शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

अभिनव भारत’च्या वाड्याचे होणार पर्यटनस्थळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 00:22 IST

सशस्त्र क्रांतीचे पुरस्कर्ते आणि प्रखर राष्टÑवादी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी नाशिकमध्ये स्थापन केलेल्या अभिनव भारत या संस्था ज्या वाड्यात आहे, त्याचा आता कायापालट होणार असून, स्वातंत्र्यवीर सावरकरांसह अन्य नाशिकमधील क्रांतिकारकांची माहिती देणारे हे एक स्मारक ठरणार आहे.

नाशिक : सशस्त्र क्रांतीचे पुरस्कर्ते आणि प्रखर राष्टÑवादी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी नाशिकमध्ये स्थापन केलेल्या अभिनव भारत या संस्था ज्या वाड्यात आहे, त्याचा आता कायापालट होणार असून, स्वातंत्र्यवीर सावरकरांसह अन्य नाशिकमधील क्रांतिकारकांची माहिती देणारे हे एक स्मारक ठरणार आहे. सुमारे आठ कोटी रुपये खर्च करून हे पर्यटनस्थळ साकारण्यात येणार असून, त्यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे पाठविण्यात आले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची क्रांतिकारी संघटना म्हणून अभिनव भारत संघटना सुपरिचित आहे. प्लेगच्या काळात पुणे येथे सावरकर यांची म्हसकर आणि पागे यांच्याशी परिचय झाल्यांनतर त्यांनी राष्टÑभक्तांची चळवळ वाढविण्यासाठी १८९९ मध्ये राष्ट्रभक्त समूह या संस्थेची स्थापना झाली. त्याचे उघड निरूपद्रवी संघटनेचा स्थापन करण्यासाठी १ जानेवारी १९०० रोजी नाशिकमध्ये मित्रमेळा संघटनेची स्थापना करण्यात आली. या संघटनेचे काम सुरू झाल्यानंतर संघटनेचे नाव काहीसे मुळमुळीत वाटत असल्याने त्यानंतर या संघटनेचे मे १९०४ मध्ये या संघटनेचे नाव अभिनव भारत करण्यात आले. इटलीच्या मॅझिनीने स्थापन केलेल्या यंग इटलीच्या आधारे हे नामकरण त्यावेळी सावरकरांनी केले होते. स्वातंत्र्यप्राप्तीचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर १९५२ मध्ये सावरकर यांनी अभिनव भारतसह अन्य तीन संस्था विसर्जित केल्या असल्या तरी नाशिकमध्ये तीळभांडेश्वर लेनमध्ये आजही अभिनव भारत मंदिर आहे.या वाड्याची अवस्था बिकट होत आहे. वाड्याच्या पहिल्या मजल्यावर सावरकर यांच्या जीवनावरील साहित्य आणि काही वस्तू तसेच अन्य नाशिकच्या क्रांतिकारकांची माहिती उपलब्ध आहे. यावाड्याची अवस्था बघता त्याचे नूतनीकरण करण्यात येणार असून, आमदार देवयानी फरांदे यांनी तसा प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकाºयांमार्फत शासनाला पाठविला आहे. त्यानुसार वाड्याचे नूतनीकरण करताना पुरातन स्वरूप कायम ठेवण्यात येणार असून, जुन्या काळातील दगडी रस्ता साकारण्यात येणार आहे. याच सावरकर यांची ग्रंथसंपदा साहित्य याचबरोबर माहितीपटदेखील साकारण्यात येणार आहे.कान्हेरे, कवी गोविंदांवरही माहितीपट४अभिनव भारत मंदिरात सावरकर यांच्याबरोबरच जॅक्सनचा वध करणारे हुतात्मा अनंत कान्हेरे आणि कवी गोविंद यांच्यादेखील स्वतंत्र्य खोल्या तयार करून त्यांचे साहित्य तसेच माहितीपट साकारण्याचा प्रस्ताव आहे. सदरचा प्रस्ताव दुरस्तीसह शासनाला पाठविण्यात आला असून, पर्यटनमंत्री जयकुमार रावळ यांनीदेखील त्यास अनुकूलता दर्शविल्याचे आमदार फरांदे यांनी सांगितले.स्वातंत्र्यवीर सावरकर हे या वाड्याजवळच दातार यांच्या वाड्यात वास्तव्यास होते. त्यामुळे सावरकर या वाड्यात राहत होते, याची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी वाड्यावर फलक लावण्यात येणार असून, अशाच प्रकारे अभिनव भारतशी संबंधित सर्व क्रांतिकारकांचे वाडे शोधून तेथेही फलक लावण्याचा प्रस्ताव आहे.स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अभिनव भारत मंदिराच्या वाड्याची दुरवस्था झाली आहे. त्याचे नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव पाच वर्षांपूर्वीच तयार करण्यात आला आहे. परंतु हा वाडा पूररेषेत असल्याने महापालिका नूतनीकरणदेखील मंजूर करीत नाही. माजी महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांनी मनपाच्या वतीने ५० लाख रुपये मंजूर केले आहेत. नगरसेवक शाहू खैरे वाड्याच्या दुरुस्तीसाठी सहकार्य करतात. त्याचबरोबर अनेक नागरिक सर्व प्रकारची मदत करण्यास तयार आहेत. परंतु मंजुरीमुळे हा प्रस्ताव रखडला आहे. शासनाने याबाबत पुढाकार घेऊन नूतनीकरण केल्यास चांगलेच होईल.- सूर्यकांत रहाळकर, अध्यक्ष, अभिवन भारत ट्रस्ट

टॅग्स :tourismपर्यटन