शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
"तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
3
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
4
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
5
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
7
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
8
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
9
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
10
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
11
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
12
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
13
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
14
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
15
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
16
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
17
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
18
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
19
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
20
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!

८३ झाडांचे बुंधे जाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 00:16 IST

एकीकडे शहराचे तपमान चालू महिन्यातच चाळिशीपार पोहचले असताना दुसरीकडे मात्र शहरातील वृक्षराजीला धोका पोहचविण्याचा सर्रास प्रयत्न सुरू आहे. गंगापूररोडवरील जुन्या गोदापार्कमधील वृक्षराजीपैकी निलगिरीसह बांबू, अशोक या प्रजातींच्या एकू ण ८३ झाडांचे बुंधे अज्ञात इसमांनी जाळल्याचे जागतिक वसुंधरा दिनाच्या पूर्वसंध्येला उघडकीस आले

नाशिक : एकीकडे शहराचे तपमान चालू महिन्यातच चाळिशीपार पोहचले असताना दुसरीकडे मात्र शहरातील वृक्षराजीला धोका पोहचविण्याचा सर्रास प्रयत्न सुरू आहे. गंगापूररोडवरील जुन्या गोदापार्कमधील वृक्षराजीपैकी निलगिरीसह बांबू, अशोक या प्रजातींच्या एकू ण ८३ झाडांचे बुंधे अज्ञात इसमांनी जाळल्याचे जागतिक वसुंधरा दिनाच्या पूर्वसंध्येला उघडकीस आले, हे दुर्दैवच. मात्र याकडे मनपा उद्यान विभागाने कानाडोळा करणे पसंत केल्याने संताप व्यक्त होत आहे.  शहरामधील वृक्षसंपदा जतन करणे व ती वाढविण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाची असून, शहराबाहेरील वृक्षसंपदेच्या संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी वनविभागाची आहे. सध्या शहरातील वृक्षराजीला कोणी वालीच राहिले नसल्याचे चित्र दिसत आहे. कुठल्याही प्रकारचा अडथळा नसला तरी सर्रासपणे तो वृक्ष तोडला जातो, तर दुसरीकडे छाटणीच्या नावाखाली वृक्षांचा केवळ बुंधा ठेवला जातो. तसेच महापालिकेचे कर्मचारी सांगून वृक्ष तोडण्याचा सपाटाही शहरातील विविध भागांमध्ये सुरू आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ईदगाह मैदानावरील शेकडो वर्षे जुने वटवृक्ष अज्ञात इसमांनी कापून लंपास केले; मात्र त्याची कुठलीही दखल महापालिकेच्या संबंधित विभागाने घेतली नाही. वृक्ष संरक्षण अधिनियमानुसार विनापरवानगी वृक्षतोड करणे गुन्हा ठरतो. मात्र या कायद्याची अंमलबजावणीबाबत संबंधित शासकीय यंत्रणा उदासीन आहे. गोदापार्क परिसरात बांबू, निलगिरी, अशोक, कडूनिंब, कदंब अशा विविध प्रजातीचे डौलदार वृक्ष आहे.वटवाघळांचा अधिवास धोक्यातनिलगिरी वृक्षांवर शेकडोंच्या संख्येने वास्तव्यास असलेल्या वटवाघळांचा अधिवास झाडांच्या बुंध्यांना लावलेल्या आगीमुळे असुरक्षित बनला. आगीमुळे येथील वटवाघळे सैरभैर होऊन शासकीय रोपवाटिकेमधील झाडांवर स्थलांतरित झाले. येथील वृक्षसंपदेवर वटवाघळांची वसाहत आहे. त्यांच्या संवर्धन व संरक्षणाऐवजी वृक्षराजीला धोका पोहचविण्याचा प्रताप होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. अशा या विकृ त प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी होत आहे.झाडांना कमकुवत करण्याचा प्रयत्ननिलगिरी वृक्षाला औषधी महत्त्व असून, येथील उंच हिरव्यागार वृक्षांची कत्तल करणे अवघड असल्यामुळे झाडांना कमकुवत करण्यासाठी तस्करांनी बुंधे पेटविल्याची चर्चा आहे. बुंधे पेटविल्यामुळे झाडे आपोआप कोसळण्याचा मार्ग मोकळा होईल आणि त्यानंतर या झाडांची विल्हेवाट लावणे सोपे होईल, हा यामागील उद्देश असल्याचाही संशय घेतला जात आहे. महापालिका प्रशासनाने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Fairजत्रा