शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

वकिली पेशा निष्ठेने जोपासणारे जायभावे प्रेरणास्रोत : अनिल सिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2022 01:30 IST

आपल्या वडिलांकडून मिळालेला वकिली पेशाचा वारसा निष्ठेने जोपासत कठोर मेहनतीच्या जोरावर सातत्याने न्यायदान प्रक्रियेत महत्त्वाचे योगदान देण्यास अग्रेसर असलेले नाशिकचे ज्येष्ठ विधिज्ञ जयंत जायभावे हे प्रत्येक वकिलासाठी एक प्रेरणास्रोत आहेत. त्यांच्या नेतृत्वामध्ये नाशिकला सातत्याने नवोदित वकिलांकरिता दर्जेदार व गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणपर कार्यक्रम राबविले गेले. त्यांच्या नेतृत्व कौशल्य व कुशाग्र बुद्धिमत्तेचा लाभ आता राष्ट्रीय पातळीवर होणार असल्याचे प्रतिपादन भारताचे अतिरिक्त महाधिवक्ता अनिल सिंग यांनी केले.

ठळक मुद्दे नवोदित वकिलांना सातत्यपूर्ण प्रशिक्षण देणारे नाशिक एकमेव ‘चॅप्टर’

नाशिक : आपल्या वडिलांकडून मिळालेला वकिली पेशाचा वारसा निष्ठेने जोपासत कठोर मेहनतीच्या जोरावर सातत्याने न्यायदान प्रक्रियेत महत्त्वाचे योगदान देण्यास अग्रेसर असलेले नाशिकचे ज्येष्ठ विधिज्ञ जयंत जायभावे हे प्रत्येक वकिलासाठी एक प्रेरणास्रोत आहेत. त्यांच्या नेतृत्वामध्ये नाशिकला सातत्याने नवोदित वकिलांकरिता दर्जेदार व गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणपर कार्यक्रम राबविले गेले. त्यांच्या नेतृत्व कौशल्य व कुशाग्र बुद्धिमत्तेचा लाभ आता राष्ट्रीय पातळीवर होणार असल्याचे प्रतिपादन भारताचे अतिरिक्त महाधिवक्ता अनिल सिंग यांनी केले.

बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्यपदी महाराष्ट्रातून निवड झालेले शहरातील ज्येष्ठ विधिज्ञ जयंत जायभावे यांचा नाशिककरांच्यावतीने रविवारी (दि. १३) मनोहर गार्डन येथे जाहीर सत्कार सोहळा आयोजित करण्यात आल होता. या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून सिंग बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा, राज्याचे महाधिवक्ता ॲड. आशुतोष कुंभकोणी, माजी महाधिवक्ता ॲड. डॅरियस खंबाता, महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष वसंत साळुंके, उपाध्यक्ष राजेंद्र उमप, नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. नितीन ठाकरे, ॲड. अविनाश भिडे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सत्कार समितीचे अध्यक्ष गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. मो. स. गोसावी हे होते.

यावेळी अनिल सिंग म्हणाले, भारतीय वकील परिषद ही जगातील दुसऱ्या क्रमांकावर असलेली मोठी परिषद आहे. या परिषदेच्या सदस्यपदी काम करण्याची संधी जायभावे यांना मिळाली आहे. कुंभनगरी म्हणून परिचित असलेल्या या शहरात सातत्याने न्यायव्यवस्था व त्याविषयीची ध्येय-धोरणे तसेच विधी शिक्षणाबाबत मंथन घडविणारा वकिलांचा कुंभमेळा त्यांच्या पुढाकाराने अनेकदा पार पडला अन् त्याचा लाभ संपूर्ण राज्याला नव्हे तर देशाला होतो, असे सिंग यांनी यावेळी अधोरेखित केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान करत जायभावे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. ॲड. मनीषा भामरे यांनी सूत्रसंचालन केले. बार असोसिएशनचे सचिव ॲड. जालिंदर ताडगे यांनी आभार मानले.

--इन्फो--

पदव्युत्तर लॉ अभ्यासक्रम दोन वर्षांचा हवा : मो. स. गोसावी

बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर विधी शिक्षणाचा अभ्यासक्रम पाच वर्षांचा असतो; मात्र पदवी उत्तीर्ण होऊन विधी शिक्षणाला प्रवेश घेऊ इच्छित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम तीन नव्हे तर दोन वर्षांचाच असायला हवा, जेणेकरुन विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाचण्यास मदत होईल, अशी सूचना डॉ. मो. स. गोसावी यांनी यावेळी मांडली. पदवीनंतरच्या विधी अभ्यासक्रमात (स्पेशलायाझेशन) असायला हवे, जेणेकरुन विधी शिक्षणाकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल वाढेल, असेही ते म्हणाले.

 

---इन्फो--

जलद न्यायासाठी प्रयत्नशील : जयंत जायभावे

नागरी सत्काराचा क्षण माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या क्षणाचे साक्षीदार माझ्या मातोश्री शकुंतला जायभावे, गुरुवर्य सर डॉ. मो. स. गोसावी हे उपस्थित असल्याने हा माझ्यासाठी दुग्धशर्करा योग आहे. वडिलांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजातील दुर्लक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी वेचले होते. त्यांचा वारसा मी चालवत असून, ते माझ्यासाठी मोठे आदर्श राहिले आहेत. यामुळे समाजातील उपेक्षितांना जलद गतीने न्याय कशाप्रकारे मिळेल, यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. विधी शाखेचे शिक्षण अधिक दर्जेदार होण्यासाठी आगामी काळात प्रयत्नशील राहणार आहे. तसेच वकिली क्षेत्रात कार्यरत नवोदित वकिलांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचा प्रयत्न असेल, असेही जायभावे सत्काराला उत्तर देताना म्हणाले.

टॅग्स :Nashikनाशिकadvocateवकिल