शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

मुक्त विद्यापीठाचे ८० टक्के विद्यार्थी ग्रामीण भागातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:12 IST

नाशिक : ‘हे विद्यापीठ लोकविद्यापीठ व्हावे,’ असे ध्येय निश्चित करून स्थापन झालेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा उद्देश सफल ...

नाशिक : ‘हे विद्यापीठ लोकविद्यापीठ व्हावे,’ असे ध्येय निश्चित करून स्थापन झालेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा उद्देश सफल होताना दिसत आहे. विद्यापीठातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी ८० टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थी हे ग्रामीण भागातील असल्याने महाराष्ट्रातील जनतेला हे आपले विद्यापीठ वाटत असल्याचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांनी सांगितले. यशवंतराव चव्हाण यांचे नाव विद्यापीठाला असल्यानेच विद्यापीठाविषयी महाराष्ट्रात आपुलकीची भावना असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘लोकमत’च्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त लोकमत कार्यालयात आयोजित संवाद कार्यक्रमात त्यांनी विद्यापीठाच्या प्रगतीविषयीच्या वाटचालीचा आढावा घेतला. यावेळी कार्यकारी संपादक मिलिंद कुलकर्णी, सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक यांनी त्यांचे स्वागत केले.

वंचितांपर्यंत शिक्षण पोहोचावे अशी दूरदृष्टी ठेवून शरदचंद्र पवार यांनी मुक्त विद्यापीठाची संकल्पना मांडली. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाचे हे विद्यापीठ असल्याने महाराष्ट्रातील जनतेची विद्यापीठाविषयी एक भावनिक आस्थादेखील आहे. तत्कालीन कुलगुरू यांनीही मुक्त शिक्षणाची संकल्पना तळागाळापर्यंत रुजविल्यामुळे विद्यापीठ लोकाभिमुख झाले झाले असल्याचा उल्लेख कुलगुरू वायुनंदन यांनी आवर्जून केला. महाराष्ट्रातील जनतेची विद्यापीठाविषयीची आस्था विद्यार्थी संख्येत दिसत असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोरोनाच्या कठीण काळात पारंपरिक विद्यापीठांना परीक्षेला मर्यादा आलेल्या असताना मुक्त विद्यापीठाने ऑनलाइन परीक्षा यशस्वी करून दाखविल्या आहेत. याशिवाय सहा लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला असून, ही संख्या लवकरच सात लाखांपर्यंत पोहोचण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अन्य कोणत्याही पारंपरिक विद्यापीठ, तसेच शिक्षण संस्थांमध्ये नसलेली विद्यार्थी संख्या मुक्त विद्यापीठात असून, विद्यापीठाला दोनदा कॉमनवेल्थ एक्सलन्स हा आंतराष्ट्रीय दर्जाचा पुरस्कार प्राप्त झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

मुक्त शिक्षणाची संकल्पना बदलत असल्याने मुक्त विद्यापीठाची देखील जबाबदारी वाढली आहे. आधुनिकतेच्या बाबतीत विद्यापीठ अगोदरही सक्षम होते आणि आता अधिक स्वयंपूर्ण झाले आहे. त्यामुळेच नव्या शैक्षणिक धोरणासाठी मुक्त विद्यापीठ सक्षम असल्याचे वायुनंदन म्हणाले. पुढील काळात विद्यापीठाचे राज्यात सर्वत्र स्वतंत्र इन्फ्रास्ट्रक्चर राहणार असून, इतर महाविद्यालयांवरील अवलंबिता कमी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

--इन्फो--

गोवा राज्यात लवकरच केंद्र सुरू होणार

मुक्त विद्यापीठाचे केंद्र आता गोवा राज्यातही सुरू होणार असून, पुढील दोन महिन्यांत गोव्यात मुक्त शिक्षण पोहोचणार आहे. कर्नाटक सीमेपर्यंत मुक्त शिक्षणाचा विस्तार झाल्याचेही ई. वायुनंदन यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सावंत, तसेच सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी मुक्त विद्यापीठाच्या विस्तारासाठीची नवी दालने खुली करून दिली आहेत, असेही त्यांनी सांगितले.