शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ८८२ रुग्ण ठणठणीत बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 01:30 IST

जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या २७ हजार ६७७ झाली आहे. गुरुवारी (दि. २०) १७ रुग्ण दगावले. यामध्ये मनपा हद्दीतील ६, ग्रामीणमधील नऊ आणि मालेगावातील दोन रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात ८८२ रुग्णांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली. तसेच ९०३ नवे रुग्ण जिल्ह्यात आढळून आले.

ठळक मुद्देकोरोना : ९०३ नवे रु ग्ण आढळले; १७ जणांचा झाला मृत्यू

नाशिक : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या २७ हजार ६७७ झाली आहे. गुरुवारी (दि. २०) १७ रुग्ण दगावले. यामध्ये मनपा हद्दीतील ६, ग्रामीणमधील नऊ आणि मालेगावातील दोन रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात ८८२ रुग्णांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली. तसेच ९०३ नवे रुग्ण जिल्ह्यात आढळून आले. यामध्ये नाशिक शहरात ५६०, ग्रामीणमध्ये २७३, तर मालेगावात ५५ आणि जिल्ह्याबाहेरील ५ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण २२ हजार ९२५ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातसुद्धा कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहे.ग्रामीण पोलीस दलात चौथा बळीग्रामीण पोलीस दलात कार्यरत ५४ वर्षीय सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दलात कोरोनाने आतापर्यंत चौघांचा बळी घेतला आहे, तर शहर पोलीस दलातील एकास कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहे. मुख्यालयात कार्यरत या सहायक पोलीस निरीक्षकाच्या कुटुंबातील व्यक्ती बाधित आढळून आली. त्यातून त्यांना लागण झाली. सद्यस्थितीत ग्रामीण पोलीस दलात नऊ कर्मचारी बाधित असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. १०० हून अधिक पोलीस कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत.गुरु वारी जिल्ह्यात १ हजार ४३० संशयित रु ग्ण दाखल झाले. यामध्ये सर्वाधिक १ हजार ११७रु ग्ण नाशिक शहरातील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ७४५ बाधितांचा मृत्यू झाला तर ४ हजार बाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील १ हजार ५९२ अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.जिल्ह्यातील येवला आणि दिंडोरीयेथे अनुक्रमे ३ आणि ८ बाधित आढळून आले आहेत. येवला तालुक्यात १२ संशयितांच्या रॅपिड अँटीजेन टेस्ट घेतल्या. यात तिघांचे पॉझिटिव्ह तर ९ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दिंडोरी तालुक्यात दोन दिवसात आठ नवे रु ग्ण आढळून आले आहे.कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी नाशिककरांना अधिकाधिक खबरदारी घेत शासनाने सांगितलेल्या उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे. आगामी काळ सण-उत्सवांचा असल्याने संक्र मणाचा धोका अधिक वाढण्याची श्यक्यता आहे. आगामी गणेशोत्सवच्या पाशर््वभूमीवर बाजारपेठेत गर्दी वाढू शकते अशावेळी नागरिकांनी तोंडावर मास्क लावत परस्परांत डिस्टन्स बाळगणे खूप गरजेचे आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या