी धडा घेण्याची आवश्यकता आहे. ज्या विद्यार्थ्यांचा अशा प्रकारे छळ केला जात असेल त्यांनी विद्यापीठाकडे तक्रार करावी. - अजिंक्य गिते, तक्रारकर्ता