शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

अभिनव भारत’च्या वाड्याचे होणार पर्यटनस्थळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 00:22 IST

सशस्त्र क्रांतीचे पुरस्कर्ते आणि प्रखर राष्टÑवादी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी नाशिकमध्ये स्थापन केलेल्या अभिनव भारत या संस्था ज्या वाड्यात आहे, त्याचा आता कायापालट होणार असून, स्वातंत्र्यवीर सावरकरांसह अन्य नाशिकमधील क्रांतिकारकांची माहिती देणारे हे एक स्मारक ठरणार आहे.

नाशिक : सशस्त्र क्रांतीचे पुरस्कर्ते आणि प्रखर राष्टÑवादी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी नाशिकमध्ये स्थापन केलेल्या अभिनव भारत या संस्था ज्या वाड्यात आहे, त्याचा आता कायापालट होणार असून, स्वातंत्र्यवीर सावरकरांसह अन्य नाशिकमधील क्रांतिकारकांची माहिती देणारे हे एक स्मारक ठरणार आहे. सुमारे आठ कोटी रुपये खर्च करून हे पर्यटनस्थळ साकारण्यात येणार असून, त्यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे पाठविण्यात आले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची क्रांतिकारी संघटना म्हणून अभिनव भारत संघटना सुपरिचित आहे. प्लेगच्या काळात पुणे येथे सावरकर यांची म्हसकर आणि पागे यांच्याशी परिचय झाल्यांनतर त्यांनी राष्टÑभक्तांची चळवळ वाढविण्यासाठी १८९९ मध्ये राष्ट्रभक्त समूह या संस्थेची स्थापना झाली. त्याचे उघड निरूपद्रवी संघटनेचा स्थापन करण्यासाठी १ जानेवारी १९०० रोजी नाशिकमध्ये मित्रमेळा संघटनेची स्थापना करण्यात आली. या संघटनेचे काम सुरू झाल्यानंतर संघटनेचे नाव काहीसे मुळमुळीत वाटत असल्याने त्यानंतर या संघटनेचे मे १९०४ मध्ये या संघटनेचे नाव अभिनव भारत करण्यात आले. इटलीच्या मॅझिनीने स्थापन केलेल्या यंग इटलीच्या आधारे हे नामकरण त्यावेळी सावरकरांनी केले होते. स्वातंत्र्यप्राप्तीचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर १९५२ मध्ये सावरकर यांनी अभिनव भारतसह अन्य तीन संस्था विसर्जित केल्या असल्या तरी नाशिकमध्ये तीळभांडेश्वर लेनमध्ये आजही अभिनव भारत मंदिर आहे.या वाड्याची अवस्था बिकट होत आहे. वाड्याच्या पहिल्या मजल्यावर सावरकर यांच्या जीवनावरील साहित्य आणि काही वस्तू तसेच अन्य नाशिकच्या क्रांतिकारकांची माहिती उपलब्ध आहे. यावाड्याची अवस्था बघता त्याचे नूतनीकरण करण्यात येणार असून, आमदार देवयानी फरांदे यांनी तसा प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकाºयांमार्फत शासनाला पाठविला आहे. त्यानुसार वाड्याचे नूतनीकरण करताना पुरातन स्वरूप कायम ठेवण्यात येणार असून, जुन्या काळातील दगडी रस्ता साकारण्यात येणार आहे. याच सावरकर यांची ग्रंथसंपदा साहित्य याचबरोबर माहितीपटदेखील साकारण्यात येणार आहे.कान्हेरे, कवी गोविंदांवरही माहितीपट४अभिनव भारत मंदिरात सावरकर यांच्याबरोबरच जॅक्सनचा वध करणारे हुतात्मा अनंत कान्हेरे आणि कवी गोविंद यांच्यादेखील स्वतंत्र्य खोल्या तयार करून त्यांचे साहित्य तसेच माहितीपट साकारण्याचा प्रस्ताव आहे. सदरचा प्रस्ताव दुरस्तीसह शासनाला पाठविण्यात आला असून, पर्यटनमंत्री जयकुमार रावळ यांनीदेखील त्यास अनुकूलता दर्शविल्याचे आमदार फरांदे यांनी सांगितले.स्वातंत्र्यवीर सावरकर हे या वाड्याजवळच दातार यांच्या वाड्यात वास्तव्यास होते. त्यामुळे सावरकर या वाड्यात राहत होते, याची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी वाड्यावर फलक लावण्यात येणार असून, अशाच प्रकारे अभिनव भारतशी संबंधित सर्व क्रांतिकारकांचे वाडे शोधून तेथेही फलक लावण्याचा प्रस्ताव आहे.स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अभिनव भारत मंदिराच्या वाड्याची दुरवस्था झाली आहे. त्याचे नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव पाच वर्षांपूर्वीच तयार करण्यात आला आहे. परंतु हा वाडा पूररेषेत असल्याने महापालिका नूतनीकरणदेखील मंजूर करीत नाही. माजी महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांनी मनपाच्या वतीने ५० लाख रुपये मंजूर केले आहेत. नगरसेवक शाहू खैरे वाड्याच्या दुरुस्तीसाठी सहकार्य करतात. त्याचबरोबर अनेक नागरिक सर्व प्रकारची मदत करण्यास तयार आहेत. परंतु मंजुरीमुळे हा प्रस्ताव रखडला आहे. शासनाने याबाबत पुढाकार घेऊन नूतनीकरण केल्यास चांगलेच होईल.- सूर्यकांत रहाळकर, अध्यक्ष, अभिवन भारत ट्रस्ट

टॅग्स :tourismपर्यटन