शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

मुक्त विद्यापीठाचे ८० टक्के विद्यार्थी ग्रामीण भागातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:12 IST

नाशिक : ‘हे विद्यापीठ लोकविद्यापीठ व्हावे,’ असे ध्येय निश्चित करून स्थापन झालेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा उद्देश सफल ...

नाशिक : ‘हे विद्यापीठ लोकविद्यापीठ व्हावे,’ असे ध्येय निश्चित करून स्थापन झालेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा उद्देश सफल होताना दिसत आहे. विद्यापीठातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी ८० टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थी हे ग्रामीण भागातील असल्याने महाराष्ट्रातील जनतेला हे आपले विद्यापीठ वाटत असल्याचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांनी सांगितले. यशवंतराव चव्हाण यांचे नाव विद्यापीठाला असल्यानेच विद्यापीठाविषयी महाराष्ट्रात आपुलकीची भावना असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘लोकमत’च्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त लोकमत कार्यालयात आयोजित संवाद कार्यक्रमात त्यांनी विद्यापीठाच्या प्रगतीविषयीच्या वाटचालीचा आढावा घेतला. यावेळी कार्यकारी संपादक मिलिंद कुलकर्णी, सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक यांनी त्यांचे स्वागत केले.

वंचितांपर्यंत शिक्षण पोहोचावे अशी दूरदृष्टी ठेवून शरदचंद्र पवार यांनी मुक्त विद्यापीठाची संकल्पना मांडली. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाचे हे विद्यापीठ असल्याने महाराष्ट्रातील जनतेची विद्यापीठाविषयी एक भावनिक आस्थादेखील आहे. तत्कालीन कुलगुरू यांनीही मुक्त शिक्षणाची संकल्पना तळागाळापर्यंत रुजविल्यामुळे विद्यापीठ लोकाभिमुख झाले झाले असल्याचा उल्लेख कुलगुरू वायुनंदन यांनी आवर्जून केला. महाराष्ट्रातील जनतेची विद्यापीठाविषयीची आस्था विद्यार्थी संख्येत दिसत असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोरोनाच्या कठीण काळात पारंपरिक विद्यापीठांना परीक्षेला मर्यादा आलेल्या असताना मुक्त विद्यापीठाने ऑनलाइन परीक्षा यशस्वी करून दाखविल्या आहेत. याशिवाय सहा लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला असून, ही संख्या लवकरच सात लाखांपर्यंत पोहोचण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अन्य कोणत्याही पारंपरिक विद्यापीठ, तसेच शिक्षण संस्थांमध्ये नसलेली विद्यार्थी संख्या मुक्त विद्यापीठात असून, विद्यापीठाला दोनदा कॉमनवेल्थ एक्सलन्स हा आंतराष्ट्रीय दर्जाचा पुरस्कार प्राप्त झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

मुक्त शिक्षणाची संकल्पना बदलत असल्याने मुक्त विद्यापीठाची देखील जबाबदारी वाढली आहे. आधुनिकतेच्या बाबतीत विद्यापीठ अगोदरही सक्षम होते आणि आता अधिक स्वयंपूर्ण झाले आहे. त्यामुळेच नव्या शैक्षणिक धोरणासाठी मुक्त विद्यापीठ सक्षम असल्याचे वायुनंदन म्हणाले. पुढील काळात विद्यापीठाचे राज्यात सर्वत्र स्वतंत्र इन्फ्रास्ट्रक्चर राहणार असून, इतर महाविद्यालयांवरील अवलंबिता कमी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

--इन्फो--

गोवा राज्यात लवकरच केंद्र सुरू होणार

मुक्त विद्यापीठाचे केंद्र आता गोवा राज्यातही सुरू होणार असून, पुढील दोन महिन्यांत गोव्यात मुक्त शिक्षण पोहोचणार आहे. कर्नाटक सीमेपर्यंत मुक्त शिक्षणाचा विस्तार झाल्याचेही ई. वायुनंदन यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सावंत, तसेच सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी मुक्त विद्यापीठाच्या विस्तारासाठीची नवी दालने खुली करून दिली आहेत, असेही त्यांनी सांगितले.