शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
4
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
5
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
6
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
7
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
8
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
9
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
10
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
11
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
12
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
13
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
14
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
15
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
16
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
17
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
18
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
19
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
20
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे 'अभिनव भारत' अखेर जमीनदोस्त

By संजय पाठक | Updated: February 26, 2024 10:42 IST

सावरकर प्रेमींची हळहळ, स्मारकाच्या नूतनीकरणावरून वाद

संजय पाठक, नाशिक-  स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी सशस्त्र क्रांतीची ज्योत जेथे पेटवली त्या नाशिकमधील अभिनव भारतचे कार्यालय असलेला वाडा अखेरीस शासनाने जमीन दोस्त केले आहे. अभिनव भारत स्मारकाचे नूतनीकरण करण्यात येणार असून त्यासाठी हा जुना वाडा तोडण्यात आला आहे. 

सावरकर यांच्या स्मृती दिनी हा प्रकार उघड झाल्याने सावरकर प्रेमींनी हळहळ व्यक्त केली आहे. दुसरीकडे हा वाडा अत्यंत जुना होता, त्यामुळे तो तोडून पुन्हा अशाच प्रकारच्या वाड्याची निर्मिती करण्यात येणार असल्याचे आमदार देवयानी फरांदे यांनी सांगितले.

नाशिक शहरातील दुर्गा मंगल कार्यालयाजवळ तीळभांडेश्वर लेन येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत चळवळ ज्या वाड्यात चालवली होती त्या वाड्याचे स्मारकात रूपांतर करण्यात येणार आहेत. 1899 ते 1909 या कालावधीत अभिनव भारतच्या माध्यमातून ब्रिटिशांच्या गुप्त चळवळी चालवल्या गेल्या. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अटक झाल्यानंतर चळवळीचे काम थंडावले होते.

दरम्यान, अभिनव भारत या वास्तूत अनेक भाडेकरू आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यालय होते या ठिकाणी अभिनव भारत हे स्मारक तयार करण्यासाठी सुमारे 6 कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे त्यामुळे हा वाडा पाडण्यात आला असून पूर्वीप्रमाणेच नवीन वाडा तयार करण्यात येणार आहे. या वाड्यात अंदमान येथील काळकोठडीची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे तसेच सावरकरांच्या जीवनावरील लघुपट, साहित्य आणि सावरकरांच्या जीवनावरील प्रश्नांना उत्तरे देणारा रोबोट अशा अनेक प्रकारच्या कल्पना साकारण्यात येणार आहे असे आमदार फरांदे यांनी सांगितले. दरम्यान अशा प्रकारे वाडा तोडून त्या ठिकाणी नवा वाडा बांधण्यावरून वाद सुरू झाला आहे. नाशिक मधील काही वास्तू तज्ञांनी नाराजी व्यक्त केली आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी या प्रकारामुळे धक्का बसल्याचे सांगितले. सावरकर कुटुंबीयांना अशा प्रकारे माहिती न देता वाडा पाडणे चुकीचे आहे असे त्यांनी सांगितले. मुळातच शासनाने केवळ निधी पुरवण्यापुरतीच स्मारकाबाबत भूमिका बजवावी, क्रांतिकारकांची स्मारक ही त्यांच्या वारसांच्या ताब्यात दिली पाहिजे तर त्याची ते उचित देखभाल करतात असे खुद्द स्वातंत्र्यवीर सावरकरांचे मत होते असेही रणजीत सावरकर म्हणाले.

टॅग्स :Vinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकर