शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

८० टक्के युवकांनी घरकामात केली मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 22:58 IST

नाशिक : एरवी पायाला भिंंगरी लागल्यागत फिरणाऱ्या आणि घरी न थांबणाºया युवकांना महिनाभरापासून घरीच थांबावे लागत असले तरी त्यातून अनेक जाणिवांत बदल झाला आहे. ८० टक्के युवकांना घरातच कामे केली किंवा मदत तर केलीच, परंतु ५२ टक्के युवकांनी घरातच बसून नवीन कौशल्ये आत्मसात केली आहेत.

ठळक मुद्देसर्वेक्षण : नवीन कौशल्य शिकले, आरोग्याबाबतही वाढली सजगता

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : एरवी पायाला भिंंगरी लागल्यागत फिरणाऱ्या आणि घरी न थांबणाºया युवकांना महिनाभरापासून घरीच थांबावे लागत असले तरी त्यातून अनेक जाणिवांत बदल झाला आहे. ८० टक्के युवकांना घरातच कामे केली किंवा मदत तर केलीच, परंतु ५२ टक्के युवकांनी घरातच बसून नवीन कौशल्ये आत्मसात केली आहेत.लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे सर्वांनाच घरी बसावे लागत आहे. यासंदर्भात नाशिकमधील युवकांना काय वाटते, त्यांचा वेळ कसा गेला, त्यांनी या कालावधीकडे कसे बघितले याविषयी एचपीटी महाविद्यालयातील जनसंज्ञापन व वृत्तपत्र विद्या अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी प्राजक्ता नागपुरे हिच्या नेतृत्वाखालील विद्यार्थ्यांनी सर्वेक्षण करून लॉकडाउनविषयी युवकांची मते जाणून घेतली. प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी, विभागप्रमुख उपप्राचार्य डॉ. वृंदा भार्गवे व प्रा. रमेश शेजवळ यांनी त्यांना मार्गदर्शन केले. लॉकडाउन करण्याची गरज होती किंवा नाही याबाबत सध्या राजकीय आरोप सुरू झाले असले तरी ९५ टक्के युवकांनी त्याचे समर्थन केले. मात्र आता लॉकडाउन संपवावाच असे मत ७५ टक्के जणांचे मत आहे. लॉकडाउनमुळे बेरोजगारी वाढले असे ७४ टक्के जण सहमत आहे. मात्र, त्यातून भारत सावरेल, असेही मत त्यांनी व्यक्त केले. ५२ टक्के युवकांनी या कालावधीत विविध कौशल्ये आत्मसात केली आहेत. खासगी आयुष्य जपता येत नाहीघरातच कुटुंबासमवेत असल्याने खासगी आयुष्य जपता येत नाही असे १८ टक्के युवकांचे मत असल्याचे सर्वेक्षणात आढळले, तर २९ टक्के युवकांना काही प्रमाणात खासगीपण जपता येत नाही असे वाटते.जीवनाचा खरा अर्थ कळालालॉकडाऊनच्या काळात जीवनाचा खरा अर्थ कळाला असे मत ७३ टक्के जणांनी व्यक्त केले आहे. ९७ टक्के युवकांनी आरोग्य सजग होताना रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न केले. कोरोनामुळे आता काही खरं नाही अशी भीती २५ टक्के युवक-युवतींनी व्यक्त केली.

टॅग्स :NashikनाशिकHomeघर