शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

लाल फितीचा अजब कारभार; भेसळयुक्त तेल तपासणीसाठी ५ जिल्ह्यांना केवळ तीनच यंत्र

By suyog.joshi | Updated: October 7, 2023 12:55 IST

नाशिक शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यात सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेले खाद्य पदार्थ हे वेगेवेगळ्या तेलांपासून बनविले जातात.

सुयोग जोशी

नाशिक - पाच जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या नाशिक विभागात वारंवार तळल्या जाणाऱ्या तेलामधील भेसळ ओळखणारे टीपीसी मशीन केवळ तीनच उपलब्ध असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून, ऐन सणासुदीच्या काळात तेलातील भेसळ ओळखणार कशी, असा प्रश्न अन्न व औषध प्रशासन विभागासमोर उभा राहिला आहे.

नाशिक शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यात सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेले खाद्य पदार्थ हे वेगेवेगळ्या तेलांपासून बनविले जातात. पण, त्यांच्यातही सध्या भेसळ केली जात असल्याचे अनेक ठिकाणी दिसून येते. त्यात भेसळीच्या काही तक्रारी आल्यास अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने कारवाईही केली जाते. परंतु, तेलामध्ये स्वस्त, निकृष्ट, हानिकारक किंवा अनावश्यक पदार्थ जोडले जातात ज्यामुळे त्याचे स्वरूप आणि गुणवत्ता प्रभावित होऊ शकते. याच कारणास्तव या विभागामार्फत कारवाईसाठी सज्ज असलेल्या अधिकाऱ्यांना मात्र केवळ तीनच यंत्रे उपलब्ध आहेत.

काय आहे टीपीसी मशीन?टीपीसी म्हणजेच टोटल पोलर काऊंट मशीन. या मशीनद्वारे जळालेले तेल तपासता येते. त्या तेलात भेसळ आहे की नाही, याचीही स्पष्टता होते. त्यानंतर या विभागाकडून संबंधित आस्थापनेवर कारवाई केली जाते. त्यांना दंड ठोठावला जातो.

विभागातील टीपीसी मशीननाशिक-१नगर-१धुळे-जळगाव-१नंदुरबार-०

कर्मचाऱ्यांची उणीवजिल्ह्याच्या लोकसंख्येच्या मानाने अन्न व औषध प्रशासनाला सध्या मनुष्यबळाचीही कमतरता जाणवत आहे. या विभागात एकूण १९ पदे मंजूर असून, केवळ सहाच अधिकारी आहेत. त्यामुळे कामाचा ताण वाढला आहे. अनेकवेळा कारवाई करताना अडचणी येतात. कमी माणसांमुळे कारवाईसाठी दूर जाणेही अवघड होऊन बसते. त्यासाठी शासनाने या विभागाला जास्तीतजास्त आहे ती पदे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी होत आहे. शिवाय क्लेरिकलच्या जागाही रिक्त आहेत. अधिकाऱ्यांनाच क्लेरिकलची कामे करावी लागतात.

एकाच गाडीवर कारभाराचा भारनाशिक येथील अन्न व औषध प्रशासन विभागाला केवळ एकच वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे कारवाया करताना अडचणी येत असल्याचे समजते. एकच वाहन असल्याने कोण अधिकारी अगोदरच एखाद्या कारवाईसाठी जर ते वाहन घेऊन गेला असेल तर नंतर काही तक्रारींचा कॉल आला तर अडचण निर्माण होते. या विभागाकडे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचीही जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे एकाच गाडीवर कारभार हाकताना अधिकाऱ्यांना नाकीनऊ येत आहे.कमी मनुष्यबळावर आम्ही काम करीत आहोत. दुधामधील भेसळसह इतर कारवाया आम्ही करीत आहोत. जेथे जेथे अन्नपदार्थांमध्ये भेसळ होईल त्या-त्या ठिकाणांवर आमची करडी नजर आहे.- विवेक पाटील, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, नाशिक

टॅग्स :Nashikनाशिक