शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
2
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
3
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
4
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
5
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
6
मायेची सावली! भावासाठी बहीण झाली ढाल; किडनी डोनेट करुन दिलं जीवदान, रक्षाबंधन झालं खास
7
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
8
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
9
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
10
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
11
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
12
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
13
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?
14
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
15
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
16
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
17
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
18
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
19
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
20
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक

अभिनव भारत’च्या वाड्याचे होणार पर्यटनस्थळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 00:22 IST

सशस्त्र क्रांतीचे पुरस्कर्ते आणि प्रखर राष्टÑवादी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी नाशिकमध्ये स्थापन केलेल्या अभिनव भारत या संस्था ज्या वाड्यात आहे, त्याचा आता कायापालट होणार असून, स्वातंत्र्यवीर सावरकरांसह अन्य नाशिकमधील क्रांतिकारकांची माहिती देणारे हे एक स्मारक ठरणार आहे.

नाशिक : सशस्त्र क्रांतीचे पुरस्कर्ते आणि प्रखर राष्टÑवादी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी नाशिकमध्ये स्थापन केलेल्या अभिनव भारत या संस्था ज्या वाड्यात आहे, त्याचा आता कायापालट होणार असून, स्वातंत्र्यवीर सावरकरांसह अन्य नाशिकमधील क्रांतिकारकांची माहिती देणारे हे एक स्मारक ठरणार आहे. सुमारे आठ कोटी रुपये खर्च करून हे पर्यटनस्थळ साकारण्यात येणार असून, त्यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे पाठविण्यात आले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची क्रांतिकारी संघटना म्हणून अभिनव भारत संघटना सुपरिचित आहे. प्लेगच्या काळात पुणे येथे सावरकर यांची म्हसकर आणि पागे यांच्याशी परिचय झाल्यांनतर त्यांनी राष्टÑभक्तांची चळवळ वाढविण्यासाठी १८९९ मध्ये राष्ट्रभक्त समूह या संस्थेची स्थापना झाली. त्याचे उघड निरूपद्रवी संघटनेचा स्थापन करण्यासाठी १ जानेवारी १९०० रोजी नाशिकमध्ये मित्रमेळा संघटनेची स्थापना करण्यात आली. या संघटनेचे काम सुरू झाल्यानंतर संघटनेचे नाव काहीसे मुळमुळीत वाटत असल्याने त्यानंतर या संघटनेचे मे १९०४ मध्ये या संघटनेचे नाव अभिनव भारत करण्यात आले. इटलीच्या मॅझिनीने स्थापन केलेल्या यंग इटलीच्या आधारे हे नामकरण त्यावेळी सावरकरांनी केले होते. स्वातंत्र्यप्राप्तीचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर १९५२ मध्ये सावरकर यांनी अभिनव भारतसह अन्य तीन संस्था विसर्जित केल्या असल्या तरी नाशिकमध्ये तीळभांडेश्वर लेनमध्ये आजही अभिनव भारत मंदिर आहे.या वाड्याची अवस्था बिकट होत आहे. वाड्याच्या पहिल्या मजल्यावर सावरकर यांच्या जीवनावरील साहित्य आणि काही वस्तू तसेच अन्य नाशिकच्या क्रांतिकारकांची माहिती उपलब्ध आहे. यावाड्याची अवस्था बघता त्याचे नूतनीकरण करण्यात येणार असून, आमदार देवयानी फरांदे यांनी तसा प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकाºयांमार्फत शासनाला पाठविला आहे. त्यानुसार वाड्याचे नूतनीकरण करताना पुरातन स्वरूप कायम ठेवण्यात येणार असून, जुन्या काळातील दगडी रस्ता साकारण्यात येणार आहे. याच सावरकर यांची ग्रंथसंपदा साहित्य याचबरोबर माहितीपटदेखील साकारण्यात येणार आहे.कान्हेरे, कवी गोविंदांवरही माहितीपट४अभिनव भारत मंदिरात सावरकर यांच्याबरोबरच जॅक्सनचा वध करणारे हुतात्मा अनंत कान्हेरे आणि कवी गोविंद यांच्यादेखील स्वतंत्र्य खोल्या तयार करून त्यांचे साहित्य तसेच माहितीपट साकारण्याचा प्रस्ताव आहे. सदरचा प्रस्ताव दुरस्तीसह शासनाला पाठविण्यात आला असून, पर्यटनमंत्री जयकुमार रावळ यांनीदेखील त्यास अनुकूलता दर्शविल्याचे आमदार फरांदे यांनी सांगितले.स्वातंत्र्यवीर सावरकर हे या वाड्याजवळच दातार यांच्या वाड्यात वास्तव्यास होते. त्यामुळे सावरकर या वाड्यात राहत होते, याची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी वाड्यावर फलक लावण्यात येणार असून, अशाच प्रकारे अभिनव भारतशी संबंधित सर्व क्रांतिकारकांचे वाडे शोधून तेथेही फलक लावण्याचा प्रस्ताव आहे.स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अभिनव भारत मंदिराच्या वाड्याची दुरवस्था झाली आहे. त्याचे नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव पाच वर्षांपूर्वीच तयार करण्यात आला आहे. परंतु हा वाडा पूररेषेत असल्याने महापालिका नूतनीकरणदेखील मंजूर करीत नाही. माजी महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांनी मनपाच्या वतीने ५० लाख रुपये मंजूर केले आहेत. नगरसेवक शाहू खैरे वाड्याच्या दुरुस्तीसाठी सहकार्य करतात. त्याचबरोबर अनेक नागरिक सर्व प्रकारची मदत करण्यास तयार आहेत. परंतु मंजुरीमुळे हा प्रस्ताव रखडला आहे. शासनाने याबाबत पुढाकार घेऊन नूतनीकरण केल्यास चांगलेच होईल.- सूर्यकांत रहाळकर, अध्यक्ष, अभिवन भारत ट्रस्ट

टॅग्स :tourismपर्यटन