शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

मुक्त विद्यापीठाचे ८० टक्के विद्यार्थी ग्रामीण भागातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:12 IST

नाशिक : ‘हे विद्यापीठ लोकविद्यापीठ व्हावे,’ असे ध्येय निश्चित करून स्थापन झालेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा उद्देश सफल ...

नाशिक : ‘हे विद्यापीठ लोकविद्यापीठ व्हावे,’ असे ध्येय निश्चित करून स्थापन झालेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा उद्देश सफल होताना दिसत आहे. विद्यापीठातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी ८० टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थी हे ग्रामीण भागातील असल्याने महाराष्ट्रातील जनतेला हे आपले विद्यापीठ वाटत असल्याचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांनी सांगितले. यशवंतराव चव्हाण यांचे नाव विद्यापीठाला असल्यानेच विद्यापीठाविषयी महाराष्ट्रात आपुलकीची भावना असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘लोकमत’च्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त लोकमत कार्यालयात आयोजित संवाद कार्यक्रमात त्यांनी विद्यापीठाच्या प्रगतीविषयीच्या वाटचालीचा आढावा घेतला. यावेळी कार्यकारी संपादक मिलिंद कुलकर्णी, सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक यांनी त्यांचे स्वागत केले.

वंचितांपर्यंत शिक्षण पोहोचावे अशी दूरदृष्टी ठेवून शरदचंद्र पवार यांनी मुक्त विद्यापीठाची संकल्पना मांडली. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाचे हे विद्यापीठ असल्याने महाराष्ट्रातील जनतेची विद्यापीठाविषयी एक भावनिक आस्थादेखील आहे. तत्कालीन कुलगुरू यांनीही मुक्त शिक्षणाची संकल्पना तळागाळापर्यंत रुजविल्यामुळे विद्यापीठ लोकाभिमुख झाले झाले असल्याचा उल्लेख कुलगुरू वायुनंदन यांनी आवर्जून केला. महाराष्ट्रातील जनतेची विद्यापीठाविषयीची आस्था विद्यार्थी संख्येत दिसत असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोरोनाच्या कठीण काळात पारंपरिक विद्यापीठांना परीक्षेला मर्यादा आलेल्या असताना मुक्त विद्यापीठाने ऑनलाइन परीक्षा यशस्वी करून दाखविल्या आहेत. याशिवाय सहा लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला असून, ही संख्या लवकरच सात लाखांपर्यंत पोहोचण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अन्य कोणत्याही पारंपरिक विद्यापीठ, तसेच शिक्षण संस्थांमध्ये नसलेली विद्यार्थी संख्या मुक्त विद्यापीठात असून, विद्यापीठाला दोनदा कॉमनवेल्थ एक्सलन्स हा आंतराष्ट्रीय दर्जाचा पुरस्कार प्राप्त झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

मुक्त शिक्षणाची संकल्पना बदलत असल्याने मुक्त विद्यापीठाची देखील जबाबदारी वाढली आहे. आधुनिकतेच्या बाबतीत विद्यापीठ अगोदरही सक्षम होते आणि आता अधिक स्वयंपूर्ण झाले आहे. त्यामुळेच नव्या शैक्षणिक धोरणासाठी मुक्त विद्यापीठ सक्षम असल्याचे वायुनंदन म्हणाले. पुढील काळात विद्यापीठाचे राज्यात सर्वत्र स्वतंत्र इन्फ्रास्ट्रक्चर राहणार असून, इतर महाविद्यालयांवरील अवलंबिता कमी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

--इन्फो--

गोवा राज्यात लवकरच केंद्र सुरू होणार

मुक्त विद्यापीठाचे केंद्र आता गोवा राज्यातही सुरू होणार असून, पुढील दोन महिन्यांत गोव्यात मुक्त शिक्षण पोहोचणार आहे. कर्नाटक सीमेपर्यंत मुक्त शिक्षणाचा विस्तार झाल्याचेही ई. वायुनंदन यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सावंत, तसेच सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी मुक्त विद्यापीठाच्या विस्तारासाठीची नवी दालने खुली करून दिली आहेत, असेही त्यांनी सांगितले.