शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

८६१ टंचाईग्रस्त गावे झाली जलपरीपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 01:19 IST

जलयुक्त शिवार योजनेमध्ये २०१६-१७ यावर्षी निवडलेल्या नाशिक विभागातील ९०० गावांपैकी ८६१ इतकी टंचाईग्रस्त गावे (९६ टक्के) जलपरीपूर्ण झाल्याने या गावांतील लोकांचे जीवनमान बदलल्याची माहिती विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नाशिकरोड : जलयुक्त शिवार योजनेमध्ये २०१६-१७ यावर्षी निवडलेल्या नाशिक विभागातील ९०० गावांपैकी ८६१ इतकी टंचाईग्रस्त गावे (९६ टक्के) जलपरीपूर्ण झाल्याने या गावांतील लोकांचे जीवनमान बदलल्याची माहिती विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावर्षीच्या आराखड्यातील नियोजित कामे शासनाने दिलेल्या मुदतीच्या आत पूर्ण करण्याचा मानसही झगडे यांनी यावेळी व्यक्त केला.  जलयुक्त शिवार अभियान आणि नरेगा या योजनांच्या अंमलबजावणी आणि प्रगतीच्या संदर्भात विभागीय आयुक्तालयात झालेल्या पत्रकार परिषदेत विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी जलयुक्त शिवार अभियानामुळे टंचाईग्रस्त गावांतील नागरिकांच्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल झाल्याचा दावा केला. गेल्या वर्षी नाशिक विभागातील ९०० गावांचा समावेश या योजनेत करण्यात आला होता. त्यामध्ये प्रस्तावित २५ हजार ८०५ इतक्या कामांपैकी ९० टक्के अर्थात २३ हजार ५३५ इतकी कामे पूर्ण झाली आहेत. ८६१ गावांची पाण्याच्या टंचाईतून मुक्तता झाली आहे. पूर्ण झालेल्या कामांपैकी २१ हजार १३६ कामांचे जिओ टॅगिंगचे कामही पूर्ण झाले आहे. या कामांमुळे नाशिक विभागात १ लाख ४१ हजार ८३३ टीसीएम क्षमतेची पाणीसाठा निर्मिती झाली असून, त्याद्वारे २ लाख ३२ हजार हेक्टर क्षेत्रास संरक्षित सिंचनासाठी एकदा पाणी देता येणे शक्य होणार आहे. या कामांवर ४९८ कोटी खर्च करण्यात आलेला आहे. २०१७-१८ या वर्षासाठी विभागातील ८४७ गावांची निवड जलयुक्त शिवारसाठी करण्यात आली असून, या गावांत प्रस्तावित २१ हजार ३६७ कामांसाठी ४८९ कोटी रुपयांचा आराखडा निश्चित करण्यात आल्याचे झगडे यांनी सांगितले. ३ हजार ५९५ कामांना कार्यारंभ आदेश दिलेला असून, ९७९ कामे प्रत्यक्ष सुरू आहेत. पेयजलसंबंधी बळकटीकरणाच्या कामांना प्राधान्य दिले जाणार असून, त्यांची फेरतपासणी प्रांताधिकाºयामार्फत केली जाणार आहे. कमी पावसाच्या क्षेत्रात मजगीच्या कामांना प्रतिबंध घालण्याचा निर्णय घेतल्याचे झगडे यांनी सांगितले. मजगीमुळे रब्बी व उन्हाळी हंगाम असुरक्षित होणार असेल तरीही अशी कामे आता होणार नाहीत, असे महेश झगडे यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिकcommissionerआयुक्त