शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

लाल फितीचा अजब कारभार; भेसळयुक्त तेल तपासणीसाठी ५ जिल्ह्यांना केवळ तीनच यंत्र

By suyog.joshi | Updated: October 7, 2023 12:55 IST

नाशिक शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यात सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेले खाद्य पदार्थ हे वेगेवेगळ्या तेलांपासून बनविले जातात.

सुयोग जोशी

नाशिक - पाच जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या नाशिक विभागात वारंवार तळल्या जाणाऱ्या तेलामधील भेसळ ओळखणारे टीपीसी मशीन केवळ तीनच उपलब्ध असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून, ऐन सणासुदीच्या काळात तेलातील भेसळ ओळखणार कशी, असा प्रश्न अन्न व औषध प्रशासन विभागासमोर उभा राहिला आहे.

नाशिक शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यात सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेले खाद्य पदार्थ हे वेगेवेगळ्या तेलांपासून बनविले जातात. पण, त्यांच्यातही सध्या भेसळ केली जात असल्याचे अनेक ठिकाणी दिसून येते. त्यात भेसळीच्या काही तक्रारी आल्यास अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने कारवाईही केली जाते. परंतु, तेलामध्ये स्वस्त, निकृष्ट, हानिकारक किंवा अनावश्यक पदार्थ जोडले जातात ज्यामुळे त्याचे स्वरूप आणि गुणवत्ता प्रभावित होऊ शकते. याच कारणास्तव या विभागामार्फत कारवाईसाठी सज्ज असलेल्या अधिकाऱ्यांना मात्र केवळ तीनच यंत्रे उपलब्ध आहेत.

काय आहे टीपीसी मशीन?टीपीसी म्हणजेच टोटल पोलर काऊंट मशीन. या मशीनद्वारे जळालेले तेल तपासता येते. त्या तेलात भेसळ आहे की नाही, याचीही स्पष्टता होते. त्यानंतर या विभागाकडून संबंधित आस्थापनेवर कारवाई केली जाते. त्यांना दंड ठोठावला जातो.

विभागातील टीपीसी मशीननाशिक-१नगर-१धुळे-जळगाव-१नंदुरबार-०

कर्मचाऱ्यांची उणीवजिल्ह्याच्या लोकसंख्येच्या मानाने अन्न व औषध प्रशासनाला सध्या मनुष्यबळाचीही कमतरता जाणवत आहे. या विभागात एकूण १९ पदे मंजूर असून, केवळ सहाच अधिकारी आहेत. त्यामुळे कामाचा ताण वाढला आहे. अनेकवेळा कारवाई करताना अडचणी येतात. कमी माणसांमुळे कारवाईसाठी दूर जाणेही अवघड होऊन बसते. त्यासाठी शासनाने या विभागाला जास्तीतजास्त आहे ती पदे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी होत आहे. शिवाय क्लेरिकलच्या जागाही रिक्त आहेत. अधिकाऱ्यांनाच क्लेरिकलची कामे करावी लागतात.

एकाच गाडीवर कारभाराचा भारनाशिक येथील अन्न व औषध प्रशासन विभागाला केवळ एकच वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे कारवाया करताना अडचणी येत असल्याचे समजते. एकच वाहन असल्याने कोण अधिकारी अगोदरच एखाद्या कारवाईसाठी जर ते वाहन घेऊन गेला असेल तर नंतर काही तक्रारींचा कॉल आला तर अडचण निर्माण होते. या विभागाकडे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचीही जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे एकाच गाडीवर कारभार हाकताना अधिकाऱ्यांना नाकीनऊ येत आहे.कमी मनुष्यबळावर आम्ही काम करीत आहोत. दुधामधील भेसळसह इतर कारवाया आम्ही करीत आहोत. जेथे जेथे अन्नपदार्थांमध्ये भेसळ होईल त्या-त्या ठिकाणांवर आमची करडी नजर आहे.- विवेक पाटील, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, नाशिक

टॅग्स :Nashikनाशिक