शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे 'अभिनव भारत' अखेर जमीनदोस्त

By संजय पाठक | Updated: February 26, 2024 10:42 IST

सावरकर प्रेमींची हळहळ, स्मारकाच्या नूतनीकरणावरून वाद

संजय पाठक, नाशिक-  स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी सशस्त्र क्रांतीची ज्योत जेथे पेटवली त्या नाशिकमधील अभिनव भारतचे कार्यालय असलेला वाडा अखेरीस शासनाने जमीन दोस्त केले आहे. अभिनव भारत स्मारकाचे नूतनीकरण करण्यात येणार असून त्यासाठी हा जुना वाडा तोडण्यात आला आहे. 

सावरकर यांच्या स्मृती दिनी हा प्रकार उघड झाल्याने सावरकर प्रेमींनी हळहळ व्यक्त केली आहे. दुसरीकडे हा वाडा अत्यंत जुना होता, त्यामुळे तो तोडून पुन्हा अशाच प्रकारच्या वाड्याची निर्मिती करण्यात येणार असल्याचे आमदार देवयानी फरांदे यांनी सांगितले.

नाशिक शहरातील दुर्गा मंगल कार्यालयाजवळ तीळभांडेश्वर लेन येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत चळवळ ज्या वाड्यात चालवली होती त्या वाड्याचे स्मारकात रूपांतर करण्यात येणार आहेत. 1899 ते 1909 या कालावधीत अभिनव भारतच्या माध्यमातून ब्रिटिशांच्या गुप्त चळवळी चालवल्या गेल्या. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अटक झाल्यानंतर चळवळीचे काम थंडावले होते.

दरम्यान, अभिनव भारत या वास्तूत अनेक भाडेकरू आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यालय होते या ठिकाणी अभिनव भारत हे स्मारक तयार करण्यासाठी सुमारे 6 कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे त्यामुळे हा वाडा पाडण्यात आला असून पूर्वीप्रमाणेच नवीन वाडा तयार करण्यात येणार आहे. या वाड्यात अंदमान येथील काळकोठडीची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे तसेच सावरकरांच्या जीवनावरील लघुपट, साहित्य आणि सावरकरांच्या जीवनावरील प्रश्नांना उत्तरे देणारा रोबोट अशा अनेक प्रकारच्या कल्पना साकारण्यात येणार आहे असे आमदार फरांदे यांनी सांगितले. दरम्यान अशा प्रकारे वाडा तोडून त्या ठिकाणी नवा वाडा बांधण्यावरून वाद सुरू झाला आहे. नाशिक मधील काही वास्तू तज्ञांनी नाराजी व्यक्त केली आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी या प्रकारामुळे धक्का बसल्याचे सांगितले. सावरकर कुटुंबीयांना अशा प्रकारे माहिती न देता वाडा पाडणे चुकीचे आहे असे त्यांनी सांगितले. मुळातच शासनाने केवळ निधी पुरवण्यापुरतीच स्मारकाबाबत भूमिका बजवावी, क्रांतिकारकांची स्मारक ही त्यांच्या वारसांच्या ताब्यात दिली पाहिजे तर त्याची ते उचित देखभाल करतात असे खुद्द स्वातंत्र्यवीर सावरकरांचे मत होते असेही रणजीत सावरकर म्हणाले.

टॅग्स :Vinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकर