शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

कपडे खरेदीसाठी दुचाकीने जाताना नाशिकमध्ये डाव्या कालव्यात बुडून युवकाच्या मृत्यू

By अझहर शेख | Updated: April 14, 2024 17:46 IST

कालव्याला आवर्तन सोडल्यामुळे पाण्यात वाहत त्याचा मृतदेह रविवारी (दि.१४) दुपारी म्हसोबा मंदिराच्या पटांगणाजवळ सापडला. मुंबईहून आई-वडिलांना भेटण्यासाठी आलेल्या सुजयवर काळाने अशी झडप घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

संदीप झिरवाळ -पंचवटी : एका स्पोर्ट्स दुचाकीवर मित्रासोबत पाठीमागे बसून डाव्या कालव्याच्या रस्त्याने अमृतधामकडे जात असताना अचानकपणे दुचाकीचालकाचे नियंत्रण सुटले अन् सुजय संतोष वाळवंटे (१९,रा.निलगीरी बाग) हा थेट कालव्यात पडला होता. कालव्याला आवर्तन सोडल्यामुळे पाण्यात वाहत त्याचा मृतदेह रविवारी (दि.१४) दुपारी म्हसोबा मंदिराच्या पटांगणाजवळ सापडला. मुंबईहून आई-वडिलांना भेटण्यासाठी आलेल्या सुजयवर काळाने अशी झडप घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

शनिवारी (दि.१३) रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास निलगिरी बाग वसाहतीत राहणारा सुजय हा त्याचा मित्र पुणेश सोमनाथ मुळे (१९) याच्यासोबत दुचाकीने (एमएच४६ बी.एम ६४०) निलगिरी बागेजवळच्या डाव्या कालव्यावरून अमृतधामकडे प्रवास करत होते. यावेळी पुणेशचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले अन् दुचाकी घसरून दोघे पडले. यावेळी पाठीमागे बसलेला सुजय हा कालव्यात कोसळल्याने पाटाच्या पाण्यात वाहून गेला होता. ही बाब काही प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी बघितली होती, यामुळे त्यांनी तातडीने घटनेची माहिती पोलिस व अग्निशमन दलाला कळविली. 

अग्निशमन दलाच्या जवानांसह पोलिसांनी शनिवारी घटनास्थळी धाव घेत कालव्यामध्ये शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र रात्री उशिरापर्यंत सुजयचा शोध लागू शकला नव्हता. अंधारामुळे शोधकार्य थांबविण्यात आले होते. दरम्यान रविवारी दुपारी सुजय ज्या ठिकाणी पाण्यात पडलेला होता त्याच ठिकाणी कपारीत अडकून मृतावस्थेत आढळून आला. त्याच्या मित्र पुणेश हादेखील जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :Deathमृत्यूdrowningपाण्यात बुडणे