शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

"एकटाच चाळीस गद्दारांना घरी बसवेन"; आदित्य ठाकरेंनी रणशिंग फुंकले

By श्याम बागुल | Updated: July 22, 2023 16:06 IST

नाशिक येथे आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते.

नाशिक : जे म्हणत हाेते फंड देत नाहीत, आम्हाला त्रास देवून मतदार संघ गिळायला निघालेत ते आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले. विधीमंडळात त्यांचे चेहरे काळंवडल्याचे आपण पाहिले आहे. जनता शिवसेनेच्या सोबत आहे. अजून कोणाला जायचे आहे त्यांनी खुशाल जावे जनतेच्या बळावर आपण एकटेच चाळीस गद्दारांना घरी बसवू असा विश्वास व्यक्त करून युवा सेनेेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी, ज्यांच्या भाळी गद्दारीचा शिक्का बसला आहे अशांना विस्तारात मंत्रीपद मिळणार नाही हे लिहून ठेवा असा दावाही केला.

नाशिक येथे आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. राज्यात अलिबाबा चाळीस चोर सत्तेत सहभागी झाले आहेत. वर्षभरापासून फक्त घोेषणाच केल्या जात आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम करण्यात आले. परंतु त्यानंतर जे काही घडले ते पाहता राज्यात राजकीय पक्षांची दलदल झाली आहे. कोण कोठे बसले व कोणाला जावून मिळाले हे कळायलाच तयार नाही. ज्या मतदारांनी निवडून दिले, त्यांच्याशी प्रतारणा करण्यात आली आहे असा आरोप करून सध्या महाराष्ट्राला व मुंबईला तोडण्याचे काम सुरू आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्री दिल्ली समोर दर दोन दिवसाआड झूकत असून उठसूठ दिल्लीला मुजरा करण्यासाठी मुख्यमंत्री जाणार असतील तर महाराष्ट्रातील जनतेचे अश्रू कोण पुसणार असा सवालही ठाकरे यांनी केला.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेNashikनाशिक